शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: परप्रांतीयांची कामगार भरती, उरण-धुतुम येथील इंडियन ऑईल अदानी वेंचर्सविरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 15:41 IST

Raigad: उरण-धुतुम येथील इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेडच्या रासायनिक द्रव्ये साठवण प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना डावलून होत असलेल्या परप्रांतीय कामगारांच्या भरती विरोधात स्थानिक भुमीपुत्र संतप्त झाले आहेत.

- मधुकर ठाकूरउरण  - उरण-धुतुम येथील इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेडच्या रासायनिक द्रव्ये साठवण प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना डावलून होत असलेल्या परप्रांतीय कामगारांच्या भरती विरोधात स्थानिक भुमीपुत्र संतप्त झाले आहेत.संतप्त झालेल्या भुमीपुत्रांनी २० नोव्हेंबरपासून सर्व पक्षियांनी धुतुम ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली २३ प्रकल्पग्रस्त आमरण उपोषणाचा बसणार आहेत.

उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑईल टॅन्किंग ही रासायनिक द्रव्ये साठवण करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे.२५ वर्षांपूर्वी ५७ एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी धुतुम गावातील सुमारे ८३ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत.मात्र प्रकल्पात अद्यापही फक्त २७ प्रकल्पग्रस्तांनाच नोकरीत सामावून घेतले आहे. उर्वरित ५६ शेतकरी आणि त्याचे सुमारे २०० वारसदार अद्यापही प्रकल्पात नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांचा प्रकल्पाविरोधात संघर्ष सुरू आहे.

त्यानंतर दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑईल टॅन्किंग ही रासायनिक द्रव्ये साठवण करणारा प्रकल्प देशातील सर्वात मोठे भांडवलदार अदाणी यांच्या इंडियन ऑईल अदानी वेंचर्सने घेतला आहे.प्रकल्पाचे मालक बनलेल्या अदानी वेंचर्सने कामगार भरतीमध्ये स्थानिकांवर अन्याय करण्यास सुरुवात केली आहे. धुतुम गावात अनेक तरुण -तरुणी उच्चशिक्षित, पदवीधर आहेत.मात्र नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी परप्रांतीय कामगारांची भरती केली जात आहे.याबाबत प्रकल्प व्यवस्थापनाशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.आस्थापनावर भरती करण्यात आलेल्या परप्रांतीय कामगारांना वगळून तत्काळ स्थानिकांची कामगारांची भरती करण्याचा निर्णय १५ दिवसात घेण्यात यावा अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली होती.मात्र ग्रामपंचायतीच्या पत्राची अदाणी वेंचर्सने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.त्यामुळे धुतुम ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरच २० नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय  आमरण उपोषणात २३ प्रकल्पग्रस्त सहभागी होणार आहेत.त्यानंतरही सकारात्मक तोडगा न निघाल्यास प्रसंगी न्याय हक्कासाठी न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील यांनी गुरुवारी (१६) आयोजित पत्रकार परिषदेतून जाहीर केला आहे.या प्रसंगी सर्वच पक्षीय सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड