शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

Raigad: तीन आमदारांच्या पेचामुळे आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर, आमदार भरत गोगावले यांची खंत

By राजेश भोस्तेकर | Updated: August 16, 2023 22:42 IST

Bharat Gogawle: छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आहेत. असे मत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे.

- राजेश भोस्तेकर अलिबाग - छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आहेत. असे मत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. एकाने पत्नी आत्महत्या करेल, दुसऱ्याने राजीनामा देतो तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील असे आमदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गळ घातली. एकनाथ शिंदे हे पेचात पडल्याने त्यांना मंत्रिपद द्या असे सांगून आज पर्यंत मंत्रिपदापासून दूर राहिल्याची खंत आमदार भरत गोगावले यांनी बोलून दाखवली. शिवसैनिक, पदाधिकारी यांनी रात्री फोन बंद करून ठेवू नका असा सल्लाही गोगावले यांनी दिला आहे.

अलिबाग तालुक्यातील खानाव येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी बुधवारी १६ ऑगस्ट रोजी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी अनेक सरपंच, इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भरत गोगावले यांनी यावेळी सभेला संबोधिताना आपली खंत व्यक्त केली. तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. जनतेची सेवा करा, रात्री अपरात्री कोणाचा फोन आल्यास टाळू नका असा मोलाचा सल्लाही आमदार भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.'

अनंत गोंधळी आपण अमावस्या दिवशी पक्षात प्रवेश केला असून कोणावर अमावस्या उलटणार असा मिश्किल टोलाही विरोधकांना गोगावले यांनी मारला. मंत्री पदापासून दूर का राहिलो याबाबत ही गोगावले यांनी स्पष्टीकरण दिले. पहिल्या यादीत माझे नाव होते. मात्र तीन आमदार यांनी आपली समस्या मुख्यमंत्री याना सांगितली. एकाने मंत्रिपद न मिळाल्यास पत्नी आत्महत्या करेल, तर दुसऱ्याने मी राजीनामा देतो असे सांगितले. तर तिसऱ्याने मला मंत्रिपद मिळाले नाही तर नारायण राणे संपवतील असे सांगितले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर पेच निर्माण झाल्याने अखेर मी त्यांना मंत्री करा असे सांगून बाजूला झालो. मात्र त्याबाबत मला बोलणी खावी लागत असल्याची खंत भरत गोगावले यांनी भाषणातून बोलून दाखवली. 

रायगड जिल्ह्यातून अनेक दिग्गज पुढील काळात शिवसेनेत येत आहेत. अलिबाग तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींना विकास कामासाठी दीडशे कोटी दिले. आधीच्या आमदारांनी विकास कामे केली नाहीत. त्यामुळे आज शेकाप हा संपत चाललेला पक्ष आहे. आम्ही जनतेची सेवा करीत असल्याने लोक आमच्या सोबत आहेत. अनंत गोंधळी यांच्या पक्ष प्रवेशाने यापरिसरतील असलेला शेकाप ही संपत आला आहे. उसर येथील गेल, एच पी कंपनीत स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी भाषणातून दिली. उमटे धरणासाठी १४१ कोटी निधी मंजूर केला असून सांबर कुंड धरणासाठी २ हजार कोटी निधी मंजूर झाल्याचेही आमदार दळवी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :RaigadरायगडShiv Senaशिवसेना