शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

रेल्वेमार्गावर जलद गाड्यांना प्राधान्य, लोकल पॅसेंजर गाड्या दोन ते तीन तास उशिरा, कोकणवासीयांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 06:48 IST

रेल्वे कोकणात आल्यानंतर कोकणाचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. धावणाºया गाड्यांचाही कोकणवासीयांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे वाटत होते. मात्र परिस्थिती याउलट होऊन या कोकण रेल्वेमार्गाचा उपयोग व फायदा कोकण सोडून इतर राज्यांना मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे.

दासगाव : रेल्वे कोकणात आल्यानंतर कोकणाचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. धावणाºया गाड्यांचाही कोकणवासीयांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे वाटत होते. मात्र परिस्थिती याउलट होऊन या कोकण रेल्वेमार्गाचा उपयोग व फायदा कोकण सोडून इतर राज्यांना मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. ज्यांना याचा फायदा झाला पाहिजे ते कोकणवासीय मात्र यापासून वंचित आहेत. कोकणात धावणाºया लोकल गाड्या या प्रवासादरम्यान ठिकठिकाणच्या स्थानकांत अर्धा अर्धा एक एक तास थांबवून या मार्गावरून धावणाºया इतर राज्यांत जाणाºया जलद एक्स्प्रेस गाड्यांना पहिले प्राधान्य देण्यात येत आहे. याचा फटका कोकणात प्रवास करणाºया प्रवाशांना बसत असून त्यांना प्रवासामध्ये तीन-चार तास गाडीमध्ये बसून वेळ काढावा लागत आहे. एक तासाच्या प्रवासाला तीन तीन चार चार तास लागत असल्याने प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.सुरुवातीच्या काळात पनवेल ते रोहा, रोहा ते चिपळूण आणि पुढे गोव्यासह इतर राज्यांना हा रेल्वेमार्ग जोडण्यात आला. कोकणवासीयांच्या प्रगतीसाठी कोकण रेल्वेचा फायदा आजतागायत कधीच झाला नाही. कोकण रेल्वे हा कोकणवासीयांना मुंबईशी जोडणारा सर्वांत जवळचा स्वस्त मार्ग असला तरी कोकण रेल्वेच्या स्थानकांची उभारणी करताना ही स्थानके कोणतीही मोठी गावे अगर तालुक्यांच्या ठिकाणी येणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्यात आली. गाव आणि तालुक्यांच्या ठिकाणापासून लांब निर्जन ठिकाणी स्थानकांची उभारणी करूनही स्थानिक ग्रामस्थ रेल्वेकडे वळले असले तरी पर्यटकांनी मात्र रेल्वेकडे पाठ फिरविली. याचा फटका रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह तळ कोकणात जाणाºया कोकण रेल्वेच्या उत्पन्नाला बसला. कोकणात धावणाºया आणि मुंबईशी जोडलेल्या गाड्यांचे उत्पन्न कमी, प्रवासी संख्या कमी अशी कारणे दाखवत लांब पल्ल्याच्या गाड्या, आॅनलाइन बुकिंग, रिझर्व्हेशन काउंटर यांसह अनेक सुविधा कोकण रेल्वेमधील स्थानकांना कधी मिळाल्याच नाहीत. पर्यायाने ‘कोकण रेल्वे’ नाव असलेल्या या रेल्वेमार्गावरून इतर राज्यांना जोडणाºया गाड्या धावत आहेत.कोकण रेल्वेच्या स्थानिक गाड्या कायम तोट्यातपनवेलपासून कोकणात धावणारी कोकण रेल्वे ही बहुतांशी सिंगल ट्रॅक आहे. यामुळे एकाच वेळी दोन गाड्यांचे वेळापत्रक असल्यास एक गाडी कोणत्या तरी स्थानकात उभी करून दुसºया गाडीला मार्ग मोकळा करून दिला जातो. कोकण रेल्वेच्या स्थानिक गाड्या कायमच तोट्यात असल्याचे दाखवल्यामुळे बाजूला उभी राहण्याची वेळ कोकणात धावणाºया गाड्यांवर नेहमी येते. कोकणवासीयांसाठी धावणाºया अप आणि डाऊन अशा दोन्ही म्हणजेच केवळ चार सुपर फास्ट गाड्या निघून जाण्याची वाट पाहत इतर गाड्या उभ्या असल्याचे चित्र संपूर्ण कोकणात पाहावयास मिळते. यामुळे कोकणातील या पॅसेजर गाड्या कधीही वेळेवर पोहोचत नाहीत.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वे