शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

उरण परिसरातील प्रदूषणाची समस्या गंभीर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 01:00 IST

Uran : विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात समुद्र, खाड्या किनारी आणि मोकळ्या परिसरात झालेल्या प्रचंड दगड-मातीच्या भरावामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी झाली आहे.

उरण : उरण परिसरातील वाढते औद्योगिकीकरण, प्रचंड प्रमाणात होत असलेले मातीचे भराव, मॅन्ग्रोव्हजची होणारी प्रचंड वृक्षतोड, उरण-पनवेल मार्गावरील डोंगर कपारीत चालणाऱ्या धूळ फेकणाऱ्या दगडखाणी आणि रासायनिक घातक प्रकल्पांमुळे येथील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे. मात्र त्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.उरण परिसरात प्रचंड औद्योगिकीकरण सुरू आहे. अत्याधुनिक जेएनपीटी, इतर खासगी बंदरांमुळे विविध प्रकारच्या कंपन्या, रासायनिक प्रकल्प, कंटेनर व इतर माल साठवणुकीची शेकडो गोदामे उभारण्यात आली आहेत. विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात समुद्र, खाड्या किनारी आणि मोकळ्या परिसरात झालेल्या प्रचंड दगड-मातीच्या भरावामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी झाली आहे. समुद्र, खाड्या, जलाशयांत झालेल्या प्रचंंड दगड-मातीच्या भरावामुळे समुद्राची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने गावांसभोवार असलेले बांध-बंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी गावागावात शिरू लागले आहे.नवी मुंबई सेझ, जेएनपीटी सेझ प्रकल्पांसाठी झालेल्या भरावामुळे तर गावांपासून समुद्र, खाड्यांपर्यत पावसाळी पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नाले बुजले गेले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय परिसरातील प्रचंड दगड-मातीच्या भरावामुळे स्थलांतरित आणि विविध स्थानिक जलचर पक्ष्यांची वास्तव्याची ठिकाणे नष्ट झाली आहेत. भरावासाठी डोंगर, टेकड्या भुईसपाट करण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील पशू-पक्ष्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात उभारण्यात आलेल्या धोकादायक तसेच अत्यंत ज्वालाग्राही रासायनिक प्रकल्पांमुळे रासायनिक दूषित पाणी समुद्रात आणि खाड्यांत मिसळत आहे. त्यावर पर्यावरण खात्याचे फारसे नियंत्रणच नसल्याने जल, वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पारंपरिक मासेमारीही आली धोक्यात वाढत्या जलप्रदूषणामुळे पारंपरिक मासेमारीही धोक्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी दुर्मीळ मॅन्ग्रोव्हज झाडांची बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. उरण-पनवेल मार्गावरील डोंगर कपारीत चालणाऱ्या धूळ फेकणाऱ्या दगडखाणी आणि क्वाऱ्या दिवसरात्र सुरू आहेत. यामुळे हवेत उडणाऱ्या धुरळ्याने परिसर व्यापून जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविणेही कठीण होते. नाकातोंडात धूळ जात असल्याने आरोग्याशी खेळ सुरू आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण