शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
5
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
6
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
7
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
8
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
9
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
10
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
11
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
12
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
13
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
14
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
15
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
16
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
17
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
18
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
19
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
20
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा

रायगडमध्ये खबरदारी घेतल्यानेच यंत्रणा सुदृढ; कोरोना वॉरियर्सचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:04 IST

पोलीस, आरोग्य, महसूल विभागात शिरकाव नाही

- आविष्कार देसार्ई अलिबाग : आरोग्य, पोलीस आणि महसूल प्रशासन अगदी फ्रंटवर उभे राहून कोरोनाचा मुकाबला करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते कोरोना विरोधातील लढाई लढत आहेत. मात्र या यंत्रणेतील योद्ध्यांना कोरोनाने मोठ्या संख्येने टार्गेट केलेले नाही. अपवाद फक्त महाड सरकारी रुग्णालयातील एका परिचारिकेचा आहे. सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेतल्यानेच कोरोना वॉरियर्स कोरोनापासून बचाव करण्यात यशस्वी ठरले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस, आरोग्य आणि महसूल विभागातील हजारो अधिकारी आणि कर्मचारी हे आपला जिल्हा कोरोनापासून सुरक्षित राहावा यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा थेट संबंध हा कोरोनाबाधित रुग्णांशी येत आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिसांनासुद्धा अद्याप कोरोनाने शिवलेलेदेखील नाही.

रायगड जिल्ह्यातील चेकपोस्टवरुन अद्यापर्यंत अडीच लाख चाकरमानी नागरिक जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ९०० हून अधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत, तर ३७ रुग्ण कोरोनाविरोधातील लढाई हरले आहेत. मृत पावलेले रुग्ण हे अन्य कोणत्या आजाराने त्रस्त असल्याने सहजपणे कोरोनाच्या मगरमिठीत अडकले.

ग्रामीण भागांमध्येदेखील आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी हेदेखील बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करताना त्यांच्या संपर्कात आले आहेत. मात्र त्यांनी योग्य ती खबरदारी घेतल्यानेच त्यांना कोरोनाची बाधा पोहोचलेली नाही. जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी हेदेखील कोरोनाविरोधातील लढाईत मागे राहिलेले नाहीत. त्यांनाही अद्याप कोरोना झाल्याचे आढळले नाही.

सर्वच यंत्रणांनी सक्षम असणे गरजेचे - निधी चौधरी

कोरोनाविरोधातील लढाई लढताना सेनाप्रमुख आणि सैन्य सक्षम असणे महत्त्वाचे आहे. हाच धागा पकडून रायगड जिल्ह्यात कोरोनाविरोधातील लढाई प्रशासकीय यंत्रणा लढताना दिसून येते. सॅनिटायझरचा वापर, मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेवणे याबाबत सर्वच यंत्रणांनी सक्षम असणे गरजेचे आहे. यासाठी प्रथम स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असल्याने तशा सूचना यंत्रणांना देण्यात आल्या होत्या, असे जिल्हाधिरी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले.कोरोनाचा मुकाबला करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, त्याचबरोबर ती सरकार आणि प्रशासनाचीही आहे. नागरिकांची काळजी घेताना पोलीस, आरोग्य आणि महसूल, जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी कोरोनापासून सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यामुळे जनतेची काळजी घेताना प्रथम आपली काळजी घेण्याबाबत आधीपासूनच सूचना देण्यात आल्या होत्या. लवकरच या संकटातून आपण बाहेर पडू.- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

टॅग्स :RaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस