शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत १६ मृत्यू; डोंगरावरच मृतदेह दफन करण्याचं काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 08:16 IST

घटनास्थळी पोहचण्यासाठी रस्ता नसल्याने कुठलीही मशिनरी तिथपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे अपुऱ्या साहित्यामुळे मलबा बाजूला सारणे मोठे आव्हानात्मक झाले आहे.

रायगड – खालापूरनजीक इर्शाळवाडी इथं दरड कोसळल्याने अख्खं गाव जमीनदोस्त झाले. याठिकाणी ढिगाऱ्याखाली बरेच लोक गाडले गेले. बुधवारी मध्यरात्रीपासून इर्शाळवाडीत शोधमोहिम सुरू आहे. NDRF पथके आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेतील जखमींवर नवी मुंबई इथं उपचार करण्यात येत आहेत. घटनास्थळी पोहचण्यासाठी कुठलीही सोय नसल्याने तासभर पायपीट करावी लागते. याठिकाणी जवळपास १०-१५ फूट मातीचा थर असल्याने बचाव पथकाला अडथळे येत आहेत.

घटनास्थळी पोहचण्यासाठी रस्ता नसल्याने कुठलीही मशिनरी तिथपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे अपुऱ्या साहित्यामुळे मलबा बाजूला सारणे मोठे आव्हानात्मक झाले आहे. गुरुवारी संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा भूस्खलन होऊ नये यासाठी शोधकार्य थांबवले होते. आज पुन्हा सकाळी एनडीआरएफचे पथक आणि कर्मचारी घटनास्थळी शोधमोहिम सुरू करणार आहेत. २ दिवस उलटल्याने आता ढिगाऱ्याखाली कुणी जिवंत असण्याची आशा मावळली आहे. याठिकाणी मृतदेह बाहेर काढून तिथेच बाजूला खड्डा खणून त्यात दफन केले जात आहे. अद्यापही ६० हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली असल्याचा संशय आहे. आजचा दिवस शोधकार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

इर्शाळवाडीतील लोक स्थलांतरीत होणार होते, पण...

कोकणात पडणारा मुसळधार पाऊस आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेलं गाव ही सगळीच धोकादायक स्थिती असल्याने ग्रामस्थांना तिथून स्थलांतरीत होण्यास सांगितले होते. नवीन जागेसाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव करूया. आमच्याच गावात शंभर एकर परिसर आहे. तिथे इर्शाळवाडी ग्रामस्थांसाठी नवीन घरे बांधण्याचा प्रस्ताव होता परंतु त्याआधीच असे काही विपरीत घडेल याची कल्पना तिथल्या कुणाही ग्रामस्थांना नव्हती अशी माहिती सरपंच रितू ठोंबरे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लोकांचा प्रतिसाद

ही दुर्घटना घडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहचले होते. सकाळपासून त्यांनी याठिकाणी आढावा घेतला. तासभर पायपीट करत स्वत: दुर्घटनास्थळी पोहचले. तिथल्या पीडित कुटुंबांची विचारपूस केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकांना मदतीचे आवाहन केले होते त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांबरोबरच मदतकार्यासाठी तैनात मनुष्यबळासाठी अन्नाची पाकिटे, चादरी-ब्लॅंकेटस, तात्पुरते निवारे, कंटेनर, पाण्याच्या बाटल्या, टॉर्च, बिस्किटे तसेच प्रथमोपचार साहित्य आदी मदत साहित्याचा ओघ सुरु झाला आहे. २० बाय १० आकाराचे ४, ४० बाय १० आकाराचे २ आणि इतर दोन असे ६ कंटेनर उरण, जेएनपीटी, रत्नागिरी एमआयडीसी आणि जेएसडब्ल्यू समूहाकडून घटनास्थळावरील बेसकॅम्पकडे रवाना झाले आहेत. चौक, खालापूर येथे तात्पुरती निवाराव्यवस्था प्रशासनाच्या वतीने केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर तीन हजार अन्नाची पाकिटे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. घटनास्थळ उंचीवर असल्याने यंत्रसामुग्री पोहोचत नसल्याने मातीचे ढिगारे दूर करण्यासाठी पनवेल येथून ८० अनुभवी कारागीरांचे पथक अवजारांसह घटनास्थळी पोहोचले आहे.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण