शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांसाठी तरतूद होणार, पालकमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 03:01 IST

कणे गावाला पुराचा जबरदस्त फटका बसला होता. गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरून अनेकांचे मोठे नुकसान झाले होते, अशाही परिस्थितीत गावाने धिराने संकटाचा सामना केला.

पेण : कणे गावाला पुराचा जबरदस्त फटका बसला होता. गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरून अनेकांचे मोठे नुकसान झाले होते, अशाही परिस्थितीत गावाने धिराने संकटाचा सामना केला. या उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत पुराचे पाणी ओसरल्यानंतर बुधवारी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणे गावातील पूरग्रस्तांशी संवाद साधून सहानुभूती दर्शविली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी राहील, याची हमी देत ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.कणे खाडी खारभूमी बंधारा व खारभूमीचे इतर बंधारे जे पूरपरिस्थितीमुळे फुटलेले आहेत. यासाठी खारभूमी विभागाकडून या बंधाºयाच्या मजबुतीकरणासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा मदतनिधीचा प्रस्ताव एशियन बँकेकडून उपलब्ध करण्याच्या हालचाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत सुरू आहेत. यासाठी खारभूमी विभागाचा या बाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. भाजप सरकार पूरग्रस्तांच्या ठाम पाठीशी आहे, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.पेण तालुक्यात वाशी खारेपाटात बुधवारी दुपारी १२ वाजता रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणे ग्रामस्थांना प्रथम भेट दिली. व बाधित झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी छोटेखाणी झालेल्या सभेत त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रवि पाटील, भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील तसेच शासकीय अधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. या वेळी ग्रामस्थांनी ज्या मागण्यांचे निवेदन दिले ते पालकमंत्र्यांनी स्वीकारत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर पालकमंत्री बोर्झे, वढाव, शिर्की- मसद, अंतोरे येथील पूरपरिस्थितीशी बाधित झालेल्या गावांना भेटी देण्यासाठी निघून गेले. यानंतर पुराने बाधित झालेल्या वाशी व वडखळ विभागातील सर्व गावांना धावत्या भेटी दिल्या.

टॅग्स :Raigadरायगड