शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

चारा उत्पादनासाठी गाळपेराची जमीन भाडेपट्ट्यावर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:39 IST

जिल्हा प्रशासनाचा पुढाकार; शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपया भाडे आकारणी

अलिबाग : राज्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे जनावरांच्या चारा उत्पादनावर परिणाम झाला आहे. येत्या काळात चाराटंचाई होऊ नये, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत चारा उत्पादन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील जलसंपदा, मृद व जलसंधारण या विभागांकडील जलप्रकल्पांमधील उपलब्ध गाळपेर जमिनी शेतकºयांना नाममात्र एक रु पये दराने भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.रायगड जिल्ह्याचे पर्जन्यमान राज्यातील इतर भागांपेक्षा चांगले असले तरी शेतकºयांनी उत्पादित केलेला चारा हा केवळ त्यांच्या स्वत:च्या पशुधनाकरिताच वापरता येईल इतका आहे. स्वत:च्या पशुधनाच्या चाºयाची गरजपूर्ती होऊन अन्य शेतकरी, दूध उत्पादकांना माफक दरात चारा उपलब्ध करून द्यावयाचा आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होऊन बुडिताखालील उघड्या गाळपेर जमिनींवर चारा पिकाची लागवड करून चारा उत्पादन करणे हा पर्याय आहे. त्यासाठी इच्छुक शेतकºयांना चारा उत्पादनासाठी या जमिनी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नाममात्र एक रुपये दराने भाडेपट्ट्यावर देण्यात येणार आहेत.पशुधनाच्या चारा उत्पादनासाठी जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसेवी संस्था, गोरक्षण संस्था, तसेच अन्य शेतकरी (ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था उपलब्ध आहे) अशांनाही विनामूल्य बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिवाय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अधिपत्याखालील रोपवाटिका, फळबाग जमिनी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाकडील लघुसिंचन तलावाचे गाळपेर क्षेत्र येथेही चारा उत्पादनासाठी मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा व राज्यातील टंचाईग्रस्त भागातील जनावरांसाठीही चारा उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेचा लाभासाठी शेतकºयांनी पंचायत समित्यांमधील पशुधन विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.विनामूल्य बियाणे उपलब्ध होणारजमिनीत शेतकºयांनी जनावरांसाठी सुयोग्य वैरण, चारा पिके उदा. मका, ज्वारी, बाजरी किंवा न्यूट्री फिड इ. पिके घ्यावयाची आहेत, त्यासाठी उपलब्ध गाळपेर जमिनीत विनामूल्य बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल, जलाशयातील पाणी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल. तरी शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड