शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात महिलांसाठी सखी केंद्र ठरतेय आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:39 IST

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या ९८६ घटनांची नोंद करण्यात आली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या ९८६ घटनांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ८६६ पीडितांचा संसार उभारण्याचे काम महिला व बाल विकास विभागाच्या सखी केंद्रामार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त महिला आणि मुलांसाठी सखी केंद्र हे आधारवड ठरले आहे.सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. पूर्वी कुटुंबामध्ये एकच प्रमुख व्यक्ती असायची आणि त्याच व्यक्तीचा अंमल घरावर असायचा. सुख-दु:खात हीच व्यक्ती कुटुंबाच्या पुढे असायची. त्याचप्रमाणे सर्वच एकत्र राहत असल्याने त्यांच्यामध्ये आनंद भरभरून वाहत होता. याच व्यक्तीचा कुटुंबावर चांगलाच धाक होता. प्रमुख व्यक्ती कुटुंबातील सदस्यांवर तेवढेच प्रेमही करायची. सध्या एकत्र कुटुंब पद्धतीत बांधून राहणे आजच्या पिढीला आवडत नाही, त्यामुळे ते आता स्वतंत्र राहत आहेत. स्वातंत्र्य असल्याने काही कुटुंबामध्ये स्वैराचारही चांगला फोफावला. त्यामुळे नवरा-बायकोच्या आयुष्यात कलह निर्माण होऊ लागला. त्यामुळे त्यांचे संसार तुटण्याची वेळ आली. आपण मातृसत्ताक असलो तरी आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही. मात्र, अशा वेळी निराधार, अत्याचारग्रस्त पीडित महिलांसाठी महिला व बाल कल्याण विभागाने सुरू केलेले सखी केंद्र महिलांसाठी आधारवड ठरत आहे.जून २०१७ मध्ये अलिबाग येथे सखी या केंद्राची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल कौटुंबिक कलहाची ९८६ प्रकरण या सखी केंद्रात आली. त्यातील ८६६ प्रकरण यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहे. म्हणजेच ८६६ जणांचे संसार या सखी केंद्रामुळे आनंदित सुरू असल्याचे महिला व बाल विकास विभागाने सांगितले.>सध्या एकत्र कुटुंब पद्धतीत बांधून राहणे आजच्या पिढीला आवडत नाही, त्यामुळे ते आता स्वतंत्र राहत आहेत. स्वातंत्र्य असल्याने काही कुटुंबामध्ये स्वैराचारही चांगला फोफावला. त्यामुळे नवरा-बायकोच्या आयुष्यात कलह निर्माण होऊ लागला. त्यामुळे त्यांचे संसार तुटण्याची वेळ आली.कौटुंबिक कलहामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. मात्र सखी केंद्राकडून करण्यात आलेल्या समुपदेशनामुळे अनेकांचे संसार सुरळीत सुरू आहेत.