शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

आदर्श ग्राम योजनेच्या निधीबाबत प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:01 IST

रायगड जिल्ह्यातील तीन गावे सांसद आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत

आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील तीन गावे सांसद आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. १७२ विकासकामांपैकी १२१ कामे पूर्ण करण्यात संबंधित यंत्रणांना यश आले आहे. यात मावळचे खासदार श्रीरंग बारणे वगळता खासदार अनंत गीते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी खासदार निधीचा एक रुपयाही खर्च केलेला नाही. बहुतांश कामे सीएसआर फंडातून करण्यात आली आहेत. विविध योजनांसाठी खर्च करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा एकत्रित हिशोब एकाही प्रशासकीय यंत्रणेकडे नसल्याने सांसद आदर्श ग्राम योजनेतील झालेल्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सांसद आदर्श ग्राम योजना आहे. त्यामुळे ती केंद्र सरकार तसेच त्या-त्या राज्य सरकारांसाठीही तितकीच महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक खासदारांनी पहिल्या टप्प्यात आपापल्या मतदार संघातील किमान एका गावाचा विकास करायचा आहे. यासाठी त्यांनी त्यांना दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या पाच कोटी खासदार निधीचा विनियोग करण्याला सरकारने कोणतीच हरकत घेतलेली नाही. निधीची कमतरता पडू नये यासाठी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून तो घेण्याची मुभा सरकारनेच परिपत्रक काढून दिली आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चिंचोटी ग्रामपंचायत भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी विकासासाठी दत्तक घेतली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे खासदार तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावाचा विकास करण्याचे ठरवले, तर शिवसेनेचेच मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील बांधपाडा या गावाचा समावेश केला आहे. खासदार बारणे यांनी आपल्या खासदार निधीतील तब्बल ४५ लाख रुपये या गावाच्या विकासासाठी दिले आहेत, मात्र खासदार अनंत गीते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्या खासदार निधीतील एक रुपयाही खर्च केलेला नाही.गावांचा विकास करताना बहुतांश सीएसआर फंडातूनच कामे जास्त झाल्याचे बोलले जाते. उर्वरित कामे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यासारख्या अन्य फंडातून झाली आहेत तर काही प्रस्तावितही आहेत.यातील गंभीर बाब म्हणजे विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे त्याची एकत्रित आकडेवारी ग्रामपंचायतीकडे नाही, तसेच तहसीलदार अथवा प्रांताधिकारी यांच्याकडेही नाही.जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करणाºया जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडेही झालेल्या खर्चाचा एकत्रित तपशील उपलब्ध नव्हता. ग्रामपंचायत, तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालयाकडे तो मिळू शकेल, असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अशा खर्चाची एकत्रित आकडेवारी कोणाकडेच सापडली नाही. त्यामुळे आदर्श सांसद ग्राम योजनेतील कामे खरोखरच झाली आहेत का अथवा ती कागदावरतीच पूर्ण केल्याचे दाखवले जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया चिंचोटीचे ग्रामस्थ अ‍ॅड. राकेश पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. गावामध्ये जी कामे झाली आहेत त्या कामांचा दर्जा संबंधित अधिकाºयांनी कधी तपासून पाहिला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.दर तीन महिन्यांनीआढावा बैठक आवश्यकनियमानुसार सांसद आदर्श ग्राम योजनेचा आढावा संबंधित खासदारांनी दर तीन महिन्यांनी घेणे आवश्यक आहे.मात्र गेल्या वर्षभरात अशा कोणत्याच कामांचा आढावा घेण्यासाठी कोणत्याच खासदारांनी स्वारस्य दाखवले नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे या योजनेसाठी खासदार उत्साही नसल्याचे दिसून येते. विशेष बाब म्हणजे यातील दोन खासदार शिवसेनेचे, तर एक खासदार भाजपाचा आहे. तीनही खासदार हे केंद्रामध्ये सत्तेत सहभागी आहेत.