शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

रायगड जिल्ह्यात महिलांसाठी सखी केंद्र ठरतेय आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:39 IST

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या ९८६ घटनांची नोंद करण्यात आली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या ९८६ घटनांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ८६६ पीडितांचा संसार उभारण्याचे काम महिला व बाल विकास विभागाच्या सखी केंद्रामार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त महिला आणि मुलांसाठी सखी केंद्र हे आधारवड ठरले आहे.सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. पूर्वी कुटुंबामध्ये एकच प्रमुख व्यक्ती असायची आणि त्याच व्यक्तीचा अंमल घरावर असायचा. सुख-दु:खात हीच व्यक्ती कुटुंबाच्या पुढे असायची. त्याचप्रमाणे सर्वच एकत्र राहत असल्याने त्यांच्यामध्ये आनंद भरभरून वाहत होता. याच व्यक्तीचा कुटुंबावर चांगलाच धाक होता. प्रमुख व्यक्ती कुटुंबातील सदस्यांवर तेवढेच प्रेमही करायची. सध्या एकत्र कुटुंब पद्धतीत बांधून राहणे आजच्या पिढीला आवडत नाही, त्यामुळे ते आता स्वतंत्र राहत आहेत. स्वातंत्र्य असल्याने काही कुटुंबामध्ये स्वैराचारही चांगला फोफावला. त्यामुळे नवरा-बायकोच्या आयुष्यात कलह निर्माण होऊ लागला. त्यामुळे त्यांचे संसार तुटण्याची वेळ आली. आपण मातृसत्ताक असलो तरी आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही. मात्र, अशा वेळी निराधार, अत्याचारग्रस्त पीडित महिलांसाठी महिला व बाल कल्याण विभागाने सुरू केलेले सखी केंद्र महिलांसाठी आधारवड ठरत आहे.जून २०१७ मध्ये अलिबाग येथे सखी या केंद्राची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल कौटुंबिक कलहाची ९८६ प्रकरण या सखी केंद्रात आली. त्यातील ८६६ प्रकरण यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहे. म्हणजेच ८६६ जणांचे संसार या सखी केंद्रामुळे आनंदित सुरू असल्याचे महिला व बाल विकास विभागाने सांगितले.>सध्या एकत्र कुटुंब पद्धतीत बांधून राहणे आजच्या पिढीला आवडत नाही, त्यामुळे ते आता स्वतंत्र राहत आहेत. स्वातंत्र्य असल्याने काही कुटुंबामध्ये स्वैराचारही चांगला फोफावला. त्यामुळे नवरा-बायकोच्या आयुष्यात कलह निर्माण होऊ लागला. त्यामुळे त्यांचे संसार तुटण्याची वेळ आली.कौटुंबिक कलहामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. मात्र सखी केंद्राकडून करण्यात आलेल्या समुपदेशनामुळे अनेकांचे संसार सुरळीत सुरू आहेत.