शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यासह अंबरनाथमधील गांजामाफियांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:50 IST

शहरातील गांजा विक्रेत्यांना पुरवठा करण्यासाठी आलेल्या अंबरनाथ व पुणे येथील गांजामाफियांना नेरूळ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून तब्बल ३९ किलो गांजा जप्त केला आहे.

नवी मुंबई : शहरातील गांजा विक्रेत्यांना पुरवठा करण्यासाठी आलेल्या अंबरनाथ व पुणे येथील गांजामाफियांना नेरूळ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून तब्बल ३९ किलो गांजा जप्त केला आहे. वर्षभरापासून पोलिसांनी गांजा माफियांविरोधात मोहीम तीव्र केली असून पहिल्यांदाच किरकोळ विक्रेत्यांना गांजा पुरविणाºयांना पकडण्यात यश मिळाले आहे.पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. सर्व पोलीस स्टेशन व अमली पदार्थ विरोधी पथकाला अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर धाडी टाकून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. वर्षभर गांजा विक्री करणाºयांवर कारवाई केली जात होती. परंतु या विक्रेत्यांना गांजा पुरविणारे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. नेरूळमधील एल. पी. ब्रीजखाली गांजा विक्रेते येणार असल्याची माहिती नेरूळ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक भागोजी औटी, सहायक पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या पथकाने ३ आॅगस्टला महामार्गावर पुलाखाली सापळा रचला होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तेथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दुर्गापाडा ज्ञानअमृत स्कूलजवळ दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे अंबरनाथ येथे राहणाºया गुलाम मकसुद अहमद खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे १५ किलो १६ ग्रॅम गांजाचा साठा सापडला आहे. पिंपरी-चिंचवड येथे राहणाºया मोहम्मद अब्दुल मज्जीद शेख याता ताब्यात घेतले असता त्याच्याकडे २४ किलो गांजा सापडला आहे. एकूण चार लाख रूपये किमतीचा ३९ किलो गांजा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.नवी मुंबई पोलिसांनी एक वर्षात केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे गांजामाफियांचे धाबे दणाणले आहे. या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का, नवी मुंबईमध्ये कधीपासून गांजा पुरविण्याचे काम करत असून किती ठिकाणी गांजा पुरवितात याविषयी त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. गांजामाफियांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त प्रशांत बुरूडे, परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक आयुक्त किरण पाटील यांनीही कारवाई करणाºया पथकाचे कौतुक केले आहे.