शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

नुकसानदायी खेकड्यांचे संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 23:59 IST

खारेपाटातील समुद्र संरक्षण बंधारे वारंवार फुटून खारे पाणी शेतात घुसून शेत जमीन नापीक होत आहे.

- जयंत धुळप अलिबाग : खारेपाटातील समुद्र संरक्षण बंधारे वारंवार फु टून खारे पाणी शेतात घुसून शेत जमीन नापीक होत आहे. मात्र, हे बंधारे फु टण्याचे कारण शोधले असता खारेपाटातील समुद्र संरक्षक बंधाऱ्यांना खेकडे बिळे करतात. त्यात समुद्र-खाडीचे पाणी शिरते, सतत या बिळांमध्ये पाणी शिरून बंधारा कमकुवत होऊन मोठ्या उधाण भरतीच्या तडाख्याने फुटून भातशेतीचे नुकसान होते, अशी खारेपाटातील मूळ समस्या असल्याचे समोर आले आहे. मात्र, आता खारेपाटातील तरुण आणि पदवीधर शेतकºयांनी या परिस्थितीवर मात करण्याकरिता या नुकसान करणाºया खेकड्यांना आपल्या पिढीचे अर्थाजनांचे साधन बनविण्याचा निर्धार के ला आहे. खारेपाटात जिताडा माशांच्या संवर्धनाबरोबरच आता खेकडा संवर्धन आणि विक्री उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खेकडा संवर्धन प्रकल्पाची तयारी केलेले शहापूरमधील तरुण शेतकरी किरण यशवंत पाटील यांनी दिली आहे.खारेपाटातील धाकटे शहापूर, मोठे शहापूर आणि धेरंड या तीन गावांतील तरुण शेतकºयांच्या आदर्श मित्रमंडळाच्या सदस्य शेतकºयांनी श्रमिक मुक्ती दलाच्या सहयोगाने आपल्या तीन गावांतील खेकडा संवर्धन आणि विक्री व्यवसायाच्या संधींचा संपूर्ण अभ्यास केला. व्यवसायाच्या अनुषंगाने गावातील शेतकºयांच्या मानसिकतेचा अंदाज घेतला असता त्यांचा त्याकरिता सकारात्मक प्रतिसाद लाभला. खेकड्याला स्थानिक बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दिवसेंदिवस वाढत असलेल्या मागणीचा अभ्यास करून, येत्या काळात खेकडा शेती व्यवसायाला महाराष्ट्र किनारी मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.खेकडा शेती ही कोळंबी शेतीला पर्याय ठरू शकते, अशा निष्कर्षापर्यंत हे तरुण शेतकरी पोहोचले. सद्यस्थितीत मच्छीमार खाडीलगतच्या भागातून खेकडे पकडून नगण्य किमतीत विक्री करताना दिसून येतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीपेक्षा पूर्व किनारपट्टीवरील आंध्रप्रदेश, तामिळनाडू यासारख्या राज्यांनी गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वीच खेकडा शेती हा व्यवसाय सुरू के ला आहे. याच धार्तीवर खेकडा संवर्धनावर भर देण्यात येत आहे.>मास्टर्स ट्रेनर्स प्रशिक्षणाकरितातीन तरुण तामिळनाडूला रवानातामिळनाडूतील नागापट्टणम येथील केंद्र सरकारच्या ‘राजिव गांधी सेंटर फॉर अ‍ॅक्वाकल्चर’ या संस्थेत आयोजित ‘मॅन्ग्रु क्रॅब अ‍ॅक्वाकल्चर’ संदर्भातील मास्टर्स ट्रेनर्स प्रशिक्षणाकरिता आदर्श मित्रमंडळाचे किरण यशवंत पाटील, किशोर पाटील, नंदकुमार धुमाळ हे तरुण शेतकरी तामिळनाडूला गेले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे. तामिळनाडू येथून आल्यानंतर हे तिघेही तरुण शेतकरी खारेपाटातील शेतकरी बांधवांना येथे प्रशिक्षण देतील आणि लवकरच खेकडा शेतीला प्रत्यक्ष प्रारंभ होईल, असे भगत यांनी स्पष्ट के ले.>महाराष्ट्रात उत्पादन कमीखेकडा उत्पादनात तामिळनाडू राज्याचा देशात प्रथम क्र मांक लागतो.गुजरात आणि केरळमध्ये देखील खेकडा शेती गतिमान झाली आहे. मात्र, महाराष्ट्रामध्ये हे उत्पादन अन्य माशांच्या तुलनेत केवळ २८ टक्के आहे.खेकडा शेती ही कोळंबी संवर्धनाप्रमाणे विकसित केल्यास तरुण नवउद्योजकांना खात्रीचे उत्पन्नाचे साधन मिळू शकते, असा अंतिम निष्कर्ष प्राप्त झाल्यावर खारेपाटातील तरुण शेतकºयांनी खेकडा शेतीकरिता तामिळनाडूमध्ये जाऊन शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.>खेकड्यांची नगण्य किमतीला विक्रीसद्यस्थितीत मच्छीमार खाडीलगतच्या भागातून खेकडे पकडून नगण्य किमतीत विक्री करतात. यामुळे त्यांना त्यांच्या उपजीवीके साठी त्याचा फारसा फायदा होत नाही. या सव बाबींचा विचार करून खेकडा संवर्धनावर भर देण्याचा विचार तरुण शेतकºयांचा आहे.