शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

माणगाव-चांदोरे रस्त्यावर जीवघेण्या खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:30 IST

म्हसळा-श्रीवर्धन-दिघी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीट चौपदरीकरणाचे काम मागील वर्षी चालू झाले आहे. काम अपुरे राहिल्याने माणगाव-मोर्बा-चांदोरे दरम्यान रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : म्हसळा-श्रीवर्धन-दिघी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीट चौपदरीकरणाचे काम मागील वर्षी चालू झाले आहे. काम अपुरे राहिल्याने माणगाव-मोर्बा-चांदोरे दरम्यान रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाºया वाहनचालकांना आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून रोज प्रवास करावा लागतो. त्यातच रस्त्याचे खड्डे बुजविण्यास वारंवार स्टोन क्रशर (ग्रिड)चा वापर करत असल्याने रस्त्यात चिखल होत असून, चिखल दुचाकीस्वार व पादचारी यांच्यावर उडण्याच्या घटना होत आहेत. तसेच दुचाकी गाडी घसरण्याच्या घटना घडत आहेत.या असंख्य खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासीवर्गाला अनेक प्रकारच्या अस्थी विकारांचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर लोकांच्या वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. हे जीवघेणे भले मोठे खड्डे या महामार्गावरील संभाव्य अपघातांना आमंत्रण देणारे आहेत. संबंधित विभागाकडून खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरती वरवरची मलमपट्टी केली जाते; परंतु या मलमपट्टीचा काही उपयोग होत नाही. रस्त्यावरील धोका कायम राहात आहे.कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव आता तोंडावर येऊन ठेपला आहे. या उत्सवकाळात मुंबईतील सर्व चाकरमानी आपापल्या गावी येतात. रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन या विभागातील बहुतांशी चाकरमानी नोकरी-धंद्यानिमित्ताने मुंबईत राहतात. हे सर्व चाकरमानी गणेशोत्सवाला आपापल्या गावी खासगी वाहनांनी आणि एसटी बसने येतात; पण सध्या माणगाव-मोर्बा ते म्हसळा-श्रीवर्धन महामार्गावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडल्याने या महामार्गावरून प्रवास करणाºया वाहनांसह प्रवासी व सर्व गणेशभक्तांना या वर्षी या जीवघेण्या खड्ड्यांचा सामना करावा लागणार असे चित्र आहे. विघ्नहर्ता श्री गणेशाचे देखील याच खड्डेयुक्त रस्त्यावरूनच आगमन होणार आहे.दरम्यानच्या काळात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रायगडचा दौरा केला. त्या वेळी ते म्हणाले, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वीच भरले जातील. त्यांच्या या आश्वासनाच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत या महामार्गावरील खड्डे आजही ठाण मांडून आहेत. गणेशभक्तांचे लक्ष हे रस्ते कधी खड्डेमुक्त होतात, याकडे लागून राहिले आहे.म्हसळा-श्रीवर्धन-दिघी रस्त्याचे काम करणाºया कत्राटदारानेच खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम करणे अपेक्षित आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून त्यास सक्त आदेश सत्वर निगर्मित होणे आवश्यक असल्याचे म्हणणे ग्रमस्थांचे आहे.

टॅग्स :Raigadरायगड