शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

राजमाता जिजाऊंचा राजवाडा दुर्लक्षित; ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची गरज, शिवप्रेमींमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:22 IST

साफसफाई करण्यास प्रशासनाकडून हयगय

सिकंदर अनवारेदासगाव : किल्ले रायगडवरील थंड हवा, सोसाट्याचा वारा राजमाता जिजाऊ मासाहेब यांना वृद्धापकाळामुळे सोसवत नव्हता आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य पाचाड गावाजवळ मासाहेबांकरिता प्रशस्त वाडा बांधला. या वाड्याला अतिशय भक्कम तटबंदी आहे. तटाची भिंत २ मीटरपेक्षा अधिक जाड असून, ४ मीटरपेक्षा उंच आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाड्याची तटबंदी अनेक ठिकाणी जरी कोसळलेली दिसत असली तरी गत काळातील वैभवाच्या खुणा आजही दिसून येतात. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या ऐतिहासिक वाड्याच्या साफसफाईकडे भारतीय पुरातत्व विभागाप्रमाणे प्रशासनाकडूनदेखील दुर्लक्ष होत आहे.

वाड्यांच्या आतील आणि बाहेरील परिसरांमध्ये पावसामुळे सर्वत्र गवत उगवलेले आहे. सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. या स्थळाला भेट देण्याकरिता येणाऱ्या पर्यटकांना, शिवभक्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.     किल्ले रायगडाच्या पायथ्याशी अत्यंत सुरक्षित ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्याकरिता वाडा बांधला. किल्ले रायगडावर जाण्याचा मुख्य रस्ता पाचाड गावांतून जात असल्याने शिवकालामध्ये हा परिसर पूर्णपणे संरक्षित असा होता. या गावांमध्ये मोठी बाजारपेठ असल्यामुळे किल्ले रायगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा सतत संपर्क राहात असे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीमध्ये मोठी बाजारपेठ होती, त्याचबरोबर महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रमुखांचे वाडे या परिसरात होते. वाडीला भेट दिल्यास सर्वत्र भग्न झालेल्या वास्तुंचे अवशेष दिसून येतात.

गेल्या अनेक वर्षांपासून गडाच्या परिसरांमध्ये असलेल्या ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष झाल्याने खंडर तयार झाले आहेत. या ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास करण्यासाठी अनेक इतिहास तज्ज्ञ या परिसराला भेट देण्यासाठी येतात; परंतु कोणत्याही स्वरूपाची सुविधा नसल्याने पर्यटक आणि इतिहास प्रेमींची गैरसोय होते. या ठिकाणी शिवकालामध्ये दहा हजाराची शिवबंदी होती. पाचाड येथून किल्ले रायगडाला जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे काम येथील व्यापारी करीत होते. या परिसरांत असलेल्या जुने पाचाड, वाळसुरे, वाघोली, वाघेरी, छत्री निझामपूर, पुनाडे, रायगडवाडी, वारंगी, बावले, करमर, कावले, सावरट, नेराव, कोंझर, मांगरुण, सांदोशी, आमडोशी, खलई, देवघर, वरंडोली इत्यादी गावांचा संपर्क असल्याने पाचाड गावाला महत्त्व प्राप्त झाले होते.

शिवप्रेमींमध्ये नाराजी राजामाता जिाजाऊ मासाहेब यांच्याकरिता खास बांधण्यात आलेला वाडा अतिशय भक्कम आणि प्रशस्त होता. तटबंदीतून तोफा डागण्याची, गोळीबार करण्यासाठी झरोके ठेवण्यात आले होते. वाड्याला दोन भव्य प्रवेशद्वारे होती. वाड्याच्या आतील भागांमध्ये दिवाणखाना, देवघर, शयनगृह, वृंदावन, दासींच्या खोल्या इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली होती; परंतु कालांतराने या सर्व वास्तू आज भग्नावस्थेमध्ये आहेत. वाड्याच्या तटबंदीमध्ये सुंदर शौचकुपे आहेत. तटावर जाण्यासाठी आतून जीने आहेत, वाड्यामध्ये दोन विहिरी असून, राजमाता जिजाऊ मासाहेब याच विहिरीच्या बाजूला बसून या परिसरांतील जनतेच्या समस्या सोडवित असत. सध्या या वाड्याची दुरुस्ती आणि देखभाल पुरातत्व विभागाकडे असून, या विभागाकडून योग्य प्रकारे काळजी घेण्यात येत नसल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या जागेवर मासाहेबांचे समाधीस्थळ आहे. हा ऐतिहासिक ठेवा असून, त्याचे जतन करण्याची गरज आहे. येत्या काही महिन्यांमध्ये रायगड प्राधिकरणाच्या माध्यमांतून या वाड्याचीदेखील दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.    

टॅग्स :RaigadरायगडFortगड