शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर

By admin | Updated: May 9, 2016 02:27 IST

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आपण सारे’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने आजवर अनेकांचे प्राण वाचवले असून, हा आदर्श उपक्रम आहे

खालापूर : अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आपण सारे’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने आजवर अनेकांचे प्राण वाचवले असून, हा आदर्श उपक्रम आहे. सोशल मीडियाचा होत असलेला सकारात्मक वापर आदर्श निर्माण करीत आहे, असे प्रतिपादन खालापूर तालुक्याचे तहसीलदार अजित नैराळे यांनी केले.गेल्या ५२ दिवसांत विविध कारणाने खोपोली परिसरात पाच तरुणांना मोटारसायकल अपघातात जीव गमवावा लागला असून, जखमी होण्याचे प्रकारही वाढले आहेत. या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या ग्रुपने खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील पटांगणात तरुणाई नव्हे, तर संपूर्ण समाजाला प्रेरक असा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेच नव्हे तर शहरातील नामांकित व्यक्ती या कार्यक्रमासाठी एकत्र आल्या होत्या. गेले आठवडाभर अनेक माध्यमांतून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची चर्चा होती. महामार्गावरून अत्यंत महागड्या किमतीच्या दुर्मीळ मोटारसायकलस्वार प्रवास करण्याचा छंद जोपासत असतात. त्यांचे अनुकरण करीत धूमस्टाईल मोटारसायकल चालवणारे तरुण अपघातात सापडत आहेत. हे लक्षात घेऊनच या कार्यक्रमात आम्ही मोटारसायकल रायडिंगचा आनंद घेताना सुरक्षेची कोणती साधने वापरतो आणि ती कशी आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. खूप स्वस्तातली सुरक्षारक्षक साधने आपण वापरत नसल्याने एवढेच नव्हे, तर साधे हेल्मेट न वापरल्याने मोलाचा जीव गमावून बसतो. असे यापुढे कोणाच्या बाबतीत घडू नये, यासाठी उपस्थितांकडून शपथ घेण्यात आली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातून अनेक तरुण व पालक यावेळी आवर्जून उपस्थित होते. अत्यंत साधेपणाने कोणताही अवाजवी खर्च व स्वागत किंवा आभाराची औपचारिकता पार न पाडता फक्त अपघातात कशी मदत करावी, सुरक्षिततेची साधने कशी वापरावीत व अपघातांचे प्रमाण कसे घटवता येईल, या बाबींकडे लक्ष दिले गेले. या व अशा उपक्रमांतून समाजातल्या नीतिमूल्यांची जाणीव तर होतेच किंबहुना आपण कुठेतरी कमी पडत आहोत, आपल्याही समाजसेवेसाठी दोन पावले पुढे ठेवली पाहिजेत, अशी प्रेरणा मिळते. असे सांगताना वाहने नियमाने चालवावीत, अल्पवयीन मुलांच्या हातात पालकांनी वाहने देऊ नयेत, अपघातात मदतीला हयगय करू नका, असो मार्गदर्शनवजा सल्ला अजित नैराळे यांनी दिला.हनुमान मंडळाचे राजेंद्र फक्के, नरेंद्र गायकवाड, किशोर पाटील, सुजाता जाधव यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. जगदीश मरागजे यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रुपचे गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले.