शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

मुरुड समुद्रकिनाऱ्याची बंधा-याअभावी दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 01:59 IST

कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

- संजय करडे मुरुड : कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पावसाळ्यात येणारी भरती यामुळे धूपप्रतिबंधक बंधारे फुटून भरतीचे पाणी शेतीमध्ये जात आहेत, तसेच समुद्रकिनाºयाला असणारी दगडाच्या भिंतवरून पाणी गेल्याने समुद्रकिनारच्या सुरूंच्या झाडांची वने नष्ट होऊन समुद्रकिनाºयाचे मोठे नुकसान होत आहे.किनाºयाची धूप, लाटांच्या माºयामुळे दिवसेंदिवस उन्मळून पडणारी उंच सुरूची झाडे, उधाणासोबत वाहून आलेला कचरा, बसण्यासाठी बांधलेल्या सिमेंटच्या बाकांची दुर्दशा. अशी स्थिती आहे मिनी गोवा म्हणून परिचित असलेल्या मुरुडच्या समुद्रकिनाºयाची. या पर्यटनवृद्धी होणाºया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे गांभीर्याने कोणीही लक्ष न दिल्यास भविष्यात हा किनारा उद्ध्वस्त होऊन पर्यटनस्थळाचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.मुरुडमध्ये दरवर्षी दीड लाखापेक्षा अधिक पर्यटक येतात. ही संख्या नजीकच्या वर्षात दुप्पट हाण्याची शक्यता आहे. तथापि रस्ते व किनारा सुशोभीकरण, वाहनतळ आदी मूलभूत सुविधा देण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. मुरुड नगरपरिषदेनेही प्राधान्याने हा विषय लावून धरला असला, तरी शासनाकडून अपेक्षित विकास निधी आणू शकले नाहीत, ही सत्यता नाकारता येत नाही.मुरुड समुद्रकिनाºयावरील जिल्हा परिषद विश्रामगृह ते विश्रामबागेपर्यंतचा दगडी बांध नावापुरताच उरला असून पावसाळी लाटांच्या माºयात सुरूची अनेक झाडे उन्मळून पडली असून ही झाडे संवर्धनासाठी गेल्या १० ते १५ वर्षांपासून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. सामाजिक वनीकरणाच्या १९८० सालच्या योजनेतून सुरूंच्या झाडांची लागवड केली होती. आज घडीला पर्यटकांसाठी सुरूचे बन हे आकर्षण ठरू पाहत असले तरी योग्य पद्धतीने वृक्षांचे संवर्धन झालेले नाही. मेरीटाइम बोर्डानेही धूपप्रतिबंधक बंधाºयाकडे फारसे लक्ष न दिल्याने मुरुडच्या किनाºयाची बिकटावस्था आहे. मुरुडच्या किनाºयावर धूपप्रतिबंधक दगडी बंधारा बांधून उर्वरित सुरूंच्या झाडांचे संवर्धन करणे अंत्यत गरजेचे आहे. तरी शासनाने या पर्यटनस्थळी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.>अलिबाग समुद्रकिनाºयाप्रमाणे दगडी बंधारा बांधण्याची मागणीमुरुड समुद्रकिनारी वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते, अशा वेळी मुरुड शहरातील समुद्रकिनारा हा सुंदर असणे गरजेचे आहे; परंतु यंदाच्या या पावसात मोठी भरती आल्याने समुद्रकिनारी असणारा बंधारा उद्ध्वस्त झाला आहे, तर जिल्हा परिषद गेस्टहाउस मागील दगडी बंधाºयावरून पाणी गेल्याने असंख्य सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे किनारा उघडा-बोडका दिसत असून या ठिकाणी लवकरात लवकर दगडी बंधारा बांधणे खूप आवश्यक झाले आहे. पर्यटक व स्थानिक नागरिकांनी या भागात अलिबाग समुद्रकिनाºयाप्रमाणे दगडी बंधारा बांधावा, अशी मागणी केली आहे.>मेरीटाइम बोर्डाकडे आम्ही पाठपुरावा करीत असून किनारा सुशोभीकरणाचा २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव १६ एप्रिल २०१८ रोजी सादर केला आहे. पर्यटन मंत्रालयातही दोनदा भेट देऊन या विषयासाठी संपर्क केला आहे. तसेच पालकमंत्र्यांनी ही शिफारस केली आहे. निधी प्राप्त होताच किनारा सुशोभीकरण करणार असून पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळावा, असा मुरुड नगरपरिषदेचा प्रयत्न आहे.- पांडुरंग आरेकर, नियोजन व पर्यटन समिती सभापती, नगरपरिषद मुरुड