शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड समुद्रकिनाऱ्याची बंधा-याअभावी दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 01:59 IST

कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

- संजय करडे मुरुड : कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पावसाळ्यात येणारी भरती यामुळे धूपप्रतिबंधक बंधारे फुटून भरतीचे पाणी शेतीमध्ये जात आहेत, तसेच समुद्रकिनाºयाला असणारी दगडाच्या भिंतवरून पाणी गेल्याने समुद्रकिनारच्या सुरूंच्या झाडांची वने नष्ट होऊन समुद्रकिनाºयाचे मोठे नुकसान होत आहे.किनाºयाची धूप, लाटांच्या माºयामुळे दिवसेंदिवस उन्मळून पडणारी उंच सुरूची झाडे, उधाणासोबत वाहून आलेला कचरा, बसण्यासाठी बांधलेल्या सिमेंटच्या बाकांची दुर्दशा. अशी स्थिती आहे मिनी गोवा म्हणून परिचित असलेल्या मुरुडच्या समुद्रकिनाºयाची. या पर्यटनवृद्धी होणाºया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे गांभीर्याने कोणीही लक्ष न दिल्यास भविष्यात हा किनारा उद्ध्वस्त होऊन पर्यटनस्थळाचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.मुरुडमध्ये दरवर्षी दीड लाखापेक्षा अधिक पर्यटक येतात. ही संख्या नजीकच्या वर्षात दुप्पट हाण्याची शक्यता आहे. तथापि रस्ते व किनारा सुशोभीकरण, वाहनतळ आदी मूलभूत सुविधा देण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. मुरुड नगरपरिषदेनेही प्राधान्याने हा विषय लावून धरला असला, तरी शासनाकडून अपेक्षित विकास निधी आणू शकले नाहीत, ही सत्यता नाकारता येत नाही.मुरुड समुद्रकिनाºयावरील जिल्हा परिषद विश्रामगृह ते विश्रामबागेपर्यंतचा दगडी बांध नावापुरताच उरला असून पावसाळी लाटांच्या माºयात सुरूची अनेक झाडे उन्मळून पडली असून ही झाडे संवर्धनासाठी गेल्या १० ते १५ वर्षांपासून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. सामाजिक वनीकरणाच्या १९८० सालच्या योजनेतून सुरूंच्या झाडांची लागवड केली होती. आज घडीला पर्यटकांसाठी सुरूचे बन हे आकर्षण ठरू पाहत असले तरी योग्य पद्धतीने वृक्षांचे संवर्धन झालेले नाही. मेरीटाइम बोर्डानेही धूपप्रतिबंधक बंधाºयाकडे फारसे लक्ष न दिल्याने मुरुडच्या किनाºयाची बिकटावस्था आहे. मुरुडच्या किनाºयावर धूपप्रतिबंधक दगडी बंधारा बांधून उर्वरित सुरूंच्या झाडांचे संवर्धन करणे अंत्यत गरजेचे आहे. तरी शासनाने या पर्यटनस्थळी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.>अलिबाग समुद्रकिनाºयाप्रमाणे दगडी बंधारा बांधण्याची मागणीमुरुड समुद्रकिनारी वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते, अशा वेळी मुरुड शहरातील समुद्रकिनारा हा सुंदर असणे गरजेचे आहे; परंतु यंदाच्या या पावसात मोठी भरती आल्याने समुद्रकिनारी असणारा बंधारा उद्ध्वस्त झाला आहे, तर जिल्हा परिषद गेस्टहाउस मागील दगडी बंधाºयावरून पाणी गेल्याने असंख्य सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे किनारा उघडा-बोडका दिसत असून या ठिकाणी लवकरात लवकर दगडी बंधारा बांधणे खूप आवश्यक झाले आहे. पर्यटक व स्थानिक नागरिकांनी या भागात अलिबाग समुद्रकिनाºयाप्रमाणे दगडी बंधारा बांधावा, अशी मागणी केली आहे.>मेरीटाइम बोर्डाकडे आम्ही पाठपुरावा करीत असून किनारा सुशोभीकरणाचा २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव १६ एप्रिल २०१८ रोजी सादर केला आहे. पर्यटन मंत्रालयातही दोनदा भेट देऊन या विषयासाठी संपर्क केला आहे. तसेच पालकमंत्र्यांनी ही शिफारस केली आहे. निधी प्राप्त होताच किनारा सुशोभीकरण करणार असून पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळावा, असा मुरुड नगरपरिषदेचा प्रयत्न आहे.- पांडुरंग आरेकर, नियोजन व पर्यटन समिती सभापती, नगरपरिषद मुरुड