शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

रसायनी रेल्वे स्थानकात समस्या; सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:18 IST

निवारा शेड नसल्याचे पावसामुळे प्रवाशांचे हाल

मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर असून येथे विविध उद्योगधंदे आहेत. परिसरात शासकीय कार्यालये, महाविद्यालय, सेबी प्रकल्प,जवळूनच गेलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आदीमुळे रसायनी व परिसराचा नावलौकिक आहे. परंतु येथील रसायनी रेल्वे स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत असून स्थानकात योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

या स्थानकावर दिवा-मुंबई, रत्नागिरी, गोव्याच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या थांबा घेतात. तर नुकतीच सुरु झालेली दिवा-पेण मेमू ट्रेन दिवसात चार वेळा रसायनी रेल्वे स्थानकावर थांबते. रसायनी परिसरात महाविद्यालय असून येथे शिक्षण घेणारे बरेचशे विद्यार्थी रेल्वेने प्रवास करतात. शिवाय रेल्वेने प्रवास करुन कामानिमित्त येणारा कामगारवर्गही मोठा आहे. रसायनी स्थानकावर निवारा शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात तर पावसाळ्यात भिजत गाडीची वाट पाहावी लागते. शिवाय प्रवाशांना बसण्यासाठी स्थानकावर बाकड्यांचीही व्यवस्था नसल्याने ताटकळत उभे रहावे लागत असतानाचे चित्र पहावयास मिळते. तसेच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था स्थानकात नसल्याने काही अंतरावर पायपीट करत जावे लागते. रेल्वे तिकीटघरही स्थानकापासून काही अंतरावर असून प्रवासी तिकीट घेऊन येईपर्यंत रेल्वे गाडी जाण्याची वेळ येते असे प्रवाशांचे म्हणणे आहे. या स्थानकाच्या फ लाटालगत वाढलेल्या गवताचा मुक्त संचार दिसून येतो. तसेच ध्वनिक्षेपक आणि माहिती यांचा मागमूसही या स्थानकातून प्रवाशांना कधीच ऐकायला मिळाला नसल्याचे प्रवासी सांगतात.दरम्यान, रसायनी रेल्वे स्थानकावर सोयी सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत असून समस्या सोडवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.