शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
4
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
5
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
6
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
7
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
8
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
10
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
11
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
12
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
13
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
14
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
15
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
16
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
17
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
18
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
19
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
20
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Raigad: तीन आमदारांच्या पेचामुळे आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर, आमदार भरत गोगावले यांची खंत

By राजेश भोस्तेकर | Updated: August 16, 2023 22:42 IST

Bharat Gogawle: छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आहेत. असे मत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे.

- राजेश भोस्तेकर अलिबाग - छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आहेत. असे मत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. एकाने पत्नी आत्महत्या करेल, दुसऱ्याने राजीनामा देतो तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील असे आमदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गळ घातली. एकनाथ शिंदे हे पेचात पडल्याने त्यांना मंत्रिपद द्या असे सांगून आज पर्यंत मंत्रिपदापासून दूर राहिल्याची खंत आमदार भरत गोगावले यांनी बोलून दाखवली. शिवसैनिक, पदाधिकारी यांनी रात्री फोन बंद करून ठेवू नका असा सल्लाही गोगावले यांनी दिला आहे.

अलिबाग तालुक्यातील खानाव येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी बुधवारी १६ ऑगस्ट रोजी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी अनेक सरपंच, इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भरत गोगावले यांनी यावेळी सभेला संबोधिताना आपली खंत व्यक्त केली. तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. जनतेची सेवा करा, रात्री अपरात्री कोणाचा फोन आल्यास टाळू नका असा मोलाचा सल्लाही आमदार भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.'

अनंत गोंधळी आपण अमावस्या दिवशी पक्षात प्रवेश केला असून कोणावर अमावस्या उलटणार असा मिश्किल टोलाही विरोधकांना गोगावले यांनी मारला. मंत्री पदापासून दूर का राहिलो याबाबत ही गोगावले यांनी स्पष्टीकरण दिले. पहिल्या यादीत माझे नाव होते. मात्र तीन आमदार यांनी आपली समस्या मुख्यमंत्री याना सांगितली. एकाने मंत्रिपद न मिळाल्यास पत्नी आत्महत्या करेल, तर दुसऱ्याने मी राजीनामा देतो असे सांगितले. तर तिसऱ्याने मला मंत्रिपद मिळाले नाही तर नारायण राणे संपवतील असे सांगितले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर पेच निर्माण झाल्याने अखेर मी त्यांना मंत्री करा असे सांगून बाजूला झालो. मात्र त्याबाबत मला बोलणी खावी लागत असल्याची खंत भरत गोगावले यांनी भाषणातून बोलून दाखवली. 

रायगड जिल्ह्यातून अनेक दिग्गज पुढील काळात शिवसेनेत येत आहेत. अलिबाग तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींना विकास कामासाठी दीडशे कोटी दिले. आधीच्या आमदारांनी विकास कामे केली नाहीत. त्यामुळे आज शेकाप हा संपत चाललेला पक्ष आहे. आम्ही जनतेची सेवा करीत असल्याने लोक आमच्या सोबत आहेत. अनंत गोंधळी यांच्या पक्ष प्रवेशाने यापरिसरतील असलेला शेकाप ही संपत आला आहे. उसर येथील गेल, एच पी कंपनीत स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी भाषणातून दिली. उमटे धरणासाठी १४१ कोटी निधी मंजूर केला असून सांबर कुंड धरणासाठी २ हजार कोटी निधी मंजूर झाल्याचेही आमदार दळवी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :RaigadरायगडShiv Senaशिवसेना