शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘सागर कवच’ मोहिमेतून सागरी सुरक्षेचा आढावा; ६०० किनारपट्टीवर पोलिसांची करडी नजर

By निखिल म्हात्रे | Updated: November 16, 2023 17:10 IST

सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम.

अलिबाग : सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील सागरी हद्दीत पोलिस, तटरक्षक, नौदल यांच्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ऑपरेशन ‘सागर कवच’ला गुरुवारी सुरुवात झाली. ३६ तासांमध्ये सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तात्पुरत्या पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. यासाठी ७८ पोलिस अधिकारी, ५१८ पोलिस कर्मचारी, तर २०० सागरी सुरक्षा दलाचे सदस्य या बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत.

सागर कवच मोहीम कशासाठी?२६/११ नंतर पोलिस आणि राज्य सरकार सागरी सुरक्षेच्या बाबतीत अधिक जागरूक झाले. रायगड जिल्ह्याला मोठा सागरी किनारा लाभला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला लक्षात घेऊन पोलिसांनी अशा व्यापक सागरी हद्दीचे रक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे. सागरी हद्दीत अनोळखी बोट दिसली तरी किनाऱ्यावर राहणाऱ्यांमध्ये घबराट पसरते. अशा परिस्थितीत मच्छिमारांनीही सागरी सुरक्षेसाठी सज्ज असावे, ही गरज लक्षात घेऊन सागर कवच अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

संशयित व्यक्ती, वाहनांची चौकशी- जिल्ह्यात रायगड पोलिसांनी आता पुन्हा दोन दिवसांचे ‘सागर कवच’ विशेष ऑपरेशन सुरू केले आहे. सागरी हद्दीत पोलिसांकडून गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस ऑपरेशन केले जात आहे. यंत्रणा किती सक्षम आहेत याची तपासणी होत आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यासह आसपासच्या सागरी हद्दीसह तसेच जवळच्या चेक पोस्टमधून संशयित व्यक्ती व वाहनांची चौकशी होत आहे. जाणाऱ्या-येणाऱ्या बोटींवर पोलिसांचे जसे लक्ष आहे, तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ही मोहीम संपणार आहे.

मोहिमेत कोण कोण?

दोन दिवसांच्या या मोहिमेसाठी ५७७ कर्मचारीही स्थानिक पोलिसांना मदतीला दिले होते. त्याव्यतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा अपर पोलिस अधीक्षक, ७ डीवायएसपी, १५ पोलिस निरीक्षक, ५१ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक ५१८ ही मोहीम राबवीत आहेत.

आगामी काळात रायगड जिल्ह्यात होणाऱ्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा १२२ किमी सागरी किनारा सुरक्षितता अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून अतिरेकी कारवाई, दहशतवादी हल्ले रोखण्याकरिता सर्व सागरी विभागांची सतर्कता पडताळून पाहण्याकरिता गुरुवारी (१६ नोव्हेंबर) ते शुक्रवार (१७ नोव्हेंबर)दरम्यान सागरी कवच अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील सुक्ष्म हालचालींवर नजर आहे - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक

टॅग्स :RaigadरायगडalibaugअलिबागPoliceपोलिस