शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

माणगाव-चांदोरे रस्त्यावर जीवघेण्या खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:30 IST

म्हसळा-श्रीवर्धन-दिघी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीट चौपदरीकरणाचे काम मागील वर्षी चालू झाले आहे. काम अपुरे राहिल्याने माणगाव-मोर्बा-चांदोरे दरम्यान रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : म्हसळा-श्रीवर्धन-दिघी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीट चौपदरीकरणाचे काम मागील वर्षी चालू झाले आहे. काम अपुरे राहिल्याने माणगाव-मोर्बा-चांदोरे दरम्यान रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाºया वाहनचालकांना आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून रोज प्रवास करावा लागतो. त्यातच रस्त्याचे खड्डे बुजविण्यास वारंवार स्टोन क्रशर (ग्रिड)चा वापर करत असल्याने रस्त्यात चिखल होत असून, चिखल दुचाकीस्वार व पादचारी यांच्यावर उडण्याच्या घटना होत आहेत. तसेच दुचाकी गाडी घसरण्याच्या घटना घडत आहेत.या असंख्य खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासीवर्गाला अनेक प्रकारच्या अस्थी विकारांचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर लोकांच्या वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. हे जीवघेणे भले मोठे खड्डे या महामार्गावरील संभाव्य अपघातांना आमंत्रण देणारे आहेत. संबंधित विभागाकडून खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरती वरवरची मलमपट्टी केली जाते; परंतु या मलमपट्टीचा काही उपयोग होत नाही. रस्त्यावरील धोका कायम राहात आहे.कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव आता तोंडावर येऊन ठेपला आहे. या उत्सवकाळात मुंबईतील सर्व चाकरमानी आपापल्या गावी येतात. रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन या विभागातील बहुतांशी चाकरमानी नोकरी-धंद्यानिमित्ताने मुंबईत राहतात. हे सर्व चाकरमानी गणेशोत्सवाला आपापल्या गावी खासगी वाहनांनी आणि एसटी बसने येतात; पण सध्या माणगाव-मोर्बा ते म्हसळा-श्रीवर्धन महामार्गावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडल्याने या महामार्गावरून प्रवास करणाºया वाहनांसह प्रवासी व सर्व गणेशभक्तांना या वर्षी या जीवघेण्या खड्ड्यांचा सामना करावा लागणार असे चित्र आहे. विघ्नहर्ता श्री गणेशाचे देखील याच खड्डेयुक्त रस्त्यावरूनच आगमन होणार आहे.दरम्यानच्या काळात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रायगडचा दौरा केला. त्या वेळी ते म्हणाले, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वीच भरले जातील. त्यांच्या या आश्वासनाच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत या महामार्गावरील खड्डे आजही ठाण मांडून आहेत. गणेशभक्तांचे लक्ष हे रस्ते कधी खड्डेमुक्त होतात, याकडे लागून राहिले आहे.म्हसळा-श्रीवर्धन-दिघी रस्त्याचे काम करणाºया कत्राटदारानेच खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम करणे अपेक्षित आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून त्यास सक्त आदेश सत्वर निगर्मित होणे आवश्यक असल्याचे म्हणणे ग्रमस्थांचे आहे.

टॅग्स :Raigadरायगड