शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

Raigad: परप्रांतीयांची कामगार भरती, उरण-धुतुम येथील इंडियन ऑईल अदानी वेंचर्सविरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 15:41 IST

Raigad: उरण-धुतुम येथील इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेडच्या रासायनिक द्रव्ये साठवण प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना डावलून होत असलेल्या परप्रांतीय कामगारांच्या भरती विरोधात स्थानिक भुमीपुत्र संतप्त झाले आहेत.

- मधुकर ठाकूरउरण  - उरण-धुतुम येथील इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेडच्या रासायनिक द्रव्ये साठवण प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना डावलून होत असलेल्या परप्रांतीय कामगारांच्या भरती विरोधात स्थानिक भुमीपुत्र संतप्त झाले आहेत.संतप्त झालेल्या भुमीपुत्रांनी २० नोव्हेंबरपासून सर्व पक्षियांनी धुतुम ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली २३ प्रकल्पग्रस्त आमरण उपोषणाचा बसणार आहेत.

उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑईल टॅन्किंग ही रासायनिक द्रव्ये साठवण करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे.२५ वर्षांपूर्वी ५७ एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी धुतुम गावातील सुमारे ८३ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत.मात्र प्रकल्पात अद्यापही फक्त २७ प्रकल्पग्रस्तांनाच नोकरीत सामावून घेतले आहे. उर्वरित ५६ शेतकरी आणि त्याचे सुमारे २०० वारसदार अद्यापही प्रकल्पात नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांचा प्रकल्पाविरोधात संघर्ष सुरू आहे.

त्यानंतर दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑईल टॅन्किंग ही रासायनिक द्रव्ये साठवण करणारा प्रकल्प देशातील सर्वात मोठे भांडवलदार अदाणी यांच्या इंडियन ऑईल अदानी वेंचर्सने घेतला आहे.प्रकल्पाचे मालक बनलेल्या अदानी वेंचर्सने कामगार भरतीमध्ये स्थानिकांवर अन्याय करण्यास सुरुवात केली आहे. धुतुम गावात अनेक तरुण -तरुणी उच्चशिक्षित, पदवीधर आहेत.मात्र नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी परप्रांतीय कामगारांची भरती केली जात आहे.याबाबत प्रकल्प व्यवस्थापनाशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.आस्थापनावर भरती करण्यात आलेल्या परप्रांतीय कामगारांना वगळून तत्काळ स्थानिकांची कामगारांची भरती करण्याचा निर्णय १५ दिवसात घेण्यात यावा अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली होती.मात्र ग्रामपंचायतीच्या पत्राची अदाणी वेंचर्सने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.त्यामुळे धुतुम ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरच २० नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय  आमरण उपोषणात २३ प्रकल्पग्रस्त सहभागी होणार आहेत.त्यानंतरही सकारात्मक तोडगा न निघाल्यास प्रसंगी न्याय हक्कासाठी न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील यांनी गुरुवारी (१६) आयोजित पत्रकार परिषदेतून जाहीर केला आहे.या प्रसंगी सर्वच पक्षीय सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड