शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

रायगडात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

By admin | Updated: February 20, 2017 06:27 IST

रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. गेल्या सहा दिवसांपासून

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. गेल्या सहा दिवसांपासून विविध राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत रायगडच्या राजकारणाचे रणांगण चांगलेच तापवले होते. छुप्या प्रचारावर भर देऊन मतदारराजापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यात कोट्यधीश उमेदवारांची कमतरता नाही. याच कालावधीत मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैसा, विविध वस्तूंचे प्रलोभन दाखविण्यात येणार असल्याच्या शक्यतेने निवडणूक विभागाने आपले लक्ष त्याकडे केंद्रित केले आहे.जिल्हा परिषदेच्या ५९ आणि पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १८३ उमेदवार, तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३७४ असे एकूण ५५७ उमेदवार आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये जुन्या-नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. सर्वच राजकीय पक्षांनी गेले सहा दिवस प्रचाराचा धुरळा उडवून दिलेला आहे. त्यासाठी त्यांनी आपापल्या वरिष्ठ नेत्यांना रणांगणात उतरवले होते. जिल्हा परिषदेवर आपलीच सत्ता यावी यासाठी कोणताही एकच पक्ष सक्षम नसल्यानेच त्यांनी सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केलेले नाहीत. शिवसेनेने ४५ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. जिल्ह्यात कमकुवत असणाऱ्या भाजपाने तब्बल ३९ उमेदवारांची फौज रणांगणात उतरवली आहे. शेकापने ३७, राष्ट्रवादी काँग्रेस २४ आणि काँग्रेसने २० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. युती अथवा आघाडीच्या माध्यमातून निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या संख्याबळावर सत्ता स्थापनेची गणिते अवलंबून आहेत. दोन राजकीय पक्षांच्या निवडून येणाऱ्या जागा अधिक अन्य एका पक्षाची मदत घेण्याची वेळ कदाचित येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन राजकीय पक्षांकडे सत्तेच्या बेरजेचे संख्याबळ घुटमळणार असल्याने दोन राजकीय पक्षांना शिवतीर्थावर सत्तास्थापनेचा दावा करणे शक्य नसल्याचे सध्यातरी दिसून येते. शेकाप आणि राष्ट्रवादी यांची सत्ता आहे, तर शिवसेनेने काँग्रेस, भाजपा यांच्या हातात हात घातला आहे. त्यामुळे शेकाप-राष्ट्रवादीला संख्याबळ कमी पडल्यास शिवसेना मदत करणार नाही, तर अन्य एका राजकीय पक्षाची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. तो अन्य पक्ष काँग्रेस असण्याची शक्यता आहे. शिवसेनेला सत्तेचे समीकरण जुळवून आणायचे असल्यास त्यांना शेकाप आणि राष्ट्रवादीत फूट पाडावी लागेल, परंतु शेकाप आणि राष्ट्रवादी यांची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने तसे काही होईल असे वाटत नसले, तरी राजकारणात नेहमी नवीन घडत असते, एवढे मात्र खरे आहे.जिल्ह्यामध्ये चोख पोलीस बंदोबस्त1अलिबाग : मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांकरिता तर जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या एकूण ११८ जागांकरिता होणारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.2सराईत गुन्हेगार, सार्वजनिक शांतता भंग आणि समाजविघातक कृत्ये केल्याचा पूर्वइतिहास अत्यंत काळजीपूर्वक तपासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानपूर्व बंदोबस्ताचा महत्त्वाचा भाग म्हणून तब्बल १ हजार ७६० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली आहे.3प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत फौजदारी दंड प्रक्रि या संहिता कलम १४४(१)व (३) अन्वये ७० जणांवर कारवाई करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात हद्दपार करण्यात आले आहेत. फौजदारी दंड प्रक्रि या संहिता कलम १०७ अन्वये १ हजार ९३ जणांवर तर फौजदारी दंड प्रक्रि या संहिता कलम १०९,११०,१५१,१५१(१) अन्वये १९६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक काळात शांतता भंग करू नये याकरिता ४०१ जणांना फौजदारी दंड प्रक्रि या संहिता कलम १४९ अन्वये तंबी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.4रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या बंदोबस्ताकरिता जिल्ह्यातील व बाहेरील एकूण १७३ पोलीस अधिकारी, १ हजार ८९३ पोलीस कर्मचारी, १७ दंगल नियंत्रण पथके, २० शीघ्र प्रतिसाद पथके, ५५० होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी , १३७ बिनतारी संदेश यंत्रणायुक्त वाहने, असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 5या नियुक्त पोलीस बंदोबस्ता तील अधिकारी व कर्मचारी हे मतदान केंद्र, मतदान विभाग, झोन पेट्रोलिंगकरिता तसेच जिल्ह्यात मतदानाच्या वेळी काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास अपर पोलीस अधीक्षक व नियंत्रण कक्ष यांच्या अधिपत्याखाली विशेष पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.९९ दारूबंदी गुन्हे दाखलरायगड जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशी-विदेशी व गावठी दारू निर्मिती व विक्र ी करणाऱ्यांवर दारूबंदी कायद्यांतर्गत आतापर्यंत ९९ गुन्हे दाखल करून, त्यांच्याकडून २५ लाख २६ हजार ७५६ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.नागरिकांकरिता तत्काळ हेल्पलाइनरायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये व निवडणूक शांततेत पार पडावी याकरिता रायगड पोलीस दल सज्ज आहे. पोलिसांनी त्यासाठी तयारीला ही सुरु वात के ली आहे.रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोणतीही समस्या अथवा प्रश्न उद्भवल्यास मतदार वा नागरिकांनी तत्काळ रायगड पोलीस नियंत्रण कक्ष हेल्पलाइन ०२१४१-२२८४७३, मोबाइल- ७०५७६७२२२६, ७०५७६७२२२७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले आहे. निवडणूक काळात मतदार आणि नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असेही अनिल पारसकर यांनी सांगितले आहे.