शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

रायगडमध्ये लालपरी पुन्हा धावली रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 00:40 IST

एसटी सुरू करताना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून ही सेवा प्रवाशांना द्यायची आहे. रायगड जिल्ह्यातील आठ आगारांतून या ३६ बसेस सुरू करण्यात आल्या असून, रोज ३२४ फेऱ्या होणार आहेत.

 अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने २२ मार्चपासून संचारबंदी लागू केली होती. सार्वजनिक एसटी बस वाहतूकही बंद झाली होती. मात्र, आता राज्य परिवहन महामंडळाने दोन महिन्यांनंतर रेड आणि कंटेन्मेंट झोन वगळता जिल्हाअंतर्गत एसटी बस सेवा २२ मेपासून सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात शुक्रवारपासून लालपरी पुन्हा एकदा रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली.एसटी सुरू करताना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून ही सेवा प्रवाशांना द्यायची आहे. रायगड जिल्ह्यातील आठ आगारांतून या ३६ बसेस सुरू करण्यात आल्या असून, रोज ३२४ फेऱ्या होणार आहेत. २२ मार्चपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली. कोरोना हा गर्दीच्या ठिकाणी वाढण्याची शक्यता असल्याने सर्व वाहतूक सेवाही बंद करण्यात आल्या. त्यामुळे एसटी बससेवाही बंद झाली होती. त्यामुळे कोट्यवधीचा आर्थिक फटका हा राज्य परिवहन महामंडळाला सहन करावा लागला आहे. मात्र, आता परिवहनमंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून एसटी रस्त्यावर धावताना दिसून येत आहेत. एसटी बस या निर्जंतुकीकरण करून प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ५० टक्के प्रवासी बसमध्ये घेतले जाणार आहेत. अलिबाग आगारातून प्रथम अलिबाग-पेण, अलिबाग-रेवदंडा, अलिबाग-रोहा या एसटी बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच महत्त्वाचे असेल तरच प्रवाशांनी बसने प्रवास करा, असे आवाहनही अलिबाग आगारप्रमुख ए. व्ही. वनारसे यांनी केले आहे.प्रवाशांचाअल्प प्रतिसादअलिबाग : लॉकडाउनमुळे मिळालेल्या सक्तीच्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर एसटी रस्त्यावर धावली. मात्र, पहिल्याच दिवशी या लालपरीलाही प्रवाशांनी अल्प प्रतिसाद दिला.नियोजित फेऱ्यांपैकी केवळ ७० फेºयाच चालवण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.अलिबाग आगारातून सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमारास अलिबाग-पेण, मुरुड आगारातून मुरुड-अलिबाग, पेण आगारातून दुपारी पेण-पाली, अशा बसेस सोडण्यात आल्या.अटी-शर्तीवर एसटी सुरूसामाजिक अंतर राखून प्रवाशांनी एसटीमध्ये बसणे. ज्येष्ठ नागरिक तसेच १० वर्षांखालील मुलांना एसटी प्रवासाला बंदी करणे.बसमध्ये बसण्यापूर्वी मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधणे, तसेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे, अशा अटी शर्तीवर एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Raigadरायगड