शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

आदर्श ग्राम योजनेच्या निधीबाबत प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:01 IST

रायगड जिल्ह्यातील तीन गावे सांसद आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत

आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील तीन गावे सांसद आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. १७२ विकासकामांपैकी १२१ कामे पूर्ण करण्यात संबंधित यंत्रणांना यश आले आहे. यात मावळचे खासदार श्रीरंग बारणे वगळता खासदार अनंत गीते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी खासदार निधीचा एक रुपयाही खर्च केलेला नाही. बहुतांश कामे सीएसआर फंडातून करण्यात आली आहेत. विविध योजनांसाठी खर्च करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा एकत्रित हिशोब एकाही प्रशासकीय यंत्रणेकडे नसल्याने सांसद आदर्श ग्राम योजनेतील झालेल्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सांसद आदर्श ग्राम योजना आहे. त्यामुळे ती केंद्र सरकार तसेच त्या-त्या राज्य सरकारांसाठीही तितकीच महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक खासदारांनी पहिल्या टप्प्यात आपापल्या मतदार संघातील किमान एका गावाचा विकास करायचा आहे. यासाठी त्यांनी त्यांना दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या पाच कोटी खासदार निधीचा विनियोग करण्याला सरकारने कोणतीच हरकत घेतलेली नाही. निधीची कमतरता पडू नये यासाठी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून तो घेण्याची मुभा सरकारनेच परिपत्रक काढून दिली आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चिंचोटी ग्रामपंचायत भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी विकासासाठी दत्तक घेतली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे खासदार तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावाचा विकास करण्याचे ठरवले, तर शिवसेनेचेच मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील बांधपाडा या गावाचा समावेश केला आहे. खासदार बारणे यांनी आपल्या खासदार निधीतील तब्बल ४५ लाख रुपये या गावाच्या विकासासाठी दिले आहेत, मात्र खासदार अनंत गीते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्या खासदार निधीतील एक रुपयाही खर्च केलेला नाही.गावांचा विकास करताना बहुतांश सीएसआर फंडातूनच कामे जास्त झाल्याचे बोलले जाते. उर्वरित कामे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यासारख्या अन्य फंडातून झाली आहेत तर काही प्रस्तावितही आहेत.यातील गंभीर बाब म्हणजे विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे त्याची एकत्रित आकडेवारी ग्रामपंचायतीकडे नाही, तसेच तहसीलदार अथवा प्रांताधिकारी यांच्याकडेही नाही.जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करणाºया जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडेही झालेल्या खर्चाचा एकत्रित तपशील उपलब्ध नव्हता. ग्रामपंचायत, तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालयाकडे तो मिळू शकेल, असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अशा खर्चाची एकत्रित आकडेवारी कोणाकडेच सापडली नाही. त्यामुळे आदर्श सांसद ग्राम योजनेतील कामे खरोखरच झाली आहेत का अथवा ती कागदावरतीच पूर्ण केल्याचे दाखवले जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया चिंचोटीचे ग्रामस्थ अ‍ॅड. राकेश पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. गावामध्ये जी कामे झाली आहेत त्या कामांचा दर्जा संबंधित अधिकाºयांनी कधी तपासून पाहिला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.दर तीन महिन्यांनीआढावा बैठक आवश्यकनियमानुसार सांसद आदर्श ग्राम योजनेचा आढावा संबंधित खासदारांनी दर तीन महिन्यांनी घेणे आवश्यक आहे.मात्र गेल्या वर्षभरात अशा कोणत्याच कामांचा आढावा घेण्यासाठी कोणत्याच खासदारांनी स्वारस्य दाखवले नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे या योजनेसाठी खासदार उत्साही नसल्याचे दिसून येते. विशेष बाब म्हणजे यातील दोन खासदार शिवसेनेचे, तर एक खासदार भाजपाचा आहे. तीनही खासदार हे केंद्रामध्ये सत्तेत सहभागी आहेत.