शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

बाटलीबंद पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह, शु्द्ध पाण्याच्या नावाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:41 IST

पाण्याच्या टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांसोबतच मध्यमवर्गीय नागरिकांना देखील सतावत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील समारंभ, लग्न आदी कार्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे जार वापरले जात आहेत.

- मयूर तांबडेपनवेल - पाण्याच्या टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांसोबतच मध्यमवर्गीय नागरिकांना देखील सतावत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील समारंभ, लग्न आदी कार्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे जार वापरले जात आहेत. कॅनविक्रे ते मिनरल वॉटर असल्याच्या नावावर केवळ थंड पाणी ग्राहकांना पुरवीत आहेत. कॅनमधून व बंद बॉटलमधून पाणी विकणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी होऊन फसवणूक करणाºयांवर कारवाईची गरज आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. तर शहरी भागात वेगवेगळ्या प्रकारचे पाणी येत असल्याने आजारी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील नागरिक बाटलीबंद तसेच पाण्याचे जार पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास वापरत आहेत. जारचे पाणी दीड रु पया लिटर तर बाटलीतील पाणी पंधरा ते वीस रु पये लिटर या दराने नागरिकांना विकत घ्यावे लागत आहे. पनवेल परिसरात सुमारे पाच ते दहा लाख रु पये खर्च करून कूपनलिकेद्वारे पाणी घेऊन मशिनच्या साहाय्याने पाणी स्वच्छ करून विकण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. सध्या लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात होत असून, प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या कॅन दिसून येतात. परंतु, हे पाणी खरोखरच शुद्ध आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.युव्ही स्टरीलायझेशन, सूक्ष्म गाळणी व ओझोनायझेशन आदी प्रक्रि या करूनच पाणी कॅनद्वारे नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे. परंतु, मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पनवेल परिसरात पाण्याचे दहा ते पंधरा कारखाने आहेत. त्यावर अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच वैधमापन शास्त्र विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. अन्न व औषधी प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या माध्यमाद्वारे कॅनमधील पाण्याची चाचणी व शहानिशा होत नसल्याची तक्र ार करण्यात येत आहे. मात्र, प्रशासन याची दखल घेत नसल्याचा आरोप होत आहे.पनवेल परिसरात अनेक अनधिकृत बाटलीबंद पाण्याचे वितरक असल्याने अशा वितरकांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील छोट्या-मोठ्या कार्यालयापासून अनेक घरांपर्यंतही या जारच्या पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. बाटलीबंद पाणी विकण्यासाठी ब्युरो आॅफ इंडियन स्टॅण्डर्डची परवानगी असणे आवश्यक आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाची परवानगी असणेही गरजेचे आहे, तरच या परवानग्या असलेला वितरकच बाटलीबंद पाण्याची विक्री करू शकतो. नागरिकांना अशुद्ध पाणी विकून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाºयाविरोधात अन्न, औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी केली जात आहे.बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांचे सॅम्प्लिंग केले जाते. पाण्यासंदर्भात तक्र ारी आलेल्या नाहीत. नागरिकांची तक्र ार आली की आम्ही पाण्याचे सॅम्प्लिंग करून कारवाई करतो.- डी. संगत,सहायक आयुक्त,अन्न, औषध प्रशासन विभाग,पेण 

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या