शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

खारभूमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:06 IST

रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रथमच खारेपाटातील लाभक्षेत्रात खारेपाणी घुसून झालेल्या

अलिबाग : रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रथमच खारेपाटातील लाभक्षेत्रात खारेपाणी घुसून झालेल्या नुकसानाची नोंद घेऊ न शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून शासनास प्रस्ताव सादर केला आहे. ‘विशेष बाब’ म्हणून खारभूमी नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत मंजूर करावी, असा प्रस्ताव राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना सादर केला आहे. शेतकºयांसाठी घेतलेल्या निर्णयाचे श्रमिक मुक्ती दल रायगड स्वागत करून आभार व्यक्त करीत असून, तसे लेखी पत्र जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांना श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे रायगड जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून खारेपाटातील जमिनींना दुपीकी करण्यासाठी आंबाखोरे प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी, खारेपाटातील नापीक जमिनी सुपीक होण्यासाठी, खारेपाटातील नापीक जमिनींच्या शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी २० एप्रिल २००७ ते ४ मे २००७ असे सलग १६ दिवसांचे केलेले ठिय्या आंदोलन याचा संपूर्ण इतिहास याच आभारपत्रात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांना सादर केला आहे.खारेपाटातील या मागण्यांसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या समवेत बैठक होऊन त्या तत्त्वत: मान्य झाल्या होत्या आणि किमान त्यावर चर्चा सुरू झाली. १४ आॅक्टोबर २००७ रोजी ‘समृद्ध कोकण सुंदर कोकण परिषद’ श्रमिक मुक्ती दलाने घेतली होती, त्यात ४० गावांतील शेतकºयांचा सहभाग होता. आंबाखोरे प्रकल्पाचे पाणी व खारेपाटाचा विकास व नुकसान भरपाई व इतर मागण्यांसहित १० हजार शेतकºयांनी एक रात्रभर कुलाबा किल्ल्यात स्वत:ला कोंडून घेऊ न अभूतपूर्व आंदोलन केले होते. मात्र, या मागण्या रीतसर पद्धतीने शासनापर्यंत या पूर्वीच्या कोणत्याही जिल्हाधिकाºयांनी वरिष्ठ स्तरावर व राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.