शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

कंपन्यांकडून औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:45 PM

रसायनांचा सर्रास वापर; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जीवास धोका

- सिकंदर अनवारे दासगाव : रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फारशा सुविधा पुरवण्यात येत नसल्याने त्यांचा जीव नेहमीच टांगणीला असतो. जिल्ह्यात रासायनिक पदार्थांचे उत्पादन करणाºया अनेक कंपन्या आहेत. याशिवाय अनेक कंपन्यांमध्ये रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, असे करताना कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे शुक्रवारी माणगाव येथील कंपनीतील स्फोटामुळे समोर आले आहे.माणगाव तालुक्यातील विळेभागाड येथील क्रिप्टझो इंजिनीअरिंग कंपनीमध्ये शुक्रवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. स्फोटाने औद्योगिक क्षेत्र हादरून गेले. जवळपास १८ कामगार गंभीररीत्या भाजले गेले. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.औद्योगिक क्षेत्रातील स्फोटाची ही काही पहिलीच घटना नसून रायगड जिल्ह्यातील नागोठणे, महाड, माणगाव, खोपोली औद्योगिक क्षेत्रातही यापूर्वी स्फोट होऊन कामगार जखमी आणि दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. महाड एमआयडीसीमध्येही यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. येथील प्रीव्ही आॅर्गनिक कंपनीत काही दिवसांपूर्वी भीषण आग लागण्याची घटना घडली होती. सुदैवाने यात कामगार बचावले होते.माणगाव आणि महाड यामध्ये ३० कि.मी.चे अंतर आहे, तर पुढे विळेभागाड औद्योगिक क्षेत्र आहे. महाड, माणगाव औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कंपन्या अनेक आहेत. मात्र, कंपनीत असलेल्या यंत्रणा कोणत्याही क्षणी अपघाताला निमंत्रण देत असतात. यामुळे गेल्या अनेक वर्षांत कित्येक कामगारांचा अपघातानंतर उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. ही बाब टाळता यावी म्हणून महाडमध्ये ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात आले. मात्र, उद्घाटनानंतरही या ठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. शिवाय मनुष्यबळाअभावी अनेक रुग्णांना अन्यत्र हलवावे लागते. हीच अवस्था अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय आणि माणगाव उपजिल्हा रुग्णालयाची बनली आहे.माणगाव उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी, सी.टी.स्कॅन अशा यंत्रणा आहेत. मात्र, हे चालवण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी उपलब्ध नाही. यामुळे या मशीन धूळखात पडल्या आहेत. दोन्ही ठिकाणी रुग्णालयाच्या इमारती भल्या मोठ्या बांधल्या गेल्या. मात्र, उपचारासाठी लागणारी आधुनिक यंत्रणा उपलब्ध नसल्याने नाइलाजास्तव रुग्णांना मुंबई किंवा अन्य ठिकाणी उपचाराकरिता जावे लागते. महाडपासून मुंबई हे किमान चार तासांचे अंतर आहे.सद्यस्थितीत मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था पाहिली तर खड्ड्यांनी व्यापलेल्या महामार्गावरून रुग्ण मुंबईमध्ये पोहोचतो की नाही, अशी शंका येते. यासाठी किमान सहा ते सात तास लागत आहेत.महामार्गावरील वडखळ आणि माणगाव यासारख्या ठिकाणी कायम वाहतूककोंडी असल्याने रुग्णवाहिका पुढे सरकणे शक्य होत नाही. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना अपघातानंतरही स्थानिक पातळीवर योग्य उपचार देणे शक्य होत नाही.रासायनिक कारखान्यातील घटनांत कामगाराला झालेली इजा आणि भाजण्याचे प्रमाण याबाबत तज्ज्ञ डॉक्टर किंवा तशी यंत्रणा उपलब्ध असणे गरजेचे असते. ती यंत्रणा महाड किंवा औद्योगिक क्षेत्र असलेल्या कोणत्याच ठिकाणी उपलब्ध नाही.सुरक्षासाधनांचा अभावएमआयडीसीमध्ये कामगार सुरक्षेअंतर्गत काही नियमावली बांधून देण्यात आली आहे. त्यानुसार कंपन्यांनी कामगारांना सुरक्षेची साधने पुरवणे बंधनकारक असते. हेल्मेट, हॅण्डग्लोज, गॉगल पुरवणे आवश्यक आहे. ही साधने अनेक कारखानदार किंवा ठेकेदार कामगारांना पुरवत नाहीत. यामुळे कामगारांचा जीव धोक्यात आला आहे.