शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

रायगड जिल्ह्यात पावसाचे धूमशान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 02:14 IST

रायगड जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता या सर्वसाधारण पर्जन्यापैकी ५१.६७ टक्के म्हणजे २५ हजार ९७९ मि.मी. पर्जन्यमान ९ जुलै रोजी पूर्ण झाले आहे.

अलिबाग - जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता या सर्वसाधारण पर्जन्यापैकी ५१.६७ टक्के म्हणजे २५ हजार ९७९ मि.मी. पर्जन्यमान ९ जुलै रोजी पूर्ण झाले आहे. गतवर्षी याच दिवशी १९ हजार १५६ मि.मी. पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अल्पावधीत अधिक पर्जन्यमान झाले आहे.पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १९५ मि.मी. पावसाची नोंद रोहा येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी मुरुड-७३, तळा-१४५, माणगाव-१८३, श्रीवर्धन-१२, महाड-१८६, अलिबाग-१०४, पोलादपूर-८१, पेण-८०, कर्जत-१४१, खालापूर-११८, उरण-१८८, पनवेल-१८०, सुधागड-८७, म्हसळा-६१ तर गिरिस्थान माथेरान येथे १४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या २४ तासांतील जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १२३ मि.मी. झाले आहे.नागोठणे ठप्पच; संततधार सुरूच1नागोठणे : पावसाचे थैमान चालूच असल्याने सलग चौथ्या दिवशी शहरात पुराचे पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. एसटी बसस्थानक, कोळीवाडा, मटण मार्केट, लेक व्ह्यू हॉटेल भागात पुराचे पाणी भरले आहे. एसटी बसस्थानकात दोन फूट पाणी असल्याने एसटी बसची महामार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पाटबंधारे खात्याकडून धरणाचे पाणी सोडण्यात येणार असल्याबाबत विचारणा केली असता, सायंकाळी ५ पर्यंत अशा प्रकारचा कोणताही अधिकृत संदेश आला नसल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.उरणमध्ये इंटरनेट सेवा ठप्प2उरण : मुसळधार पावसामुळे एमटीएनएलचे उरण टेलिफोन एक्सचेंजमध्ये बिघाड झाल्याने उरण, जेएनपीटी, शेवा, एनएएडी आदी परिसरातील इंटरनेट सेवा पाचव्या दिवशीही सुरळीत झालेली नाही. परिणामी, सुमारे तीन ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. उरण परिसरात मागील पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे उरण टेलिफोन एक्सचेंजमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील इंटरनेट सेवा मागील पाच दिवसांपासून ठप्प झाली आहे. परिणामी, व्यापारी, बँका, ग्राहक सेवेवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. बिघाड दूर करण्यासाठी तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे एक्सचेंजमधील ओएफएस बिघाड दूर करण्यात अडचणी येत असल्याची माहिती उरण टेलिफोन एक्सचेंजचे विभागीय व्यवस्थापक पी. जी. बळकटे यांनी दिली. व्यापारी, बँका, ग्राहक सेवेवर त्याचा विपरित परिणाम झाला असल्याने उरण टेलिफोन एक्सचेंजच्या गलथान कारभाराविरोधात नागरिक, ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.विमानतळबाधित गावांत शिरले पाणीपनवेल : चार दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासांत पनवेल परिसरात तब्बल १८0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विमानतळबाधित पारगाव आणि डुंगी या गावांत मंगळवारी पुन्हा पाणी शिरल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी भरपावसात राज्य महामार्गावर रास्ता रोको केला.पनवेल शहरासह संपूर्ण तालुक्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर कायम होता. तालुक्यातील गाढी, कासाडी या नद्या दुथडी वाहत होत्या, तसेच शहरातील सर्व नालेदेखील ओसंडून वाहत आहेत. ग्रामीण भागातदेखील हीच अवस्था आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते, लहान पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. नांदगाव, उमरोली, बारापाडा, डोलघर, तुर्भे, करवले आदी गावांचा यामध्ये समावेश आहे. सायन-पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक धिमी झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्रातील नागझरी गावात अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ग्रामस्थांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. शहरातील मैदाने, उद्यानांना जणू गार्डनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कळंबोली, खारघर, तसेच पनवेल शहरातील काही भागात या वेळी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.\

 

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड