शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

समस्यांमुळे माणगावकर हैराण, सांडपाण्यामुळे काळनदी होतेय प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 03:02 IST

नगरपंचायतीस तीन वर्षे पूर्ण होत असताना नगरपंचायतीपुढे कचऱ्याचा मोठा यक्षप्रश्न उभा आहे. योग्य डम्पिंग ग्राउंड नसल्याने कच-याची विल्हेवाट लावता येत नाही, तसेच माणगाव शहराचे शहरीकरण झपाट्याने होत असल्याने मानवी वस्ती वाढत आहे.

- गिरीश गोरेगावकरमाणगाव  - नगरपंचायतीस तीन वर्षे पूर्ण होत असताना नगरपंचायतीपुढे कचऱ्याचा मोठा यक्षप्रश्न उभा आहे. योग्य डम्पिंग ग्राउंड नसल्याने कच-याची विल्हेवाट लावता येत नाही, तसेच माणगाव शहराचे शहरीकरण झपाट्याने होत असल्याने मानवी वस्ती वाढत आहे. त्यामुळे सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्याने काळ नदी लागत असणाºया वस्तीचे सांडपाणी नदीपात्रात जावून प्रदूषण वाढत आहे.माणगाव नगरपंचायत झाली त्यामध्ये खादाड, नाणोरे, उतेखोल ही माणगाव लागत असणारी गावे जोडली गेली. आता नगरपंचायत झाल्यामुळे माणगावच्या विकासाला आता गती येईल, असे माणगावकरांना वाटले होते; परंतु असे काहीही झालेले नाही. ज्या प्राथमिक समस्या माणगावमध्ये होत्या त्या तशाच गेल्या दोन वर्षे राहिल्या. गेल्या वर्षात माणगावमध्ये प्रमुख रस्ता मानला जाणारा कचेरी रोड, दुतर्फा काँक्रीट गटारे महामार्गावरील काँक्रीट गटारे, वैयक्तिक शौचालये, गणपती विसर्जन घाट हे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागले असून, अंतर्गत रस्त्यांची कामे व गटारे अजून शिल्लक आहेत. जुन्या माणगावमध्ये पाण्याची अनियमितता आहे. पाणी वेळेवर येत नाही आणि आले तरी कधी जास्त वेळ असते तर कधी अतिशय कमी वेळ, त्यामुळे नागरिकांचे हाल होतात.ग्रामपंचायत कालखंडामध्ये अनधिकृत बांधकामांना दिलेल्या संमतीमुळे आज सांडपाण्याची समस्या भेडसावत आहे. ग्रामपंचायत कालावधीत सदनिकांना सांडपाण्याचे नियोजन नसताना सदनिका काळ नदीकिनारी बांधल्या गेल्या, त्यामुळे सांडपाणी जाण्यास मार्ग नसल्याने पाणी नदीत जात आहे. यावर मार्ग काढण्यास नगरपंचायत माणगावची कसोटी लागणार आहे.माणगावमधील अनेक निवासी संकुल गृहप्रकल्पांचे सांडपाणी थेट काळनदीत सोडले आहे. या काळनदीचे पाणी शहरातील ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे गावांतील नागरिकांना पुरविले जाते. सद्यपरिस्थितीत हे पाणी अत्यंत दूषित झाले असून, साथीचे अनेक रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. याच नदीवर पुढे गोरेगावचे धरण आहे. या सर्व गोष्टींकडे नगरपंचायत पूर्णपणे डोळेझाक करीत आहे.कचरा उचलण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, कचºयावर तांत्रिकदृष्ट्या विघटन करण्यासाठी डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था दत्तनगर येथे लवकरच करण्यात येणार असून त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने घेऊन हा कचराप्रश्न काही दिवसांतच मार्गी लागणार आहे.- योगिता चव्हाण,नगराध्यक्षा, माणगाव नगरपंचायतमाणगाव शहरात झपाट्याने शहरीकरण होत आहे, यामुळे सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता भूमिगत गटारांचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. माणगाव शहरातील अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत, यात मुख्य कचेरी रस्ता, शहरातील मुख्य गटारांचे काँक्र ीटीकरण, अंतर्गत रस्ते झाले असून कालवा रोडचे नूतनीकरण, पाण्याच्या नवीन टाक्या ही मंजूर कामे चालू होणार आहेत, तरी माणगाव शहर विकासकामात कात टाकत चालले आहे.- समीर जाधव,मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपंचायत माणगाव

टॅग्स :Raigadरायगड