शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पोसरी-साळोख रस्ता दोन महिन्यांत उखडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 22:33 IST

ग्रामस्थ संतप्त : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील काम निकृष्ट

नेरळ : कर्जत तालुक्यातील पोसरी-आरवंद-साळोख या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची अवघ्या दोन महिन्यांत दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांनी ठेकेदाराची बाजू घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

कर्जत-मुरबाड रस्त्याला लागून असलेल्या पोसरी गावापासून आरवंद-साळोख या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी २०१९ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजुरी देण्यात आली होती. कामाचे कंत्राट हे ठाणे येथील कंपनीने घेतला होता. मार्चमध्ये कामाला सुरुवात करून कंत्राटदार कंपनीने मे माहिन्यांत डांबरीकरण काम पूर्ण केले होते; परंतु ही कंपनी मोठी असल्याने अधिकारीही या रस्त्याच्या कामाकडे फिरकले नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

जूनमध्ये शेवटच्या आठवड्यात तर जुलै महिन्यात फार किरकोळ पाऊस होऊनही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देत नाहीत. त्यामुळे ठेकेदार कंपनी रस्त्यावर डांबर कमी प्रमाणात टाकत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आमचा प्रवास अनेक वर्षे खड्ड्यातून सुरू होता आणि आता पुन्हा दोन कोटी रुपये खर्च करून केलेल्या रस्त्यावरून जातानाही खड्ड्यातून प्रवास करावा लागणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे हा रस्ता पुन्हा चांगल्या दर्जाचा करून घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ नील मुने, अतिष मुने, लक्ष्मण मुने, दिलीप ढोले आदी ग्रामस्थांनी केली आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या नियमानुसार रस्त्याचे काम झाले आहे. रस्त्याच्या ठिकाणी आम्ही भेटी दिल्या आहेत. मात्र, ग्रामस्थांना त्याबाबत माहिती नसेल; परंतु आम्ही कामाचा दर्जा टिकून राहील असेच काम करून घेणार आहोत. - व्ही. ए. खेडेकर, शाखा अभियंता,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

अनेक वर्षांनंतर आमच्या रस्त्यावर डांबरीकरण झाले होते. मात्र, ठेकेदाराने या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याने दोन महिन्यांत रस्ता उखडला आहे. अधिकारी वर्गानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करून द्यावे. - नील मुने, ग्रामस्थ, बारणे