शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

पावसाचा जोर कायम;रोह्यात कुंडलिकेने गाठली इशारा पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:15 IST

अलिबाग : विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी चांगलाच दणका दिला, त्यामुळे कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे, तर भिरा धरणाचे ...

अलिबाग : विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी चांगलाच दणका दिला, त्यामुळे कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे, तर भिरा धरणाचे दोन दरवाजे उघडावे लागले आहेत. सातत्याने अशा पडणाऱ्या पावसाने नदीकाठी राहणारे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील तीन दिवस पावसाचा असाच जोर राहणार असल्याने अलर्ट जारी केला आहे.

बुधवारी सकाळपासून रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे शेतीची कामे मात्र खोळंबली आहेत. सकाळी सोसाट्याच्या वाºयासह पाऊस पडत असल्याने काही शाळांनी प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजीचे वर्ग बंद ठेवले होते. ११ व १२ जुलै रोजीही रायगड जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाºयासह पर्जन्यवृष्टी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सर्तक राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पर्यटनस्थळे, धबधबा, गड-किल्ले येथे जाताना काळजी घ्यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.रायगड जिल्ह्यात आतापर्यंत १२८५.०४ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. बुधवारी दिवसभर पावसाने झोडपल्याने शेतीची कामे खोळंबली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगावर मजुरी पडल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पाऊस रात्रभर सुरूच राहिल्यास सावित्री, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या नद्या धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, रोह्याच्या कुंडलिका नदीनेही इशारा व धोक्याची पातळी गेल्या चार दिवसांत तीन वेळा ओलांडली आहे. जिल्हा आपत्कालीन कार्य कक्षाने पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा प्रशासनाला दिला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रोह्यात गेले तीन दिवस सुरू असलेल्या धुवाधार पावसाने बुधवारीही हैदोस घातला. शहरातील मुख्य हमरस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेले, कुंडलिका नदीवरील कोलाड येथील डोलवहाळ बंधाºयाने २३ मि.मी. ही इशारा पाणीपातळी गाठल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. नदीने रौद्ररूप धारण केले असून दुपारपासून रोहा-अष्टमी दरम्यान असलेल्या पुलाला लागून पाणी वाहू लागल्याने भीती व्यक्त होत आहे. सायंकाळपर्यंत पावसाची स्थिती अशीच राहिल्यास पाणी वाढण्याची शक्यता आहे.

धरणातून पाणी सोडले गेल्यास त्याचा फटका नदीच्या दोन्ही बाजूकडील रोहा-अष्टमी शहर आणि लगतच्या गावांना बसणार आहे. त्याचप्रमाणे येथील धाटाव एमआयडीसीत कामासाठी मोठ्या संख्येने येणाºया कामगारांनाही बसणार आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पाण्याची वाढत असलेली पातळी लक्षात घेता तालुका प्रशासनाकडून नदीकिनारी असणाºया गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.