शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानदायी खेकड्यांचे संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 23:59 IST

खारेपाटातील समुद्र संरक्षण बंधारे वारंवार फुटून खारे पाणी शेतात घुसून शेत जमीन नापीक होत आहे.

- जयंत धुळप अलिबाग : खारेपाटातील समुद्र संरक्षण बंधारे वारंवार फु टून खारे पाणी शेतात घुसून शेत जमीन नापीक होत आहे. मात्र, हे बंधारे फु टण्याचे कारण शोधले असता खारेपाटातील समुद्र संरक्षक बंधाऱ्यांना खेकडे बिळे करतात. त्यात समुद्र-खाडीचे पाणी शिरते, सतत या बिळांमध्ये पाणी शिरून बंधारा कमकुवत होऊन मोठ्या उधाण भरतीच्या तडाख्याने फुटून भातशेतीचे नुकसान होते, अशी खारेपाटातील मूळ समस्या असल्याचे समोर आले आहे. मात्र, आता खारेपाटातील तरुण आणि पदवीधर शेतकºयांनी या परिस्थितीवर मात करण्याकरिता या नुकसान करणाºया खेकड्यांना आपल्या पिढीचे अर्थाजनांचे साधन बनविण्याचा निर्धार के ला आहे. खारेपाटात जिताडा माशांच्या संवर्धनाबरोबरच आता खेकडा संवर्धन आणि विक्री उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खेकडा संवर्धन प्रकल्पाची तयारी केलेले शहापूरमधील तरुण शेतकरी किरण यशवंत पाटील यांनी दिली आहे.खारेपाटातील धाकटे शहापूर, मोठे शहापूर आणि धेरंड या तीन गावांतील तरुण शेतकºयांच्या आदर्श मित्रमंडळाच्या सदस्य शेतकºयांनी श्रमिक मुक्ती दलाच्या सहयोगाने आपल्या तीन गावांतील खेकडा संवर्धन आणि विक्री व्यवसायाच्या संधींचा संपूर्ण अभ्यास केला. व्यवसायाच्या अनुषंगाने गावातील शेतकºयांच्या मानसिकतेचा अंदाज घेतला असता त्यांचा त्याकरिता सकारात्मक प्रतिसाद लाभला. खेकड्याला स्थानिक बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दिवसेंदिवस वाढत असलेल्या मागणीचा अभ्यास करून, येत्या काळात खेकडा शेती व्यवसायाला महाराष्ट्र किनारी मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.खेकडा शेती ही कोळंबी शेतीला पर्याय ठरू शकते, अशा निष्कर्षापर्यंत हे तरुण शेतकरी पोहोचले. सद्यस्थितीत मच्छीमार खाडीलगतच्या भागातून खेकडे पकडून नगण्य किमतीत विक्री करताना दिसून येतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीपेक्षा पूर्व किनारपट्टीवरील आंध्रप्रदेश, तामिळनाडू यासारख्या राज्यांनी गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वीच खेकडा शेती हा व्यवसाय सुरू के ला आहे. याच धार्तीवर खेकडा संवर्धनावर भर देण्यात येत आहे.>मास्टर्स ट्रेनर्स प्रशिक्षणाकरितातीन तरुण तामिळनाडूला रवानातामिळनाडूतील नागापट्टणम येथील केंद्र सरकारच्या ‘राजिव गांधी सेंटर फॉर अ‍ॅक्वाकल्चर’ या संस्थेत आयोजित ‘मॅन्ग्रु क्रॅब अ‍ॅक्वाकल्चर’ संदर्भातील मास्टर्स ट्रेनर्स प्रशिक्षणाकरिता आदर्श मित्रमंडळाचे किरण यशवंत पाटील, किशोर पाटील, नंदकुमार धुमाळ हे तरुण शेतकरी तामिळनाडूला गेले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे. तामिळनाडू येथून आल्यानंतर हे तिघेही तरुण शेतकरी खारेपाटातील शेतकरी बांधवांना येथे प्रशिक्षण देतील आणि लवकरच खेकडा शेतीला प्रत्यक्ष प्रारंभ होईल, असे भगत यांनी स्पष्ट के ले.>महाराष्ट्रात उत्पादन कमीखेकडा उत्पादनात तामिळनाडू राज्याचा देशात प्रथम क्र मांक लागतो.गुजरात आणि केरळमध्ये देखील खेकडा शेती गतिमान झाली आहे. मात्र, महाराष्ट्रामध्ये हे उत्पादन अन्य माशांच्या तुलनेत केवळ २८ टक्के आहे.खेकडा शेती ही कोळंबी संवर्धनाप्रमाणे विकसित केल्यास तरुण नवउद्योजकांना खात्रीचे उत्पन्नाचे साधन मिळू शकते, असा अंतिम निष्कर्ष प्राप्त झाल्यावर खारेपाटातील तरुण शेतकºयांनी खेकडा शेतीकरिता तामिळनाडूमध्ये जाऊन शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.>खेकड्यांची नगण्य किमतीला विक्रीसद्यस्थितीत मच्छीमार खाडीलगतच्या भागातून खेकडे पकडून नगण्य किमतीत विक्री करतात. यामुळे त्यांना त्यांच्या उपजीवीके साठी त्याचा फारसा फायदा होत नाही. या सव बाबींचा विचार करून खेकडा संवर्धनावर भर देण्याचा विचार तरुण शेतकºयांचा आहे.