शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

Raigad: तीन आमदारांच्या पेचामुळे आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर, आमदार भरत गोगावले यांची खंत

By राजेश भोस्तेकर | Updated: August 16, 2023 22:42 IST

Bharat Gogawle: छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आहेत. असे मत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे.

- राजेश भोस्तेकर अलिबाग - छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आहेत. असे मत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. एकाने पत्नी आत्महत्या करेल, दुसऱ्याने राजीनामा देतो तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील असे आमदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गळ घातली. एकनाथ शिंदे हे पेचात पडल्याने त्यांना मंत्रिपद द्या असे सांगून आज पर्यंत मंत्रिपदापासून दूर राहिल्याची खंत आमदार भरत गोगावले यांनी बोलून दाखवली. शिवसैनिक, पदाधिकारी यांनी रात्री फोन बंद करून ठेवू नका असा सल्लाही गोगावले यांनी दिला आहे.

अलिबाग तालुक्यातील खानाव येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी बुधवारी १६ ऑगस्ट रोजी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी अनेक सरपंच, इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भरत गोगावले यांनी यावेळी सभेला संबोधिताना आपली खंत व्यक्त केली. तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. जनतेची सेवा करा, रात्री अपरात्री कोणाचा फोन आल्यास टाळू नका असा मोलाचा सल्लाही आमदार भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.'

अनंत गोंधळी आपण अमावस्या दिवशी पक्षात प्रवेश केला असून कोणावर अमावस्या उलटणार असा मिश्किल टोलाही विरोधकांना गोगावले यांनी मारला. मंत्री पदापासून दूर का राहिलो याबाबत ही गोगावले यांनी स्पष्टीकरण दिले. पहिल्या यादीत माझे नाव होते. मात्र तीन आमदार यांनी आपली समस्या मुख्यमंत्री याना सांगितली. एकाने मंत्रिपद न मिळाल्यास पत्नी आत्महत्या करेल, तर दुसऱ्याने मी राजीनामा देतो असे सांगितले. तर तिसऱ्याने मला मंत्रिपद मिळाले नाही तर नारायण राणे संपवतील असे सांगितले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर पेच निर्माण झाल्याने अखेर मी त्यांना मंत्री करा असे सांगून बाजूला झालो. मात्र त्याबाबत मला बोलणी खावी लागत असल्याची खंत भरत गोगावले यांनी भाषणातून बोलून दाखवली. 

रायगड जिल्ह्यातून अनेक दिग्गज पुढील काळात शिवसेनेत येत आहेत. अलिबाग तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींना विकास कामासाठी दीडशे कोटी दिले. आधीच्या आमदारांनी विकास कामे केली नाहीत. त्यामुळे आज शेकाप हा संपत चाललेला पक्ष आहे. आम्ही जनतेची सेवा करीत असल्याने लोक आमच्या सोबत आहेत. अनंत गोंधळी यांच्या पक्ष प्रवेशाने यापरिसरतील असलेला शेकाप ही संपत आला आहे. उसर येथील गेल, एच पी कंपनीत स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी भाषणातून दिली. उमटे धरणासाठी १४१ कोटी निधी मंजूर केला असून सांबर कुंड धरणासाठी २ हजार कोटी निधी मंजूर झाल्याचेही आमदार दळवी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :RaigadरायगडShiv Senaशिवसेना