शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

रायगड जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन यंदा ५० टक्क्यांनी कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 05:26 IST

बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील आंबा उत्पादकांना बसतो आहे.

पेण  - बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील आंबा उत्पादकांना बसतो आहे. आधीच उशिरापर्यंत लांबलेली थंडी त्यातच मागील १५ दिवसांपासून वाढलेले तापमान या दुहेरी संकटामुळे रायगड जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी झाले आहे, त्यामुळे एकूण व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत.रायगड जिल्ह्यातील आंबा लागवडीखाली एकूण ४४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २२ हजार ४२४ मेट्रिक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. सुरुवातीला चांगली थंडी पडल्याने आंबा पीक चांगले येईल, अशी अपेक्षा बागायतदारांना होती; परंतु लांबलेली थंडी व वाढलेल्या तापमानाचा आता आंबा पिकावर विपरित परिणाम दिसून येत आहेत.यंदाच्या हंगामात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात झाली. अगदी सुरुवातीला पडलेल्या थंडीमुळे उत्पादनक्षम क्षेत्रापैकी ८० ते ८५ टक्के क्षेत्रावर मोहर आला होता; परंतु नंतर पुन्हा थंडीचा जोर वाढला. त्यामुळे फलधारणा कमी झाली. याबरोबरच तुडतुडा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव यामुळे साधारण ७० टक्के मोहर गळून पडला.यंदा केवळ ५० टक्के मोहरात फलधारणा झाली. मात्र, आंबा तयार होण्याच्या स्थितीत असतानाच एप्रिल महिन्यात तापमानात वाढ झाली. उष्णतेचे परिणाम आंब्यावर झाले. आंब्याचे फळ मोठ्या प्रमाणात गळून पडण्यास सुरुवात झाली. आंबा डागाळू लागला. त्यामुळे वातावरणाच्या बदलाशी सामना करताना बागायतदार चिंतातूर झाले.ते आंबे आंध्र किंवा कर्नाटकातलेरायगड जिल्ह्यातील आंबा उशिरा बाजारात येतो. तळकोकणातला आंबा अजून मुबलक प्रमाणात बाजारात आलेला नाही. सध्या बाजारात जो मोठ्या प्रमाणात आंबा दिसतो आहे, तो कोकणातील हापूस नसून आंध्र प्रदेश व कर्नाटकातील आंबा असल्याचे बागायदार सांगतात.

टॅग्स :MangoआंबाRaigadरायगड