शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

चारा उत्पादनासाठी गाळपेराची जमीन भाडेपट्ट्यावर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:39 IST

जिल्हा प्रशासनाचा पुढाकार; शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपया भाडे आकारणी

अलिबाग : राज्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे जनावरांच्या चारा उत्पादनावर परिणाम झाला आहे. येत्या काळात चाराटंचाई होऊ नये, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत चारा उत्पादन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील जलसंपदा, मृद व जलसंधारण या विभागांकडील जलप्रकल्पांमधील उपलब्ध गाळपेर जमिनी शेतकºयांना नाममात्र एक रु पये दराने भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.रायगड जिल्ह्याचे पर्जन्यमान राज्यातील इतर भागांपेक्षा चांगले असले तरी शेतकºयांनी उत्पादित केलेला चारा हा केवळ त्यांच्या स्वत:च्या पशुधनाकरिताच वापरता येईल इतका आहे. स्वत:च्या पशुधनाच्या चाºयाची गरजपूर्ती होऊन अन्य शेतकरी, दूध उत्पादकांना माफक दरात चारा उपलब्ध करून द्यावयाचा आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होऊन बुडिताखालील उघड्या गाळपेर जमिनींवर चारा पिकाची लागवड करून चारा उत्पादन करणे हा पर्याय आहे. त्यासाठी इच्छुक शेतकºयांना चारा उत्पादनासाठी या जमिनी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नाममात्र एक रुपये दराने भाडेपट्ट्यावर देण्यात येणार आहेत.पशुधनाच्या चारा उत्पादनासाठी जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसेवी संस्था, गोरक्षण संस्था, तसेच अन्य शेतकरी (ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था उपलब्ध आहे) अशांनाही विनामूल्य बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिवाय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अधिपत्याखालील रोपवाटिका, फळबाग जमिनी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाकडील लघुसिंचन तलावाचे गाळपेर क्षेत्र येथेही चारा उत्पादनासाठी मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा व राज्यातील टंचाईग्रस्त भागातील जनावरांसाठीही चारा उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेचा लाभासाठी शेतकºयांनी पंचायत समित्यांमधील पशुधन विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.विनामूल्य बियाणे उपलब्ध होणारजमिनीत शेतकºयांनी जनावरांसाठी सुयोग्य वैरण, चारा पिके उदा. मका, ज्वारी, बाजरी किंवा न्यूट्री फिड इ. पिके घ्यावयाची आहेत, त्यासाठी उपलब्ध गाळपेर जमिनीत विनामूल्य बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल, जलाशयातील पाणी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल. तरी शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड