शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

रायगडमध्ये लालपरी पुन्हा धावली रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 00:40 IST

एसटी सुरू करताना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून ही सेवा प्रवाशांना द्यायची आहे. रायगड जिल्ह्यातील आठ आगारांतून या ३६ बसेस सुरू करण्यात आल्या असून, रोज ३२४ फेऱ्या होणार आहेत.

 अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने २२ मार्चपासून संचारबंदी लागू केली होती. सार्वजनिक एसटी बस वाहतूकही बंद झाली होती. मात्र, आता राज्य परिवहन महामंडळाने दोन महिन्यांनंतर रेड आणि कंटेन्मेंट झोन वगळता जिल्हाअंतर्गत एसटी बस सेवा २२ मेपासून सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात शुक्रवारपासून लालपरी पुन्हा एकदा रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली.एसटी सुरू करताना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून ही सेवा प्रवाशांना द्यायची आहे. रायगड जिल्ह्यातील आठ आगारांतून या ३६ बसेस सुरू करण्यात आल्या असून, रोज ३२४ फेऱ्या होणार आहेत. २२ मार्चपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली. कोरोना हा गर्दीच्या ठिकाणी वाढण्याची शक्यता असल्याने सर्व वाहतूक सेवाही बंद करण्यात आल्या. त्यामुळे एसटी बससेवाही बंद झाली होती. त्यामुळे कोट्यवधीचा आर्थिक फटका हा राज्य परिवहन महामंडळाला सहन करावा लागला आहे. मात्र, आता परिवहनमंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून एसटी रस्त्यावर धावताना दिसून येत आहेत. एसटी बस या निर्जंतुकीकरण करून प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ५० टक्के प्रवासी बसमध्ये घेतले जाणार आहेत. अलिबाग आगारातून प्रथम अलिबाग-पेण, अलिबाग-रेवदंडा, अलिबाग-रोहा या एसटी बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच महत्त्वाचे असेल तरच प्रवाशांनी बसने प्रवास करा, असे आवाहनही अलिबाग आगारप्रमुख ए. व्ही. वनारसे यांनी केले आहे.प्रवाशांचाअल्प प्रतिसादअलिबाग : लॉकडाउनमुळे मिळालेल्या सक्तीच्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर एसटी रस्त्यावर धावली. मात्र, पहिल्याच दिवशी या लालपरीलाही प्रवाशांनी अल्प प्रतिसाद दिला.नियोजित फेऱ्यांपैकी केवळ ७० फेºयाच चालवण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.अलिबाग आगारातून सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमारास अलिबाग-पेण, मुरुड आगारातून मुरुड-अलिबाग, पेण आगारातून दुपारी पेण-पाली, अशा बसेस सोडण्यात आल्या.अटी-शर्तीवर एसटी सुरूसामाजिक अंतर राखून प्रवाशांनी एसटीमध्ये बसणे. ज्येष्ठ नागरिक तसेच १० वर्षांखालील मुलांना एसटी प्रवासाला बंदी करणे.बसमध्ये बसण्यापूर्वी मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधणे, तसेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे, अशा अटी शर्तीवर एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Raigadरायगड