शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

Raigad Landslides: कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही जायचे कुठे?; किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 10:55 IST

दुर्घटनाग्रस्त तळीये ग्रामस्थांचा सवाल; संपूर्ण गावावर शोककळा

ठळक मुद्देतळीये गावात ८५ ग्रामस्थ गावात होते. सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्यास सुरुवात होताच ग्रामस्थ एका घराच्या अंगणात येऊन थांबले होते. गावावर कोसळलेल्या संकटाची कल्पना येताच आपल्या घरच्यांच्या काळजीने जो-तो गावाकडे जाण्यास सुरू झाले. माणगावपर्यंत पुराच्या पाण्याने रस्ते अडकल्याने पुढे जाता येईना. पाणी ओसरण्याची वाट पाहत शेवटी घराकडे धाव घेतली.

निखिल म्हात्रेअलिबाग : एका क्षणात आई गेली, बाप गेला, गेली वाट अवखळ ती शोधू कुठे, बाप माझा रडत गेला त्याची असवे शोधू कुठे, अशी आर्त हाक घालत तळीये गावातील माहेरवाशीण रडत बसली आहे. संपूर्ण कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही आता यायचे कुठे, आमच्या भावना व्यक्त करायच्या कुठे, असे एक ना अनेक प्रश्न येथील लेकीबाळींना पडले आहेत. गुरुवारी सायंकाळी कोसळलेल्या दरडीखाली गायब झालेल्या ग्रामस्थांच्या लेकीबाळी, मुले दुर्घटना समजल्यानंतर आकाशालाही पाझर फुटेल, अशा स्वरात हंबरडा फोडत रडत असल्याचे पाहून मन सुन्न झाले.

तळीये गावात ८५ ग्रामस्थ गावात होते. सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्यास सुरुवात होताच ग्रामस्थ एका घराच्या अंगणात येऊन थांबले होते. आपला संसार डोंगर गिळणार या कल्पनेने गावातून पायदेखील निघत नव्हता. पण पाठीमागे मृत्यू दिसत असल्याने पळायच्या तयारीत असणाऱ्या अबालवृद्ध, महिला व पुरुष यांना डोंगराने आपल्या मगरमिठीत ओढले. क्षणार्धात नांदत असलेला तळीये गाव डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गायब झाला. त्यामुळे मागे राहिलेल्या मुलांना आज आपले आई-वडील, नातेवाईक आपल्यामध्ये नसल्याचे दु:ख मोठ्या प्रमाणात झाले आहे.

किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झालानोकरी व्यवसायानिमित्त गावाबाहेर असलेल्या चाकरमान्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गावावर कोसळलेल्या संकटाची कल्पना येताच आपल्या घरच्यांच्या काळजीने जो-तो गावाकडे जाण्यास सुरू झाले. पण माणगावपर्यंत पुराच्या पाण्याने रस्ते अडकल्याने पुढे जाता येईना. पाणी ओसरण्याची वाट पाहत शेवटी घराकडे धाव घेतली. अनेक संकटांवर मात करीत कसाबसा रस्ता तुडवीत पोहोचलेल्या डोळ्यांना आपले गाव, वाडी, घरे शोधूनही सापडली नाहीत. पळत सुटलेल्या २२ जणांना सोबत घेऊन गेलेला डोंगर बौद्ध वाडीमध्ये थेट मृतदेहच हाती आले. एवढे मोठे ३२ घरांचे गावच्या गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली नाहीसे झाले. त्यामुळे मोठी जीवित व आर्थिक हानी झाली आहे. मात्र सोडून गेलेल्या नातेवाइकांना आता भेटायचे कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनRaigadरायगडfloodपूर