शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

जिल्ह्यातील १५० व्यक्तींना ‘रायगड भूषण’ पुरस्कार; सोहळा ठरला चर्चेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:27 IST

सत्ताधारी कार्यक्रम उरकण्याच्या तयारीत

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेमार्फत दिला जाणारा ‘रायगड भूषण’ पुरस्कार सोहळा चर्चेचा विषय झाला आहे. दरवर्षी हा पुरस्कार देण्याच्या संख्येत अफलातून वाढ होत आली आहे. या वर्षी जिल्ह्यातील तब्बल १५० व्यक्तींना ‘रायगड भूषण’ पुरस्कार देण्यात येणार असल्याचे बोलले जाते. काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. त्याची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता असल्याने सत्ताधाऱ्यांनी हा कार्यक्रम उरकण्याची तयारी केल्याचे दिसून येते.

तर दुसरीकडे पुरस्कारांच्या संख्येवरुन सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले जात असल्याने हा पुरस्कार सोहळा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. बुधवारी ११ सप्टेंबर २०१९ रोजी पीएनपी नाट्यगृहात या पुरस्कारांचे वितरण खासदार सुनील तटकरे आणि आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे. रायगड भूषण पुरस्काराची सुरुवात खासदार सुनील तटकरे हे १९९३ साली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी रायगड मित्र या नावाने पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ निरुपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी, पांडुरंग शास्त्री आठवले अशा दिग्गजांचा समावेश होता. त्यानंतर शेकापच्या राजवटीत या पुरस्काराचे नाव बदलण्यात येऊन रायगड भूषण असे करण्यात आले होते. त्यानंतर याच नावाने आतापर्यंत पुरस्काराचे वितरण केले जात आहे.

सामाजिक, उद्योग, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रासह अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºयांना रायगड भूषण पुरस्काराने गौरवण्यात येते. या आधी निवडक विभूतींनाच पुरस्काराने सन्मानित केले जायचे. पुढे त्यामध्ये राजकारण आल्याने पुरस्कारांची संख्या वाढत गेल्याचे बोलले जाते.गेल्याच वर्षी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ््याने उल्लेखनीय कार्य करणाºया शेकडो व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी दोन वर्षाचे एकदाच पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. सोशल मीडियावर सुरु असलेल्या नाराजी नाट्याला सत्ताधाºयांनी भीक न घालता त्यांनी आपले काम सुरुच ठेवले आहे.सोशल मीडियावर नाराजीया वर्षी तब्बल १५० व्यक्तींना या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेने मोठ्या प्रमाणात पुरस्कारांचे वितरण करण्याची परंपरा सुरु केल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर आळवला जात आहे. सोशल मीडियावर रायगड भूषण पुरस्काराबाबत कडव्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर कमालीचे द्वंव पहायला मिळत आहे. पुरस्कार देताना पुरस्कारांचे महत्त्व कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशी सामान्य अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Raigadरायगड