शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये घरोघरी उत्साहात झाले गौरींचे पूजन; महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 23:27 IST

जिल्ह्याभरात १४ हजार ४२३ गौरींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना

अलिबाग : गणरायाच्या आगमनानंतर रायगडात मोठ्या उत्साहाने बुधवारी गौरार्इंचे घरोघरी स्वागत करून पूजन करण्यात आले आहे. गौरी आगमनामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विघ्नहर्त्या गणरायाची माता असणाऱ्या पार्वतीचे, सोनपावलाने ज्येष्ठा गौरी म्हणून मनोभावे पूजन केले गेले. जिल्हाभरात १४ हजार ४२३ गौरींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, सुवासिनींच्या हस्ते पूजन झाले आहे. गौरीच्या आगमनामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कोकणात परंपरेनुसार माळरानावरून तेरड्याच्या गौरींचे घरोघरी वाजतगाजत आगमन झाले. त्यानंतर, गौरी सजविण्यात आल्या. वस्त्रालंकारांचा साजश्रृंगार चढविण्यात आला. भेंडीच्या फुलांनी पूजा करण्यात आली. महिलांनी गौराईची सामूहिक आरती केली. तिला आवडणाºया भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. जेवणानंतर गौरीचे स्तवन झाले. महिलांची नाचगाणी, फुगड्या आदी खेळांना रंगत आली. गौरींच्या आगमनामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, गौरीच्या सणासाठी महिला मोठ्या संख्येने माहेरी आल्या आहेत. बुधवारी गौरीपूजन, तसेच तिखटाचा सण केला गेला. महिलांनी नाचगाणी फुगड्या खेळून रंगत आणली, तर काही ठिकाणी गौरींसाठी सोशल डिस्टंन्सचे पालन करून भजन कीर्तनासह इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.पौराणिक गीतांवर नृत्य करण्याची प्रथामाहेरी आलेल्या गौरीला निरोप देताना पौराणिक आख्यान गीतांवर नृत्य करण्याची प्रथा शतकानुशतके सुरू आहे. ग्रामदेवतेच्या पुढे गौरीची प्रतिमा डोक्यावर घेऊन पुरुष गौरीकथा आणि महात्म्य उपस्थितांपुढे मांडतात आणि नंतरच नदीत तिचे विसर्जन केले जाते. ही शतकोनुशतके परंपरा अव्याहत सुरू होती. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा आता खंडित झाली आहे. येथील शेतकऱ्यांची अशी धारणा आहे की, गौर त्यांच्या घरी येते ती माहेरपणासाठी. तिला आवडीचे पदार्थ दिले जातात. तिचे पूजन-अर्चन वंशवाढीसाठी आवश्यक असते, तसेच गौरीचे वर्णन कृषी संस्कृतीच्या विलोभनीय गीतांमधून केले जाते. हा उत्साह न्याराच आसतो.कुंतीने हे व्रत केल्याचेही या गीतांमधून सांगितले जाते. भेंडीच्या झाडांना फुले येतात, नद्या भरून वाहत असतात, तेव्हा गौरीचे आगमन होते, असे वर्णनही यावेळी गायलेल्या गीतांमधून व्यक्त होते. गौराईचा सण महिलांसाठी विशेष असतो. या वेळी माहेरपणाला आलेल्या गौराईचे सारे लाड पूरवले जातात. हि परंपरा फार जूनी आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव