शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणे पडले महाग, रायगड जिल्हा प्रशासनावर जप्तीची नामुष्की टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 02:56 IST

सिडकोच्या नाकर्तेपणामुळे रायगड जिल्हा प्रशासनावर जप्तीची नामुष्की ओढवली होती, मात्र १५ दिवसांमध्ये तक्रारदाराच्या नावाने न्यायालयात रक्कम भरणा करण्याचे जिल्हा प्रशासनाने लेखी मान्य केल्याने जिल्हा प्रशासनाची अब्रू तूर्तास वाचली आहे

अलिबाग : सिडकोच्या नाकर्तेपणामुळे रायगड जिल्हा प्रशासनावर जप्तीची नामुष्की ओढवली होती, मात्र १५ दिवसांमध्ये तक्रारदाराच्या नावाने न्यायालयात रक्कम भरणा करण्याचे जिल्हा प्रशासनाने लेखी मान्य केल्याने जिल्हा प्रशासनाची अब्रू तूर्तास वाचली आहे. विकासाच्या नावावर जमिनी संपादन करून प्रकल्पग्रस्तांना वाºयावर सोडणे कसे महागात पडू शकते याची प्रचिती प्रशासनाला या निमित्ताने आली आहे.मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई वसवण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. सिडकोमार्फत हा प्रकल्प राबवण्यात आला होता. नवी मुंबई वसवण्यासाठी आवश्यक असणारी जमीन संपादन करून देण्याची जबाबदारी रायगड जिल्हा प्रशासनावर होती. त्यानुसार १९८७ साली अब्दुल रेहमान फते मोहंमद मर्चंट यांची सुमारे सव्वापाच गुंठे जमीन नवी मुंबई प्रकल्पात गेली होती. वाढीव आर्थिक मोबदल्यावरून हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर २०११ साली मर्चंट यांना वाढीव मोबदला म्हणून नऊ लाख रुपये देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते.मात्र राज्य सरकार, सिडको आणि जिल्हा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशावर २०१८साल उजाडले तरी, कोणतीच कारवाई केली नाही. जमीनही गेली आणि आता आर्थिक मोबदलाही नाही अशा परिस्थितीमध्ये मर्चंट होते. त्यानंतर त्यांनी न्यायालयात सरकारच्या आडमुठ्या धोरणाची परिस्थिती कथन केली. न्यायालयामार्फत जिल्हा प्रशासनाची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे वॉरंट त्यांनी मिळवले. बुधवारी त्या वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी जप्ती पथक जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले.जिल्हा प्रशासनावर जप्तीची कारवाई होणार याची माहिती वाºयासारखी पसरली. जिल्हा प्रशासनाचीही चांगलीच तारांबळ उडाली.सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे यांनी हे प्रकरण हाताळले. जप्ती पथकाचे आणि तक्रारदाराचे मन वळवण्यात बोधे यांना यश आले. जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करून त्यांनी २९ मार्च २०१८ पर्यंत न्यायालयामध्ये व्याजासह रक्कम भरण्याचे मान्य केले.पथकाने जिल्हा प्रशासनाकडून तसे लेखी लिहून घेत पंचनामा केला. त्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने बोधे यांनी, तर तक्रारदार मर्चंट यांनी सह्या केल्या.जिल्हा प्रशासनाची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने बजावले होते. प्रशासनाने २९ मार्च २०१८ पर्यंत न्यायालयात रक्कम भरणा करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील जप्तीची कारवाई तूर्तास टळली आहे. १५ दिवसांमध्ये रक्कम न भरल्यास त्यांच्यावर पुन्हा जप्तीची कारवाई होईल, असे मर्चंट यांचे वकील अ‍ॅड.अक्षय म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.१५ टक्के व्याजासह भरायचेनऊ लाखप्रकल्प उभारणीसाठी लागणाºया जमीन संपादनाची प्रक्रिया ही महसूल म्हणजेच जिल्हा प्रशासनालाच पूर्ण करावी लागते. त्याबाबतचा आर्थिक मोबदला देण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची असते. २००० सालीच मर्चंट यांना त्यांच्या मागणीप्रमाणे वाढीव आर्थिक मोबदला देण्यात यावा, असे सिडको प्रशासनाला लेखी कळवले होते, असे उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे यांनी सांगितले. त्यांनी तसे न केल्याने ही वेळ आल्याचे स्पष्ट केले.सिडकोने जबाबदारी झटकल्याचा फटका हा जिल्हा प्रशासनाला बसल्याने जिल्हा प्रशासनाची अब्रू मात्र चव्हाट्यावर येण्याची वेळ आली होती. जिल्हा प्रशासनाच्या कुशल प्रयत्नाने जप्तीची नामुष्की टळली असली, तरी येत्या १५ दिवसांमध्ये नऊ लाख आणि त्यावर होणारे सुमारे १५ टक्के व्याजासह रक्कम न्यायालयात भरावी लागणार आहे.