शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत १६ मृत्यू; डोंगरावरच मृतदेह दफन करण्याचं काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 08:16 IST

घटनास्थळी पोहचण्यासाठी रस्ता नसल्याने कुठलीही मशिनरी तिथपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे अपुऱ्या साहित्यामुळे मलबा बाजूला सारणे मोठे आव्हानात्मक झाले आहे.

रायगड – खालापूरनजीक इर्शाळवाडी इथं दरड कोसळल्याने अख्खं गाव जमीनदोस्त झाले. याठिकाणी ढिगाऱ्याखाली बरेच लोक गाडले गेले. बुधवारी मध्यरात्रीपासून इर्शाळवाडीत शोधमोहिम सुरू आहे. NDRF पथके आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेतील जखमींवर नवी मुंबई इथं उपचार करण्यात येत आहेत. घटनास्थळी पोहचण्यासाठी कुठलीही सोय नसल्याने तासभर पायपीट करावी लागते. याठिकाणी जवळपास १०-१५ फूट मातीचा थर असल्याने बचाव पथकाला अडथळे येत आहेत.

घटनास्थळी पोहचण्यासाठी रस्ता नसल्याने कुठलीही मशिनरी तिथपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे अपुऱ्या साहित्यामुळे मलबा बाजूला सारणे मोठे आव्हानात्मक झाले आहे. गुरुवारी संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा भूस्खलन होऊ नये यासाठी शोधकार्य थांबवले होते. आज पुन्हा सकाळी एनडीआरएफचे पथक आणि कर्मचारी घटनास्थळी शोधमोहिम सुरू करणार आहेत. २ दिवस उलटल्याने आता ढिगाऱ्याखाली कुणी जिवंत असण्याची आशा मावळली आहे. याठिकाणी मृतदेह बाहेर काढून तिथेच बाजूला खड्डा खणून त्यात दफन केले जात आहे. अद्यापही ६० हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली असल्याचा संशय आहे. आजचा दिवस शोधकार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

इर्शाळवाडीतील लोक स्थलांतरीत होणार होते, पण...

कोकणात पडणारा मुसळधार पाऊस आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेलं गाव ही सगळीच धोकादायक स्थिती असल्याने ग्रामस्थांना तिथून स्थलांतरीत होण्यास सांगितले होते. नवीन जागेसाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव करूया. आमच्याच गावात शंभर एकर परिसर आहे. तिथे इर्शाळवाडी ग्रामस्थांसाठी नवीन घरे बांधण्याचा प्रस्ताव होता परंतु त्याआधीच असे काही विपरीत घडेल याची कल्पना तिथल्या कुणाही ग्रामस्थांना नव्हती अशी माहिती सरपंच रितू ठोंबरे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लोकांचा प्रतिसाद

ही दुर्घटना घडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहचले होते. सकाळपासून त्यांनी याठिकाणी आढावा घेतला. तासभर पायपीट करत स्वत: दुर्घटनास्थळी पोहचले. तिथल्या पीडित कुटुंबांची विचारपूस केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकांना मदतीचे आवाहन केले होते त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांबरोबरच मदतकार्यासाठी तैनात मनुष्यबळासाठी अन्नाची पाकिटे, चादरी-ब्लॅंकेटस, तात्पुरते निवारे, कंटेनर, पाण्याच्या बाटल्या, टॉर्च, बिस्किटे तसेच प्रथमोपचार साहित्य आदी मदत साहित्याचा ओघ सुरु झाला आहे. २० बाय १० आकाराचे ४, ४० बाय १० आकाराचे २ आणि इतर दोन असे ६ कंटेनर उरण, जेएनपीटी, रत्नागिरी एमआयडीसी आणि जेएसडब्ल्यू समूहाकडून घटनास्थळावरील बेसकॅम्पकडे रवाना झाले आहेत. चौक, खालापूर येथे तात्पुरती निवाराव्यवस्था प्रशासनाच्या वतीने केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर तीन हजार अन्नाची पाकिटे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. घटनास्थळ उंचीवर असल्याने यंत्रसामुग्री पोहोचत नसल्याने मातीचे ढिगारे दूर करण्यासाठी पनवेल येथून ८० अनुभवी कारागीरांचे पथक अवजारांसह घटनास्थळी पोहोचले आहे.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण