शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Raigad Landslides: कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही जायचे कुठे?; किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 10:55 IST

दुर्घटनाग्रस्त तळीये ग्रामस्थांचा सवाल; संपूर्ण गावावर शोककळा

ठळक मुद्देतळीये गावात ८५ ग्रामस्थ गावात होते. सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्यास सुरुवात होताच ग्रामस्थ एका घराच्या अंगणात येऊन थांबले होते. गावावर कोसळलेल्या संकटाची कल्पना येताच आपल्या घरच्यांच्या काळजीने जो-तो गावाकडे जाण्यास सुरू झाले. माणगावपर्यंत पुराच्या पाण्याने रस्ते अडकल्याने पुढे जाता येईना. पाणी ओसरण्याची वाट पाहत शेवटी घराकडे धाव घेतली.

निखिल म्हात्रेअलिबाग : एका क्षणात आई गेली, बाप गेला, गेली वाट अवखळ ती शोधू कुठे, बाप माझा रडत गेला त्याची असवे शोधू कुठे, अशी आर्त हाक घालत तळीये गावातील माहेरवाशीण रडत बसली आहे. संपूर्ण कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही आता यायचे कुठे, आमच्या भावना व्यक्त करायच्या कुठे, असे एक ना अनेक प्रश्न येथील लेकीबाळींना पडले आहेत. गुरुवारी सायंकाळी कोसळलेल्या दरडीखाली गायब झालेल्या ग्रामस्थांच्या लेकीबाळी, मुले दुर्घटना समजल्यानंतर आकाशालाही पाझर फुटेल, अशा स्वरात हंबरडा फोडत रडत असल्याचे पाहून मन सुन्न झाले.

तळीये गावात ८५ ग्रामस्थ गावात होते. सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्यास सुरुवात होताच ग्रामस्थ एका घराच्या अंगणात येऊन थांबले होते. आपला संसार डोंगर गिळणार या कल्पनेने गावातून पायदेखील निघत नव्हता. पण पाठीमागे मृत्यू दिसत असल्याने पळायच्या तयारीत असणाऱ्या अबालवृद्ध, महिला व पुरुष यांना डोंगराने आपल्या मगरमिठीत ओढले. क्षणार्धात नांदत असलेला तळीये गाव डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गायब झाला. त्यामुळे मागे राहिलेल्या मुलांना आज आपले आई-वडील, नातेवाईक आपल्यामध्ये नसल्याचे दु:ख मोठ्या प्रमाणात झाले आहे.

किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झालानोकरी व्यवसायानिमित्त गावाबाहेर असलेल्या चाकरमान्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गावावर कोसळलेल्या संकटाची कल्पना येताच आपल्या घरच्यांच्या काळजीने जो-तो गावाकडे जाण्यास सुरू झाले. पण माणगावपर्यंत पुराच्या पाण्याने रस्ते अडकल्याने पुढे जाता येईना. पाणी ओसरण्याची वाट पाहत शेवटी घराकडे धाव घेतली. अनेक संकटांवर मात करीत कसाबसा रस्ता तुडवीत पोहोचलेल्या डोळ्यांना आपले गाव, वाडी, घरे शोधूनही सापडली नाहीत. पळत सुटलेल्या २२ जणांना सोबत घेऊन गेलेला डोंगर बौद्ध वाडीमध्ये थेट मृतदेहच हाती आले. एवढे मोठे ३२ घरांचे गावच्या गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली नाहीसे झाले. त्यामुळे मोठी जीवित व आर्थिक हानी झाली आहे. मात्र सोडून गेलेल्या नातेवाइकांना आता भेटायचे कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनRaigadरायगडfloodपूर