शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

प्रकल्पग्रस्तांनी भर समुद्रातच रोखली जेएनपीटीची वाहतूक; ग्रामस्थांची समुद्री लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 00:12 IST

ग्रामस्थांची समुद्री लढाई : छोट्या बोटींनी अडविला जहाजांचा रस्ता

उरण : तब्बल ३५ हनुमान कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचे काम कागदावरच राहिले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी शुक्रवारी (२६)  भल्या पहाटेच थेट जेएनपीटीच्या समुद्र चॅनलवरच जोरदार चढाई केली. मध्यरात्रीपासून नेतृत्व करणाऱ्या स्थानिक नेत्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. असे असतानाही पोलिसांना चकवा देत ४० बोटी आणि शेकडो महिला, पुरुष आंदोलनकर्त्यांनी जेएनपीटीचे समुद्र चॅनल बंद करून भर समुद्रात मालवाहू जहाजांचा मार्ग रोखून धरला. छोट्या-मोठ्या पारंपरिक मच्छीमार बोटी समुद्रात नांगरून जेएनपीटीचे समुद्र चॅनल बंद करून टाकले. 

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी आणि त्याचे हरेश कोळी, वैभव कोळी यांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना कळंबोली येथे पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. सध्या जेएनपीटी अधिकारी, पोलीस, महसुली अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

दरम्यान, आंदोलनापासून रोखण्यासाठी महिला पुरुष आंदोलनकर्त्यांना जेरबंद केले. पोलीस, निमलष्करी दले, अनेक वाहनांचा हनुमान कोळीवाडा गावाला वेढा पडला होता. तरीही महिलांनी गावाच्या वेशीवरच ठिय्या मांडला होता. त्यामुळे सुमारे २०० महिला आणि १५० पुरुष आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना जेएनपीटी टाऊनशिपमधील ऑफिसर क्लबमध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.

पोलिसांनी मोरा सागरी प्रवासी वाहतूकही बंद केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांना चकवा देत गनिमी काव्याचा वापर केला. आंदोलनासाठी दोन दिवसांपूर्वीच ४० मच्छीमार बोटी वेगवेगळ्या ठिकाणी सज्ज करून ठेवल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गNavi Mumbaiनवी मुंबई