शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

रायगडमध्ये खबरदारी घेतल्यानेच यंत्रणा सुदृढ; कोरोना वॉरियर्सचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:04 IST

पोलीस, आरोग्य, महसूल विभागात शिरकाव नाही

- आविष्कार देसार्ई अलिबाग : आरोग्य, पोलीस आणि महसूल प्रशासन अगदी फ्रंटवर उभे राहून कोरोनाचा मुकाबला करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते कोरोना विरोधातील लढाई लढत आहेत. मात्र या यंत्रणेतील योद्ध्यांना कोरोनाने मोठ्या संख्येने टार्गेट केलेले नाही. अपवाद फक्त महाड सरकारी रुग्णालयातील एका परिचारिकेचा आहे. सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेतल्यानेच कोरोना वॉरियर्स कोरोनापासून बचाव करण्यात यशस्वी ठरले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस, आरोग्य आणि महसूल विभागातील हजारो अधिकारी आणि कर्मचारी हे आपला जिल्हा कोरोनापासून सुरक्षित राहावा यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा थेट संबंध हा कोरोनाबाधित रुग्णांशी येत आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिसांनासुद्धा अद्याप कोरोनाने शिवलेलेदेखील नाही.

रायगड जिल्ह्यातील चेकपोस्टवरुन अद्यापर्यंत अडीच लाख चाकरमानी नागरिक जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ९०० हून अधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत, तर ३७ रुग्ण कोरोनाविरोधातील लढाई हरले आहेत. मृत पावलेले रुग्ण हे अन्य कोणत्या आजाराने त्रस्त असल्याने सहजपणे कोरोनाच्या मगरमिठीत अडकले.

ग्रामीण भागांमध्येदेखील आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी हेदेखील बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करताना त्यांच्या संपर्कात आले आहेत. मात्र त्यांनी योग्य ती खबरदारी घेतल्यानेच त्यांना कोरोनाची बाधा पोहोचलेली नाही. जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी हेदेखील कोरोनाविरोधातील लढाईत मागे राहिलेले नाहीत. त्यांनाही अद्याप कोरोना झाल्याचे आढळले नाही.

सर्वच यंत्रणांनी सक्षम असणे गरजेचे - निधी चौधरी

कोरोनाविरोधातील लढाई लढताना सेनाप्रमुख आणि सैन्य सक्षम असणे महत्त्वाचे आहे. हाच धागा पकडून रायगड जिल्ह्यात कोरोनाविरोधातील लढाई प्रशासकीय यंत्रणा लढताना दिसून येते. सॅनिटायझरचा वापर, मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेवणे याबाबत सर्वच यंत्रणांनी सक्षम असणे गरजेचे आहे. यासाठी प्रथम स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असल्याने तशा सूचना यंत्रणांना देण्यात आल्या होत्या, असे जिल्हाधिरी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले.कोरोनाचा मुकाबला करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, त्याचबरोबर ती सरकार आणि प्रशासनाचीही आहे. नागरिकांची काळजी घेताना पोलीस, आरोग्य आणि महसूल, जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी कोरोनापासून सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यामुळे जनतेची काळजी घेताना प्रथम आपली काळजी घेण्याबाबत आधीपासूनच सूचना देण्यात आल्या होत्या. लवकरच या संकटातून आपण बाहेर पडू.- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

टॅग्स :RaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस