शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राजमाता जिजाऊंचा राजवाडा दुर्लक्षित; ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची गरज, शिवप्रेमींमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:22 IST

साफसफाई करण्यास प्रशासनाकडून हयगय

सिकंदर अनवारेदासगाव : किल्ले रायगडवरील थंड हवा, सोसाट्याचा वारा राजमाता जिजाऊ मासाहेब यांना वृद्धापकाळामुळे सोसवत नव्हता आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य पाचाड गावाजवळ मासाहेबांकरिता प्रशस्त वाडा बांधला. या वाड्याला अतिशय भक्कम तटबंदी आहे. तटाची भिंत २ मीटरपेक्षा अधिक जाड असून, ४ मीटरपेक्षा उंच आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाड्याची तटबंदी अनेक ठिकाणी जरी कोसळलेली दिसत असली तरी गत काळातील वैभवाच्या खुणा आजही दिसून येतात. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या ऐतिहासिक वाड्याच्या साफसफाईकडे भारतीय पुरातत्व विभागाप्रमाणे प्रशासनाकडूनदेखील दुर्लक्ष होत आहे.

वाड्यांच्या आतील आणि बाहेरील परिसरांमध्ये पावसामुळे सर्वत्र गवत उगवलेले आहे. सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. या स्थळाला भेट देण्याकरिता येणाऱ्या पर्यटकांना, शिवभक्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.     किल्ले रायगडाच्या पायथ्याशी अत्यंत सुरक्षित ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्याकरिता वाडा बांधला. किल्ले रायगडावर जाण्याचा मुख्य रस्ता पाचाड गावांतून जात असल्याने शिवकालामध्ये हा परिसर पूर्णपणे संरक्षित असा होता. या गावांमध्ये मोठी बाजारपेठ असल्यामुळे किल्ले रायगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा सतत संपर्क राहात असे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीमध्ये मोठी बाजारपेठ होती, त्याचबरोबर महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रमुखांचे वाडे या परिसरात होते. वाडीला भेट दिल्यास सर्वत्र भग्न झालेल्या वास्तुंचे अवशेष दिसून येतात.

गेल्या अनेक वर्षांपासून गडाच्या परिसरांमध्ये असलेल्या ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष झाल्याने खंडर तयार झाले आहेत. या ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास करण्यासाठी अनेक इतिहास तज्ज्ञ या परिसराला भेट देण्यासाठी येतात; परंतु कोणत्याही स्वरूपाची सुविधा नसल्याने पर्यटक आणि इतिहास प्रेमींची गैरसोय होते. या ठिकाणी शिवकालामध्ये दहा हजाराची शिवबंदी होती. पाचाड येथून किल्ले रायगडाला जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे काम येथील व्यापारी करीत होते. या परिसरांत असलेल्या जुने पाचाड, वाळसुरे, वाघोली, वाघेरी, छत्री निझामपूर, पुनाडे, रायगडवाडी, वारंगी, बावले, करमर, कावले, सावरट, नेराव, कोंझर, मांगरुण, सांदोशी, आमडोशी, खलई, देवघर, वरंडोली इत्यादी गावांचा संपर्क असल्याने पाचाड गावाला महत्त्व प्राप्त झाले होते.

शिवप्रेमींमध्ये नाराजी राजामाता जिाजाऊ मासाहेब यांच्याकरिता खास बांधण्यात आलेला वाडा अतिशय भक्कम आणि प्रशस्त होता. तटबंदीतून तोफा डागण्याची, गोळीबार करण्यासाठी झरोके ठेवण्यात आले होते. वाड्याला दोन भव्य प्रवेशद्वारे होती. वाड्याच्या आतील भागांमध्ये दिवाणखाना, देवघर, शयनगृह, वृंदावन, दासींच्या खोल्या इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली होती; परंतु कालांतराने या सर्व वास्तू आज भग्नावस्थेमध्ये आहेत. वाड्याच्या तटबंदीमध्ये सुंदर शौचकुपे आहेत. तटावर जाण्यासाठी आतून जीने आहेत, वाड्यामध्ये दोन विहिरी असून, राजमाता जिजाऊ मासाहेब याच विहिरीच्या बाजूला बसून या परिसरांतील जनतेच्या समस्या सोडवित असत. सध्या या वाड्याची दुरुस्ती आणि देखभाल पुरातत्व विभागाकडे असून, या विभागाकडून योग्य प्रकारे काळजी घेण्यात येत नसल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या जागेवर मासाहेबांचे समाधीस्थळ आहे. हा ऐतिहासिक ठेवा असून, त्याचे जतन करण्याची गरज आहे. येत्या काही महिन्यांमध्ये रायगड प्राधिकरणाच्या माध्यमांतून या वाड्याचीदेखील दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.    

टॅग्स :RaigadरायगडFortगड