शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रायगड जिल्ह्याला हवे गट शिक्षणाधिकारी १५ पैकी १३ तालुक्यांचा भार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर

By निखिल म्हात्रे | Updated: November 17, 2023 17:19 IST

मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ढासळल्याची बोंब सुरू आहे. पटसंख्याही घटत आहे.

अलिबाग : जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील योजनांची व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक अधिकाऱ्यांची कमतरता शिक्षण विभागाला भेडसावत आहे. जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यांमधील गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त असून, त्यांचा कारभार शिक्षण विस्तार अधिकारी किंवा इतर क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपवून शिक्षण विभागाचा गाडा हाकला जात आहे. या गंभीर बाबीकडे सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे.

मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ढासळल्याची बोंब सुरू आहे. पटसंख्याही घटत आहे. त्यामुळे शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आता तर सर्व शिक्षा अभियान तसेच इतर योजनांच्या माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबरच खासगी शाळांवरही शिक्षण विभागामार्फत देखरेख ठेवली जाते. मात्र, त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची गरज असते.

खालापूर, माणगाव तालुके मात्र सुटले

जिल्हा स्तरावर शिक्षण विभागात शिक्षण अधिकाऱ्यांनंतर उपशिक्षणाधिकारी हे पद आहे. त्यानंतर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी हा जबाबदार अधिकारी असतो. मात्र, जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी केवळ खालापूर, माणगाव या दोन तालुक्यांत गटशिक्षणाधिकारी पद भरले गेले आहे. उर्वरित १३ तालुक्यांमधील गटशिक्षण अधिकारी पद रिक्त आहे. सर्व रिक्त पदांचा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे प्रभारी देऊन कामकाज केले जात आहे.

राज्याचा शिक्षण विभाग लक्ष देईल का?

जिल्ह्यातील रिक्त अधिकाऱ्यांची पदे भरावीत यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी राज्याचे शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपसचिवांकडे वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र, राज्याचा शिक्षण विभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

केंद्रप्रमुखांची पदेही रिक्त

गटशिक्षण अधिकाऱ्यांनंतर तालुक्यात केंद्रप्रमुख हे पद महत्त्वपूर्ण आहे. शाळांना भेटी देणे, शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे यासह इतर महत्त्वपूर्ण कामे केंद्रप्रमुख करतात. जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची २२८ पदे मंजूर असून, यामधील १३७ पदे भरली आहेत तर ९१ पदे रिक्त आहेत.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची २२८ पदे मंजूर आहेत. यामधील १३७ पदे भरली आहेत. ९१ पदे रिक्त आहेत. याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे. याचा अतिरिक्त भार इतर केंद्रप्रमुखांवर येत असल्याने विविध समस्यांना आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. उर्वरित ९१ रिक्त पदे भरण्यासाठी आपण शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे.- पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी

टॅग्स :alibaugअलिबागEducationशिक्षण