शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

बाटलीबंद पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह, शु्द्ध पाण्याच्या नावाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:41 IST

पाण्याच्या टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांसोबतच मध्यमवर्गीय नागरिकांना देखील सतावत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील समारंभ, लग्न आदी कार्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे जार वापरले जात आहेत.

- मयूर तांबडेपनवेल - पाण्याच्या टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांसोबतच मध्यमवर्गीय नागरिकांना देखील सतावत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील समारंभ, लग्न आदी कार्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे जार वापरले जात आहेत. कॅनविक्रे ते मिनरल वॉटर असल्याच्या नावावर केवळ थंड पाणी ग्राहकांना पुरवीत आहेत. कॅनमधून व बंद बॉटलमधून पाणी विकणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी होऊन फसवणूक करणाºयांवर कारवाईची गरज आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. तर शहरी भागात वेगवेगळ्या प्रकारचे पाणी येत असल्याने आजारी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील नागरिक बाटलीबंद तसेच पाण्याचे जार पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास वापरत आहेत. जारचे पाणी दीड रु पया लिटर तर बाटलीतील पाणी पंधरा ते वीस रु पये लिटर या दराने नागरिकांना विकत घ्यावे लागत आहे. पनवेल परिसरात सुमारे पाच ते दहा लाख रु पये खर्च करून कूपनलिकेद्वारे पाणी घेऊन मशिनच्या साहाय्याने पाणी स्वच्छ करून विकण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. सध्या लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात होत असून, प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या कॅन दिसून येतात. परंतु, हे पाणी खरोखरच शुद्ध आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.युव्ही स्टरीलायझेशन, सूक्ष्म गाळणी व ओझोनायझेशन आदी प्रक्रि या करूनच पाणी कॅनद्वारे नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे. परंतु, मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पनवेल परिसरात पाण्याचे दहा ते पंधरा कारखाने आहेत. त्यावर अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच वैधमापन शास्त्र विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. अन्न व औषधी प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या माध्यमाद्वारे कॅनमधील पाण्याची चाचणी व शहानिशा होत नसल्याची तक्र ार करण्यात येत आहे. मात्र, प्रशासन याची दखल घेत नसल्याचा आरोप होत आहे.पनवेल परिसरात अनेक अनधिकृत बाटलीबंद पाण्याचे वितरक असल्याने अशा वितरकांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील छोट्या-मोठ्या कार्यालयापासून अनेक घरांपर्यंतही या जारच्या पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. बाटलीबंद पाणी विकण्यासाठी ब्युरो आॅफ इंडियन स्टॅण्डर्डची परवानगी असणे आवश्यक आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाची परवानगी असणेही गरजेचे आहे, तरच या परवानग्या असलेला वितरकच बाटलीबंद पाण्याची विक्री करू शकतो. नागरिकांना अशुद्ध पाणी विकून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाºयाविरोधात अन्न, औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी केली जात आहे.बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांचे सॅम्प्लिंग केले जाते. पाण्यासंदर्भात तक्र ारी आलेल्या नाहीत. नागरिकांची तक्र ार आली की आम्ही पाण्याचे सॅम्प्लिंग करून कारवाई करतो.- डी. संगत,सहायक आयुक्त,अन्न, औषध प्रशासन विभाग,पेण 

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या