शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

संरक्षक बंधारे फुटीची समस्या कायम, , १० ठिकाणी संरक्षक बंधाºयास भगदाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 07:03 IST

अलिबाग, पेण आणि पनवेल तालुक्यातील समुद्र उधाण संरक्षक बंधाºयांच्या डागडुजी आणि दुरुस्तीचे काम खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या २० वर्षांत केलेच नसल्याने प्रारंभ झालेली समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटण्याची समस्या आणि खारे पाणी जवळच्या भातशेती जमिनीत घुसून त्या जमिनी नापीक होण्याची समस्या आता अत्यंत उग्र स्वरूप धारण करू लागली आहे.

- जयंत धुळपअलिबाग  - अलिबाग, पेण आणि पनवेल तालुक्यातील समुद्र उधाण संरक्षक बंधाºयांच्या डागडुजी आणि दुरुस्तीचे काम खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या २० वर्षांत केलेच नसल्याने प्रारंभ झालेली समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटण्याची समस्या आणि खारे पाणी जवळच्या भातशेती जमिनीत घुसून त्या जमिनी नापीक होण्याची समस्या आता अत्यंत उग्र स्वरूप धारण करू लागली आहे. यामुळे चिंताग्रस्त शेतकºयांमध्ये संतापाच्या लाटांचे उधाण आले आहे. गेल्या तीन महिन्यांत आठव्या वेळेला गुरुवारी रात्री पौष कृ. तृतीयेच्या रात्री सागरी उधाणाच्यावेळी मोठे शहरापूर गावाच्या पूर्व-पश्चिम बाजूकडील समुद्र संरक्षक बंधाºयास एकूण १० ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी) पडून उधाणाचे खारे पाणी या ३०० एकरपेक्षा अधिक भातशेती जमिनीत घुसून सुमारे ५०० शेतकºयांच्या शेतजमिनी खाºया झाल्या आहेत.शासनाच्या खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या सरखार संरक्षक बंधाºयास चार ठिकाणी, पांडेलेशिल संरक्षक बंधाºयास दोन ठिकाणी, लेहरीकोठा बंधाºयास आणि भंगारकोठा संरक्षक बंधाºयास प्रत्येकी एक ठिकाणी व अन्य दोन अशा एकूण १० ठिकाणी संरक्षक बंधाºयास मोठी भगदाडे पडली आहेत. सर्वात मोठे भगदाड (खांड) २० फूट लांबीचे आहे. बंधारे फुटून समुद्राचे खारे पाणी गावातील वस्तीपर्यंत पोहचले आहे.शासकीय अधिकारी फिरकले नाही1गेल्या तीन महिन्यांपासून संरक्षक बंधारे फुटीच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केलेले असताना, या विषयाशी निगडित खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने कोणत्याही स्वरूपाची प्रतिबंधक उपाययोजना वा आपत्ती नियंत्रणात्मक उपाययोजना देखील केलेली नाही. खारभूमी विभागाची कार्यवाही अद्यापही सुस्तावलेल्याच अवस्थेत आहे. यामुळे बाधित व संभाव्य बाधित अशा सर्वच शेतकºयांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.2गुरुवारी संरक्षक बंधारे फुटून शहापूर धेरंड परिसरात समुद्राचे खारे पाणी घुसण्याच्या या घटनेस बारा तास उलटून गेले तरी कोणत्याही शासकीय विभागाचा कोणताही कर्मचारी वा अधिकारी या आपद्ग्रस्त परिसरात फिरकलेला नाही. मोठे शहापूर गावात शेतकºयांनी शुक्रवारी संध्याकाळी बैठकीसाठी गावकी अध्यक्ष अमरनाथ भगत यांना बोलावले असून त्यात पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे.उधाणाचे हेच खारे पाणी शेतजमीन ओलांडून पुढे मोठे शहापूर गावातील २५ तर धाकटे शहापूर गावातील १७ घरांच्या पायापर्यंत पोहोचून या सर्व घरांच्या भोवती समुद्रासारखी परिस्थिती तयार होवून धोका निर्माण झाला आहे.100वर्षे जुन्या जि.प. शाळा इमारतीला देखील खाºया पाण्याचा वेढा पडला असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे समन्वयक तथा शहापूरमधील शेतकरी राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.शेतकºयांचे नुकसानशहापूर-धेरंड ही गावे जिताडा, कोळंबी आणि खौल या माशांच्या शेती व संवर्धनाकरिता प्रसिध्द आहेत. या मत्स्य संवर्धनाकरिता या गावांमध्ये घरटी एक मत्स्य तलाव आहे. गुरु वारी रात्रीच्या या उधाणाचे खारे पाणी धाकटे शहापूर गावातील शेती ओलांडून एकूण २० मत्स्य तलावांत घुसून पुढे वाहात गेल्याने तलावातील तयार विक्री योग्य मासे वाहून गेल्याने, मस्यतळी शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मत्स्य शेतीच्या नुकसानीचा एकूण आकडा सुमारे ३० लाखांच्या घरात पोहोचला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.शहापूर-धेरंड ही गावेसंरक्षक बंधारे फु टून वारंवार शेतकºयांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र शासकीय यंत्रणा याकडे लक्ष देत नसल्याने काय करावे अशा प्रश्न येथील शेतकºयांना पडला आहे. भात हे येथील मुख्य पीक असून याच पिकाचे नुकसान झाल्याने मोठा फटकाशेतकºयांना बसला आहे. नैसर्गिक संकटाबरोबरच येणाºया या कृ त्रिम संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. तेव्हा या बंधाºयाच्या दुरु स्तीसाठी मदत करावी, अशी मागणी वारंवार हे शेतकरी शासनाकडे करीत आहेत. 

टॅग्स :Raigadरायगड