शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

उरण परिसरातील प्रदूषणाची समस्या गंभीर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 01:00 IST

Uran : विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात समुद्र, खाड्या किनारी आणि मोकळ्या परिसरात झालेल्या प्रचंड दगड-मातीच्या भरावामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी झाली आहे.

उरण : उरण परिसरातील वाढते औद्योगिकीकरण, प्रचंड प्रमाणात होत असलेले मातीचे भराव, मॅन्ग्रोव्हजची होणारी प्रचंड वृक्षतोड, उरण-पनवेल मार्गावरील डोंगर कपारीत चालणाऱ्या धूळ फेकणाऱ्या दगडखाणी आणि रासायनिक घातक प्रकल्पांमुळे येथील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे. मात्र त्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.उरण परिसरात प्रचंड औद्योगिकीकरण सुरू आहे. अत्याधुनिक जेएनपीटी, इतर खासगी बंदरांमुळे विविध प्रकारच्या कंपन्या, रासायनिक प्रकल्प, कंटेनर व इतर माल साठवणुकीची शेकडो गोदामे उभारण्यात आली आहेत. विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात समुद्र, खाड्या किनारी आणि मोकळ्या परिसरात झालेल्या प्रचंड दगड-मातीच्या भरावामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी झाली आहे. समुद्र, खाड्या, जलाशयांत झालेल्या प्रचंंड दगड-मातीच्या भरावामुळे समुद्राची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने गावांसभोवार असलेले बांध-बंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी गावागावात शिरू लागले आहे.नवी मुंबई सेझ, जेएनपीटी सेझ प्रकल्पांसाठी झालेल्या भरावामुळे तर गावांपासून समुद्र, खाड्यांपर्यत पावसाळी पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नाले बुजले गेले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय परिसरातील प्रचंड दगड-मातीच्या भरावामुळे स्थलांतरित आणि विविध स्थानिक जलचर पक्ष्यांची वास्तव्याची ठिकाणे नष्ट झाली आहेत. भरावासाठी डोंगर, टेकड्या भुईसपाट करण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील पशू-पक्ष्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात उभारण्यात आलेल्या धोकादायक तसेच अत्यंत ज्वालाग्राही रासायनिक प्रकल्पांमुळे रासायनिक दूषित पाणी समुद्रात आणि खाड्यांत मिसळत आहे. त्यावर पर्यावरण खात्याचे फारसे नियंत्रणच नसल्याने जल, वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पारंपरिक मासेमारीही आली धोक्यात वाढत्या जलप्रदूषणामुळे पारंपरिक मासेमारीही धोक्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी दुर्मीळ मॅन्ग्रोव्हज झाडांची बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. उरण-पनवेल मार्गावरील डोंगर कपारीत चालणाऱ्या धूळ फेकणाऱ्या दगडखाणी आणि क्वाऱ्या दिवसरात्र सुरू आहेत. यामुळे हवेत उडणाऱ्या धुरळ्याने परिसर व्यापून जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविणेही कठीण होते. नाकातोंडात धूळ जात असल्याने आरोग्याशी खेळ सुरू आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण