शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

खारभूमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:06 IST

रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रथमच खारेपाटातील लाभक्षेत्रात खारेपाणी घुसून झालेल्या

अलिबाग : रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रथमच खारेपाटातील लाभक्षेत्रात खारेपाणी घुसून झालेल्या नुकसानाची नोंद घेऊ न शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून शासनास प्रस्ताव सादर केला आहे. ‘विशेष बाब’ म्हणून खारभूमी नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत मंजूर करावी, असा प्रस्ताव राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना सादर केला आहे. शेतकºयांसाठी घेतलेल्या निर्णयाचे श्रमिक मुक्ती दल रायगड स्वागत करून आभार व्यक्त करीत असून, तसे लेखी पत्र जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांना श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे रायगड जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून खारेपाटातील जमिनींना दुपीकी करण्यासाठी आंबाखोरे प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी, खारेपाटातील नापीक जमिनी सुपीक होण्यासाठी, खारेपाटातील नापीक जमिनींच्या शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी २० एप्रिल २००७ ते ४ मे २००७ असे सलग १६ दिवसांचे केलेले ठिय्या आंदोलन याचा संपूर्ण इतिहास याच आभारपत्रात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांना सादर केला आहे.खारेपाटातील या मागण्यांसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या समवेत बैठक होऊन त्या तत्त्वत: मान्य झाल्या होत्या आणि किमान त्यावर चर्चा सुरू झाली. १४ आॅक्टोबर २००७ रोजी ‘समृद्ध कोकण सुंदर कोकण परिषद’ श्रमिक मुक्ती दलाने घेतली होती, त्यात ४० गावांतील शेतकºयांचा सहभाग होता. आंबाखोरे प्रकल्पाचे पाणी व खारेपाटाचा विकास व नुकसान भरपाई व इतर मागण्यांसहित १० हजार शेतकºयांनी एक रात्रभर कुलाबा किल्ल्यात स्वत:ला कोंडून घेऊ न अभूतपूर्व आंदोलन केले होते. मात्र, या मागण्या रीतसर पद्धतीने शासनापर्यंत या पूर्वीच्या कोणत्याही जिल्हाधिकाºयांनी वरिष्ठ स्तरावर व राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.