शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

रायगड जिल्हा स्वयंपूर्ण करायचा आहे - रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 02:31 IST

शेती व इतर क्षेत्राचा विकास करून त्या विकासाच्या माध्यमातून आपला रायगड जिल्हा स्वयंपूर्ण करायचा आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरु वारी खांदेश्वर येथे केले.

पनवेल : शेती व इतर क्षेत्राचा विकास करून त्या विकासाच्या माध्यमातून आपला रायगड जिल्हा स्वयंपूर्ण करायचा आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरु वारी खांदेश्वर येथे केले. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रायगड कृषी महोत्सव २०१८ व महिला बचत गट उत्पादने विक्र ी प्रदर्शनाचे उद्घाटन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी रवींद्र चव्हाण यांनी रायगडवासीय अनेक योजनांपासून वंचित आहेत, रायगडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्या योजना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणून जबाबदारी मोठी आहे, त्यामुळे रायगडवासीयांच्या प्रगतीसाठी काहीतरी करायला हवे यासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी वेळ पडल्यास कटू निर्णय घेण्याचे संकेतही त्यांनी दिले. गावांमध्ये फेब्रुवारीनंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे गावांचे शहरांकडे स्थलांतर होते, ते प्रमाण कमी करण्यासाठी व गावांमध्ये समृद्धी आणण्यासाठी जिल्ह्याचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे, असे सांगतानाच अधिकाºयांनी लोकांशी संपर्कवाढवावा तसेच कामाचे टार्गेट ठेवून कृती आराखडा तयार करावा आणि वेळच्यावेळी कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही चव्हाण यांनी अधिकाºयांना दिल्या.या कार्यक्र मासाठी भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार दीपक आकडे, भाजपाचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकर आदींसह शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड