शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

पोलिसांनी केला लाखो रुपये किंमतीचा गांजा चरस नष्ट 

By निखिल म्हात्रे | Updated: April 16, 2025 18:29 IST

या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले ८ लाखाचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत तळोजा येथे नष्ट करण्यात आले.

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग - रायगड जिल्हा पोलीस हद्दीतील कर्जत, नागोठणे, नेरळ, पोयनाड, मांडवा सागरी, रेवदंडा, महाड, वडखळ, गोरेगाव, रसायनी, मुरुड, खोपोली अशा १२ पोलीस ठाण्यांमध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत १५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले ८ लाखाचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत तळोजा येथे नष्ट करण्यात आले.

मागील काही दिवसामध्ये पोलिसांनी कारवाईमध्ये जप्त केलेले एकूण ५२ किलो ३९ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, त्यामध्ये ५० किलो ९९२ ग्रॅम गांजा आणि १ किलो ४७ ग्रॅम चरस, ज्याची एकूण किंमत ८ लाख, 48 हजार, 18 रुपये इतकी आहे, तो मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड, तळोजा, नवी मुंबई येथे कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मंगळवारी (१५ एप्रिल) नष्ट करण्यात आला.

ही कार्यवाही एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ५२ अ (२) नुसार करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय तथा पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यासह न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा, कलीना, मुंबईचे सहायक रासायनिक विश्लेषक अ. स. गावकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड क्षेत्र अधिकारी डॉ. गजानन खडकीकर, वैद्यमापन शास्त्र, अलिबाग विभाग रायगड निरीक्षक सुरेश देवकाते तसेच दोन शासकीय पंच उपस्थिती होते.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधातील धोरणबद्ध प्रयत्नांचे उदाहरण असून, यामुळे जिल्ह्यातील समाजातील सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी