शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

‘सागर कवच’ मोहिमेतून सागरी सुरक्षेचा आढावा; ६०० किनारपट्टीवर पोलिसांची करडी नजर

By निखिल म्हात्रे | Updated: November 16, 2023 17:10 IST

सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम.

अलिबाग : सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील सागरी हद्दीत पोलिस, तटरक्षक, नौदल यांच्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ऑपरेशन ‘सागर कवच’ला गुरुवारी सुरुवात झाली. ३६ तासांमध्ये सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तात्पुरत्या पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. यासाठी ७८ पोलिस अधिकारी, ५१८ पोलिस कर्मचारी, तर २०० सागरी सुरक्षा दलाचे सदस्य या बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत.

सागर कवच मोहीम कशासाठी?२६/११ नंतर पोलिस आणि राज्य सरकार सागरी सुरक्षेच्या बाबतीत अधिक जागरूक झाले. रायगड जिल्ह्याला मोठा सागरी किनारा लाभला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला लक्षात घेऊन पोलिसांनी अशा व्यापक सागरी हद्दीचे रक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे. सागरी हद्दीत अनोळखी बोट दिसली तरी किनाऱ्यावर राहणाऱ्यांमध्ये घबराट पसरते. अशा परिस्थितीत मच्छिमारांनीही सागरी सुरक्षेसाठी सज्ज असावे, ही गरज लक्षात घेऊन सागर कवच अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

संशयित व्यक्ती, वाहनांची चौकशी- जिल्ह्यात रायगड पोलिसांनी आता पुन्हा दोन दिवसांचे ‘सागर कवच’ विशेष ऑपरेशन सुरू केले आहे. सागरी हद्दीत पोलिसांकडून गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस ऑपरेशन केले जात आहे. यंत्रणा किती सक्षम आहेत याची तपासणी होत आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यासह आसपासच्या सागरी हद्दीसह तसेच जवळच्या चेक पोस्टमधून संशयित व्यक्ती व वाहनांची चौकशी होत आहे. जाणाऱ्या-येणाऱ्या बोटींवर पोलिसांचे जसे लक्ष आहे, तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ही मोहीम संपणार आहे.

मोहिमेत कोण कोण?

दोन दिवसांच्या या मोहिमेसाठी ५७७ कर्मचारीही स्थानिक पोलिसांना मदतीला दिले होते. त्याव्यतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा अपर पोलिस अधीक्षक, ७ डीवायएसपी, १५ पोलिस निरीक्षक, ५१ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक ५१८ ही मोहीम राबवीत आहेत.

आगामी काळात रायगड जिल्ह्यात होणाऱ्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा १२२ किमी सागरी किनारा सुरक्षितता अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून अतिरेकी कारवाई, दहशतवादी हल्ले रोखण्याकरिता सर्व सागरी विभागांची सतर्कता पडताळून पाहण्याकरिता गुरुवारी (१६ नोव्हेंबर) ते शुक्रवार (१७ नोव्हेंबर)दरम्यान सागरी कवच अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील सुक्ष्म हालचालींवर नजर आहे - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक

टॅग्स :RaigadरायगडalibaugअलिबागPoliceपोलिस