शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांनी भर समुद्रातच रोखली जेएनपीटीची वाहतूक; ग्रामस्थांची समुद्री लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 00:12 IST

ग्रामस्थांची समुद्री लढाई : छोट्या बोटींनी अडविला जहाजांचा रस्ता

उरण : तब्बल ३५ हनुमान कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचे काम कागदावरच राहिले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी शुक्रवारी (२६)  भल्या पहाटेच थेट जेएनपीटीच्या समुद्र चॅनलवरच जोरदार चढाई केली. मध्यरात्रीपासून नेतृत्व करणाऱ्या स्थानिक नेत्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. असे असतानाही पोलिसांना चकवा देत ४० बोटी आणि शेकडो महिला, पुरुष आंदोलनकर्त्यांनी जेएनपीटीचे समुद्र चॅनल बंद करून भर समुद्रात मालवाहू जहाजांचा मार्ग रोखून धरला. छोट्या-मोठ्या पारंपरिक मच्छीमार बोटी समुद्रात नांगरून जेएनपीटीचे समुद्र चॅनल बंद करून टाकले. 

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी आणि त्याचे हरेश कोळी, वैभव कोळी यांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना कळंबोली येथे पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. सध्या जेएनपीटी अधिकारी, पोलीस, महसुली अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

दरम्यान, आंदोलनापासून रोखण्यासाठी महिला पुरुष आंदोलनकर्त्यांना जेरबंद केले. पोलीस, निमलष्करी दले, अनेक वाहनांचा हनुमान कोळीवाडा गावाला वेढा पडला होता. तरीही महिलांनी गावाच्या वेशीवरच ठिय्या मांडला होता. त्यामुळे सुमारे २०० महिला आणि १५० पुरुष आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना जेएनपीटी टाऊनशिपमधील ऑफिसर क्लबमध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.

पोलिसांनी मोरा सागरी प्रवासी वाहतूकही बंद केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांना चकवा देत गनिमी काव्याचा वापर केला. आंदोलनासाठी दोन दिवसांपूर्वीच ४० मच्छीमार बोटी वेगवेगळ्या ठिकाणी सज्ज करून ठेवल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गNavi Mumbaiनवी मुंबई