शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

बाळ झाल्याचा आनंद ठरला क्षणिक; वाळवटीतील गर्भवतीचा प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:13 IST

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाकडे पुरेसे लक्ष न दिल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, दिघी : वाळवटी येथील गर्भवतीची सिझेरियन प्रसूती झाल्यानंतर बाळ, बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे समजताच कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही.  मात्र, प्रसूतीनंतर काही वेळातच रक्तदाब वाढल्याने आणि अतिरक्तस्राव झाल्यामुळे बाळंतिणीचा मृत्यू झाला अन् अवघ्या क्षणात कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी (ता.३) ही घटना घडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाकडे पुरेसे लक्ष न दिल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

प्रसूतीसाठी गुरुवारी गर्भवती श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. त्याच दिवशी तिची यशस्वी प्रसूतीही झाली. मात्र, त्यानंतर महिलेला त्रास होत असल्यामुळे तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे उपचारासाठी पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला. 

रुग्णालयात केवळ प्राथमिक स्वरूपाचेच उपचार उपलब्ध घटनेनंतर स्थानिक रुग्णालयातील सुविधांचा अभाव समोर आला आहे. श्रीवर्धन व म्हसळा,  तसेच मंडणगड तालुक्यातील  अनेक रुग्ण या रुग्णालयांवर अवलंबून आहेत. मात्र, सध्या येथे केवळ प्राथमिक स्वरूपाचेच उपचार उपलब्ध आहेत. जटिल प्रसंगांमध्ये रुग्णांना तत्काळ मुंबई, तसेच जिल्हा रुग्णालयात हलवावे लागते; परंतु वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने अनेकवेळा अशा दुर्दैवी घटना घडतात.

रुग्णालयात सुविधांचा अभाव, महत्त्वाची पदे रिक्तरुग्णालयात सध्या स्त्रीरोगतज्ज्ञ पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे गर्भवतींना योग्य व वेळेवर तज्ज्ञ सेवा मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.  वैद्यकीय अधीक्षक पदही रिक्त असून, रुग्णालयाचे प्रशासकीय कामकाज तात्पुरत्या जबाबदारीवर सुरू आहे.  आरोग्य विभागाने या पदांवर तातडीने नेमणुका करून रुग्णालयातील सेवांचा दर्जा सुधारावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

रुग्णाला अतिरक्तस्राव झाल्याने पुढील उपचारसाठी आयसीयू सुविधा मिळावी, यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. डॉ. प्रफुल्ल पावसेकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक.

टॅग्स :Raigadरायगडhospitalहॉस्पिटल