शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर

By admin | Updated: May 9, 2016 02:27 IST

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आपण सारे’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने आजवर अनेकांचे प्राण वाचवले असून, हा आदर्श उपक्रम आहे

खालापूर : अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आपण सारे’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने आजवर अनेकांचे प्राण वाचवले असून, हा आदर्श उपक्रम आहे. सोशल मीडियाचा होत असलेला सकारात्मक वापर आदर्श निर्माण करीत आहे, असे प्रतिपादन खालापूर तालुक्याचे तहसीलदार अजित नैराळे यांनी केले.गेल्या ५२ दिवसांत विविध कारणाने खोपोली परिसरात पाच तरुणांना मोटारसायकल अपघातात जीव गमवावा लागला असून, जखमी होण्याचे प्रकारही वाढले आहेत. या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या ग्रुपने खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील पटांगणात तरुणाई नव्हे, तर संपूर्ण समाजाला प्रेरक असा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेच नव्हे तर शहरातील नामांकित व्यक्ती या कार्यक्रमासाठी एकत्र आल्या होत्या. गेले आठवडाभर अनेक माध्यमांतून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची चर्चा होती. महामार्गावरून अत्यंत महागड्या किमतीच्या दुर्मीळ मोटारसायकलस्वार प्रवास करण्याचा छंद जोपासत असतात. त्यांचे अनुकरण करीत धूमस्टाईल मोटारसायकल चालवणारे तरुण अपघातात सापडत आहेत. हे लक्षात घेऊनच या कार्यक्रमात आम्ही मोटारसायकल रायडिंगचा आनंद घेताना सुरक्षेची कोणती साधने वापरतो आणि ती कशी आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. खूप स्वस्तातली सुरक्षारक्षक साधने आपण वापरत नसल्याने एवढेच नव्हे, तर साधे हेल्मेट न वापरल्याने मोलाचा जीव गमावून बसतो. असे यापुढे कोणाच्या बाबतीत घडू नये, यासाठी उपस्थितांकडून शपथ घेण्यात आली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातून अनेक तरुण व पालक यावेळी आवर्जून उपस्थित होते. अत्यंत साधेपणाने कोणताही अवाजवी खर्च व स्वागत किंवा आभाराची औपचारिकता पार न पाडता फक्त अपघातात कशी मदत करावी, सुरक्षिततेची साधने कशी वापरावीत व अपघातांचे प्रमाण कसे घटवता येईल, या बाबींकडे लक्ष दिले गेले. या व अशा उपक्रमांतून समाजातल्या नीतिमूल्यांची जाणीव तर होतेच किंबहुना आपण कुठेतरी कमी पडत आहोत, आपल्याही समाजसेवेसाठी दोन पावले पुढे ठेवली पाहिजेत, अशी प्रेरणा मिळते. असे सांगताना वाहने नियमाने चालवावीत, अल्पवयीन मुलांच्या हातात पालकांनी वाहने देऊ नयेत, अपघातात मदतीला हयगय करू नका, असो मार्गदर्शनवजा सल्ला अजित नैराळे यांनी दिला.हनुमान मंडळाचे राजेंद्र फक्के, नरेंद्र गायकवाड, किशोर पाटील, सुजाता जाधव यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. जगदीश मरागजे यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रुपचे गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले.