शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

रायगड जिल्ह्यात पावसाचे धूमशान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 02:14 IST

रायगड जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता या सर्वसाधारण पर्जन्यापैकी ५१.६७ टक्के म्हणजे २५ हजार ९७९ मि.मी. पर्जन्यमान ९ जुलै रोजी पूर्ण झाले आहे.

अलिबाग - जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता या सर्वसाधारण पर्जन्यापैकी ५१.६७ टक्के म्हणजे २५ हजार ९७९ मि.मी. पर्जन्यमान ९ जुलै रोजी पूर्ण झाले आहे. गतवर्षी याच दिवशी १९ हजार १५६ मि.मी. पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अल्पावधीत अधिक पर्जन्यमान झाले आहे.पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १९५ मि.मी. पावसाची नोंद रोहा येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी मुरुड-७३, तळा-१४५, माणगाव-१८३, श्रीवर्धन-१२, महाड-१८६, अलिबाग-१०४, पोलादपूर-८१, पेण-८०, कर्जत-१४१, खालापूर-११८, उरण-१८८, पनवेल-१८०, सुधागड-८७, म्हसळा-६१ तर गिरिस्थान माथेरान येथे १४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या २४ तासांतील जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १२३ मि.मी. झाले आहे.नागोठणे ठप्पच; संततधार सुरूच1नागोठणे : पावसाचे थैमान चालूच असल्याने सलग चौथ्या दिवशी शहरात पुराचे पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. एसटी बसस्थानक, कोळीवाडा, मटण मार्केट, लेक व्ह्यू हॉटेल भागात पुराचे पाणी भरले आहे. एसटी बसस्थानकात दोन फूट पाणी असल्याने एसटी बसची महामार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पाटबंधारे खात्याकडून धरणाचे पाणी सोडण्यात येणार असल्याबाबत विचारणा केली असता, सायंकाळी ५ पर्यंत अशा प्रकारचा कोणताही अधिकृत संदेश आला नसल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.उरणमध्ये इंटरनेट सेवा ठप्प2उरण : मुसळधार पावसामुळे एमटीएनएलचे उरण टेलिफोन एक्सचेंजमध्ये बिघाड झाल्याने उरण, जेएनपीटी, शेवा, एनएएडी आदी परिसरातील इंटरनेट सेवा पाचव्या दिवशीही सुरळीत झालेली नाही. परिणामी, सुमारे तीन ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. उरण परिसरात मागील पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे उरण टेलिफोन एक्सचेंजमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील इंटरनेट सेवा मागील पाच दिवसांपासून ठप्प झाली आहे. परिणामी, व्यापारी, बँका, ग्राहक सेवेवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. बिघाड दूर करण्यासाठी तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे एक्सचेंजमधील ओएफएस बिघाड दूर करण्यात अडचणी येत असल्याची माहिती उरण टेलिफोन एक्सचेंजचे विभागीय व्यवस्थापक पी. जी. बळकटे यांनी दिली. व्यापारी, बँका, ग्राहक सेवेवर त्याचा विपरित परिणाम झाला असल्याने उरण टेलिफोन एक्सचेंजच्या गलथान कारभाराविरोधात नागरिक, ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.विमानतळबाधित गावांत शिरले पाणीपनवेल : चार दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासांत पनवेल परिसरात तब्बल १८0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विमानतळबाधित पारगाव आणि डुंगी या गावांत मंगळवारी पुन्हा पाणी शिरल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी भरपावसात राज्य महामार्गावर रास्ता रोको केला.पनवेल शहरासह संपूर्ण तालुक्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर कायम होता. तालुक्यातील गाढी, कासाडी या नद्या दुथडी वाहत होत्या, तसेच शहरातील सर्व नालेदेखील ओसंडून वाहत आहेत. ग्रामीण भागातदेखील हीच अवस्था आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते, लहान पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. नांदगाव, उमरोली, बारापाडा, डोलघर, तुर्भे, करवले आदी गावांचा यामध्ये समावेश आहे. सायन-पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक धिमी झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्रातील नागझरी गावात अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ग्रामस्थांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. शहरातील मैदाने, उद्यानांना जणू गार्डनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कळंबोली, खारघर, तसेच पनवेल शहरातील काही भागात या वेळी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.\

 

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड