शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रायगडचे किनारे देताहेत स्थानिकांना रोजगार; सुविधांत वाढ केल्यास पर्यटक वाढतील

By निखिल म्हात्रे | Updated: May 19, 2024 14:08 IST

येथील सुविधांत वाढ केल्यास पर्यटक वाढतील, अशी अपेक्षा पर्यटकांकडूनही व्यक्त होत आहे.

अलिबाग : सुमद्रकिनाऱ्यावर वसलेल्या रायगडचे पर्यटन वाढत असून, येथील सुमद्रकिनारे यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे किनारे स्थानिकांना रोजगार देत आहेत. येथील सुविधांत वाढ केल्यास पर्यटक वाढतील, अशी अपेक्षा पर्यटकांकडूनही व्यक्त होत आहे.रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्व आहे. तसेच हा जिल्हा पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात अलिबाग, सारळ, सासवणे, आवास, किहीम, वरसोली, आक्षी, नागाव, चौल आणि रेवदंडा तसेच मुरुड तालुक्यातील काशिद, मुरुड, आगरदांडा, राजपुरी तर श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, श्रीहरिहरेश्वर, दिवेआगर, शेखाडी, बागमांडला, दिघी येथे समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. या समुद्रकिनाऱ्यांवर पाऊस वगळता पर्यटकांची वर्दळ कायम असते.

काही वर्षांपूर्वी हे किनारे फारसे गजबजलेले नसायचे; परंतु प्राचीन लेणी, गडकिल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे, गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक धार्मिक स्थळे आदी पर्यटन स्थळांवर गर्दी वाढू लागली आहे. स्थानिकांनी लॉजिंग बोर्डिंगसह व्हेज-नॉनव्हेज उपाहारगृहे, बोटिंग, विविध प्रकारची कटलरी सामान, लाँचसेवा, रो-रो सेवा, कोकण फूड बाजार, भेलपुरी, पाणीपुरी, कुल्फी, गोला व सरबत, नारळ पाणी, ताडगोळे, सुकी मासळी, विविध प्रकारच्या टोप्या, चहानाश्ता, लहान मुलांची खेळणी आदी व्यवसाय किनाऱ्यांवर सुरू झाल्याने पर्यटकांची सोय होण्याबरोबरच स्थानिकांना बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होत आहे. वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल होत आहे.करोना काळात दोन वर्षे शासनाने पर्यटकांना बंदी घातल्याने जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांसह सर्वच व्यवसाय ठप्प होते. यामुळे येथील व्यावसायिक कर्जबाजारी झाले होते. व्यवसायासाठी विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा हप्त भरणेही कठीण होऊन बसले होते. कामगारांना पगारही देता येत नसल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली होती. कोरोनाची बंदी उठल्यानंतर पर्यटनवाढीला चालना मिळाली आहे. त्यामुळे व्यवसायाने परत एकदा उभारी घेतली.आर्थिक मंदी व टाळेबंदीमुळे मागील चार वर्षांपासून समुद्रकिनाऱ्यावरील गर्दी रोडावली होती. मागील चार महिन्यांत पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्हा स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.- मंदार पावशे, स्थानिक व्यावसायिक.पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबरच पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणाबरोबरच समुद्रकिनारा, धार्मिक पर्यटनस्थळे, ऐतिहासिक पर्यटनस्थळे येथील मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न सोडविल्यास पर्यटकांची संख्या अधिक वाढू शकेल.- भारती पाटील, पर्यटक.