शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रायगड जिल्ह्याला हवे गट शिक्षणाधिकारी १५ पैकी १३ तालुक्यांचा भार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर

By निखिल म्हात्रे | Updated: November 17, 2023 17:19 IST

मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ढासळल्याची बोंब सुरू आहे. पटसंख्याही घटत आहे.

अलिबाग : जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील योजनांची व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक अधिकाऱ्यांची कमतरता शिक्षण विभागाला भेडसावत आहे. जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यांमधील गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त असून, त्यांचा कारभार शिक्षण विस्तार अधिकारी किंवा इतर क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपवून शिक्षण विभागाचा गाडा हाकला जात आहे. या गंभीर बाबीकडे सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे.

मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ढासळल्याची बोंब सुरू आहे. पटसंख्याही घटत आहे. त्यामुळे शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आता तर सर्व शिक्षा अभियान तसेच इतर योजनांच्या माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबरच खासगी शाळांवरही शिक्षण विभागामार्फत देखरेख ठेवली जाते. मात्र, त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची गरज असते.

खालापूर, माणगाव तालुके मात्र सुटले

जिल्हा स्तरावर शिक्षण विभागात शिक्षण अधिकाऱ्यांनंतर उपशिक्षणाधिकारी हे पद आहे. त्यानंतर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी हा जबाबदार अधिकारी असतो. मात्र, जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी केवळ खालापूर, माणगाव या दोन तालुक्यांत गटशिक्षणाधिकारी पद भरले गेले आहे. उर्वरित १३ तालुक्यांमधील गटशिक्षण अधिकारी पद रिक्त आहे. सर्व रिक्त पदांचा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे प्रभारी देऊन कामकाज केले जात आहे.

राज्याचा शिक्षण विभाग लक्ष देईल का?

जिल्ह्यातील रिक्त अधिकाऱ्यांची पदे भरावीत यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी राज्याचे शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपसचिवांकडे वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र, राज्याचा शिक्षण विभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

केंद्रप्रमुखांची पदेही रिक्त

गटशिक्षण अधिकाऱ्यांनंतर तालुक्यात केंद्रप्रमुख हे पद महत्त्वपूर्ण आहे. शाळांना भेटी देणे, शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे यासह इतर महत्त्वपूर्ण कामे केंद्रप्रमुख करतात. जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची २२८ पदे मंजूर असून, यामधील १३७ पदे भरली आहेत तर ९१ पदे रिक्त आहेत.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची २२८ पदे मंजूर आहेत. यामधील १३७ पदे भरली आहेत. ९१ पदे रिक्त आहेत. याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे. याचा अतिरिक्त भार इतर केंद्रप्रमुखांवर येत असल्याने विविध समस्यांना आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. उर्वरित ९१ रिक्त पदे भरण्यासाठी आपण शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे.- पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी

टॅग्स :alibaugअलिबागEducationशिक्षण