शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

रायगडमध्ये खबरदारी घेतल्यानेच यंत्रणा सुदृढ; कोरोना वॉरियर्सचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:04 IST

पोलीस, आरोग्य, महसूल विभागात शिरकाव नाही

- आविष्कार देसार्ई अलिबाग : आरोग्य, पोलीस आणि महसूल प्रशासन अगदी फ्रंटवर उभे राहून कोरोनाचा मुकाबला करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते कोरोना विरोधातील लढाई लढत आहेत. मात्र या यंत्रणेतील योद्ध्यांना कोरोनाने मोठ्या संख्येने टार्गेट केलेले नाही. अपवाद फक्त महाड सरकारी रुग्णालयातील एका परिचारिकेचा आहे. सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेतल्यानेच कोरोना वॉरियर्स कोरोनापासून बचाव करण्यात यशस्वी ठरले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस, आरोग्य आणि महसूल विभागातील हजारो अधिकारी आणि कर्मचारी हे आपला जिल्हा कोरोनापासून सुरक्षित राहावा यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा थेट संबंध हा कोरोनाबाधित रुग्णांशी येत आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिसांनासुद्धा अद्याप कोरोनाने शिवलेलेदेखील नाही.

रायगड जिल्ह्यातील चेकपोस्टवरुन अद्यापर्यंत अडीच लाख चाकरमानी नागरिक जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ९०० हून अधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत, तर ३७ रुग्ण कोरोनाविरोधातील लढाई हरले आहेत. मृत पावलेले रुग्ण हे अन्य कोणत्या आजाराने त्रस्त असल्याने सहजपणे कोरोनाच्या मगरमिठीत अडकले.

ग्रामीण भागांमध्येदेखील आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी हेदेखील बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करताना त्यांच्या संपर्कात आले आहेत. मात्र त्यांनी योग्य ती खबरदारी घेतल्यानेच त्यांना कोरोनाची बाधा पोहोचलेली नाही. जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी हेदेखील कोरोनाविरोधातील लढाईत मागे राहिलेले नाहीत. त्यांनाही अद्याप कोरोना झाल्याचे आढळले नाही.

सर्वच यंत्रणांनी सक्षम असणे गरजेचे - निधी चौधरी

कोरोनाविरोधातील लढाई लढताना सेनाप्रमुख आणि सैन्य सक्षम असणे महत्त्वाचे आहे. हाच धागा पकडून रायगड जिल्ह्यात कोरोनाविरोधातील लढाई प्रशासकीय यंत्रणा लढताना दिसून येते. सॅनिटायझरचा वापर, मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेवणे याबाबत सर्वच यंत्रणांनी सक्षम असणे गरजेचे आहे. यासाठी प्रथम स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असल्याने तशा सूचना यंत्रणांना देण्यात आल्या होत्या, असे जिल्हाधिरी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले.कोरोनाचा मुकाबला करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, त्याचबरोबर ती सरकार आणि प्रशासनाचीही आहे. नागरिकांची काळजी घेताना पोलीस, आरोग्य आणि महसूल, जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी कोरोनापासून सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यामुळे जनतेची काळजी घेताना प्रथम आपली काळजी घेण्याबाबत आधीपासूनच सूचना देण्यात आल्या होत्या. लवकरच या संकटातून आपण बाहेर पडू.- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

टॅग्स :RaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस