शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

मान्सूनपूर्व कौलारू घरे छावणीला आला वेग

By निखिल म्हात्रे | Updated: June 3, 2024 09:44 IST

ग्रामीण भागात आजही चंद्रमौळी कौलारू घरांचे अस्तित्व कायम टिकून आहे.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी निवारा ही गरज अतिशय महत्त्वाची आहे. बदलत्या काळानुसार सिमेंट, काँक्रिटची छत असलेली पक्की घरे भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र, ग्रामीण भागात आजही चंद्रमौळी कौलारू घरांचे अस्तित्व कायम टिकून आहे.

जिल्ह्यात पावसाला सुरु होताच कौलारू घरांचे छत छावणीला वेग आला आहे. ग्रामीण भागात पूर्वी कुडा-मातीच्या भिंती व त्यावर गवताचे किंवा कवेलूचे छत असलेली घरे मोठ्या प्रमाणात दिसायची. मात्र, आधुनिकीकरणामुळे दिवसेंदिवस काळ बदलत गेला. हळूहळू मातीच्या घरांऐवजी सिमेंट काँक्रिटचे छत असलेली पक्की घरे बांधण्याकडे नागरिक वळू लागले. गावखेड्यात माकडांचा उच्छाद असतो. त्यामुळे माकडे कौलारू घरांच्या छताचे नुकसान करीत असतात. त्यासाठी मान्सूनपूर्व छत दुरुस्ती करणे गरजेचे असते.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत कवेलूची छत असलेली घरे आल्हाददायक असतात. छत दुरुस्ती करताना जुने मोडकळीस आलेले लाकूड फाटे बदलणे, पावसाळ्यात पावसाचे पाणी घराच्या छतातून टपकून घरात शिरू नये, यासाठी तुटफूट झालेली कवेलू बदलून त्याऐवजी नवीन कवेलू बसविणे, अशी दुरुस्ती कामे करावी लागतात. त्यासाठी दरवर्षी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सध्या सिमेंटची पक्की घरे बांधकामाच्या साहित्याच्या किमती गगनाला भिडल्याने आपली कवेलूची छत असलेली झोपडीच बरी, असे म्हणण्याची वेळ आली आहे.घरांची संख्या अधिक - 

ग्रामीण भागात कौलारु घरांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. शहर सारख्या ठिकाणी सिमेंटी घरांची बांधणी मोठ्या प्रमाणात असते. तर कौलारु घरे थंड असतात. त्यामानाने सिमेंटचे बांधकाम असल्यामुळे उष्णता अधिक जाणवते. त्यामुळे ग्रामीण भागात आजही कौलारु घरांची संख्या अधिक दिसून येते.

टॅग्स :alibaugअलिबागmonsoonमोसमी पाऊस