शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

रायगड जिल्ह्यात पावसाचे धूमशान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 02:14 IST

रायगड जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता या सर्वसाधारण पर्जन्यापैकी ५१.६७ टक्के म्हणजे २५ हजार ९७९ मि.मी. पर्जन्यमान ९ जुलै रोजी पूर्ण झाले आहे.

अलिबाग - जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता या सर्वसाधारण पर्जन्यापैकी ५१.६७ टक्के म्हणजे २५ हजार ९७९ मि.मी. पर्जन्यमान ९ जुलै रोजी पूर्ण झाले आहे. गतवर्षी याच दिवशी १९ हजार १५६ मि.मी. पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अल्पावधीत अधिक पर्जन्यमान झाले आहे.पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १९५ मि.मी. पावसाची नोंद रोहा येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी मुरुड-७३, तळा-१४५, माणगाव-१८३, श्रीवर्धन-१२, महाड-१८६, अलिबाग-१०४, पोलादपूर-८१, पेण-८०, कर्जत-१४१, खालापूर-११८, उरण-१८८, पनवेल-१८०, सुधागड-८७, म्हसळा-६१ तर गिरिस्थान माथेरान येथे १४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या २४ तासांतील जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १२३ मि.मी. झाले आहे.नागोठणे ठप्पच; संततधार सुरूच1नागोठणे : पावसाचे थैमान चालूच असल्याने सलग चौथ्या दिवशी शहरात पुराचे पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. एसटी बसस्थानक, कोळीवाडा, मटण मार्केट, लेक व्ह्यू हॉटेल भागात पुराचे पाणी भरले आहे. एसटी बसस्थानकात दोन फूट पाणी असल्याने एसटी बसची महामार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पाटबंधारे खात्याकडून धरणाचे पाणी सोडण्यात येणार असल्याबाबत विचारणा केली असता, सायंकाळी ५ पर्यंत अशा प्रकारचा कोणताही अधिकृत संदेश आला नसल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.उरणमध्ये इंटरनेट सेवा ठप्प2उरण : मुसळधार पावसामुळे एमटीएनएलचे उरण टेलिफोन एक्सचेंजमध्ये बिघाड झाल्याने उरण, जेएनपीटी, शेवा, एनएएडी आदी परिसरातील इंटरनेट सेवा पाचव्या दिवशीही सुरळीत झालेली नाही. परिणामी, सुमारे तीन ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. उरण परिसरात मागील पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे उरण टेलिफोन एक्सचेंजमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील इंटरनेट सेवा मागील पाच दिवसांपासून ठप्प झाली आहे. परिणामी, व्यापारी, बँका, ग्राहक सेवेवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. बिघाड दूर करण्यासाठी तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे एक्सचेंजमधील ओएफएस बिघाड दूर करण्यात अडचणी येत असल्याची माहिती उरण टेलिफोन एक्सचेंजचे विभागीय व्यवस्थापक पी. जी. बळकटे यांनी दिली. व्यापारी, बँका, ग्राहक सेवेवर त्याचा विपरित परिणाम झाला असल्याने उरण टेलिफोन एक्सचेंजच्या गलथान कारभाराविरोधात नागरिक, ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.विमानतळबाधित गावांत शिरले पाणीपनवेल : चार दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासांत पनवेल परिसरात तब्बल १८0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विमानतळबाधित पारगाव आणि डुंगी या गावांत मंगळवारी पुन्हा पाणी शिरल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी भरपावसात राज्य महामार्गावर रास्ता रोको केला.पनवेल शहरासह संपूर्ण तालुक्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर कायम होता. तालुक्यातील गाढी, कासाडी या नद्या दुथडी वाहत होत्या, तसेच शहरातील सर्व नालेदेखील ओसंडून वाहत आहेत. ग्रामीण भागातदेखील हीच अवस्था आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते, लहान पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. नांदगाव, उमरोली, बारापाडा, डोलघर, तुर्भे, करवले आदी गावांचा यामध्ये समावेश आहे. सायन-पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक धिमी झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्रातील नागझरी गावात अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ग्रामस्थांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. शहरातील मैदाने, उद्यानांना जणू गार्डनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कळंबोली, खारघर, तसेच पनवेल शहरातील काही भागात या वेळी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.\

 

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड