शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

बिद्रे खून प्रकरणी उच्च न्यायालयात आव्हान देण्याची आरोपींच्या वकिलांची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 03:42 IST

अश्विनी बिद्रे खून खटल्यातील आरोपींवर आरोप निश्चित करण्याबाबत अलिबागच्या सत्र न्यायालयात मागील महिन्यात सुनावणी झाली होती.

अलिबाग : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्याला गुरूवारी नवीन वळण देण्याचा प्रयत्न झाला. आरोपींवर दोषारोप निश्चित करण्याबाबत न्यायालयाने भूमिका घेतली होती. त्या दोषारोपांना आरोपीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे येथील न्यायालयाने याबाबतची पुढील सुनावणी आता १८ जुलै रोजी घेण्याचे जाहीर केले.अश्विनी बिद्रे खून खटल्यातील आरोपींवर आरोप निश्चित करण्याबाबत अलिबागच्या सत्र न्यायालयात मागील महिन्यात सुनावणी झाली होती. न्यायालयात आरोपीविरोधात खून करणे, संघटितपणे कट रचणे आणि खून करणे, अपहरण करणे, पुरावे नष्ट करणे, फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे या कलमान्वये दोषारोप ठेवण्यात यावेत अशी मागणी विशेष सरकारी पक्षाने न्यायालयात केली होती. त्यानुसार न्यायालयाने आरोपींवर संबंधित दोषारोप ठेवणार असल्याचे सांगितले होते. यावर गुरुवारी न्यायालयामध्ये आरोपीविरोधात ठेवण्यात आलेल्या आरोपांबाबत आरोपींच्या वकिलांनी हरकत घेत आरोपांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी मुदत द्यावी अशी मागणी न्यायालयात केली. यावर विशेष सरकारी वकिलांनी हरकत घेतली. आरोपींनीच या खटल्याची सुनावणी जलदगतीने होण्याबाबत उच्च न्यायालयातून आदेश आणले आहेत आणि तेच आता खटल्यामध्ये चालढकलपणा करत असल्याचे विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. याबाबत आता १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे

टॅग्स :Courtन्यायालय