शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

नेरळमध्ये मजुरांच्या जीवाशी खेळ; बिल्डर, ठेकेदाराचा निष्काळजीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 01:45 IST

नेरळ विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये ममदापूर गावाच्या हद्दीत एका गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे.

- कांता हाबळेनेरळ : शहराजवळ मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, बिल्डर लॉबी केवळ आपल्या तुंबड्या भरण्याच्या नादात कामगार, मजूर यांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र आहे. केवळ बिल्डर, ठेकेदार व लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्या निष्काळजीमुळे व कामगारांच्या सुरक्षेकडे लक्ष न दिल्याने अपघात होऊन कामगारांना जीव गमवावा लागत असल्याची भयानक घटना पुन्हा एकदा नेरळ शहराजवळ घडली आहे. दरम्यान, या घटनेची साधी पोलीस ठाण्यात नोंददेखील केली नसल्याने या प्रकाराबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.नेरळ विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये ममदापूर गावाच्या हद्दीत एका गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. २७ नोव्हेंबर रोजी या गृहप्रकल्पाच्या मागील बाजूस नवीन इमारतीच्या स्लॅबचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना तथा कामगारांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून डोक्यावर हेल्मेट, पायात गमबूट, कामगारांचा विमा, अशा कोणत्याही उपाययोजना न करता, अशा स्थितीत काम सुरू होते. त्यामुळे हे काम सुरू असताना मटेरियलने भरलेली लिफ्ट दुसºया मजल्यापर्यंत गेलेली होती. ती लिफ्ट तिथे बसवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, त्याच वेळी खाली या प्रकल्पावर काम करणाºया मजूर महिला कविता राठोड, लक्ष्मी राठोड, कविता अर्जुन पवार या बसल्या होत्या. लिफ्टचे काम सुरू असताना अचानक लिफ्ट खाली कोसळली आणि या तिन्ही महिलाया अपघातात गंभीर जखमीझाल्या. रुग्णवाहिका बोलावून त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारसुरू असताना कविता पवार या महिलेची प्राणज्योत मावळली. तर इतर दोघींवर अजूनही उपचार सुरू आहेत.नेरळ परिसरात गृहप्रकल्पाचे काम सुरू असताना ठेकेदार, बिल्डर यांच्या निष्काळजीने मजुरांचा अपघात होऊन त्यांना जीव गमवावा लागल्याची ममदापूर येथील ही सलग तिसरी घटना आहे. एवढे होऊनही या गृहप्रकल्पावर घडलेल्या या अपघाताची पोलीस ठाण्यात साधी नोंददेखील केली गेली नसल्याने या प्रकाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, नेरळ व परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, एवढे अपघात घडूनही इमारत कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते.तेव्हा या निष्काळजीचे अजून किती बळी ठरणार? प्रशासन याकडे गंभीरतेने पाहणार का की, मजुरांचे जीव इतके स्वस्त झालेत? हे प्रश्न प्रकर्षाने पुढे येतात.ेनेरळमध्ये ग्रहप्रकल्पांचे काम वेगाने सुरू१मुंबईत आलेला माणूस उपाशी मरत नाही, किंबहुना मुंबई त्याला उपाशी ठेवतच नाही, अशी धारणा संपूर्ण भारत देशात असल्याने मुंबईच्या दिशेने अनेकांचा ओढा कायम राहिलेला आहे. त्यातच नेरळ शहर हे मुंबई उपनगरांना जोडले आहे. त्यामुळे इमारत व्यावसायिकांच्या नजरा इकडे वळल्या आणि या ठिकाणी गृहप्रकल्प मोठ्या झपाट्याने उभे राहू लागले.२गृहप्रकल्प बांधत असताना बिल्डर मजूर ठेकेदाराला ठेका देऊन त्याची माणसे कामाला घेतो. घर सावरण्यासाठी जीवतोड मेहनत करणाºया या मजुरांना दिवसभर राबून अत्यल्प स्वरूपाचा मोबदला मिळतो. मात्र, मजूर ठेकेदार या मजुरांची सुरक्षितता याकडे जरासुद्धा ढुंकून बघत नाही. होतेय ना म्हणून मग बिल्डरसुद्धा मजूर ठेकेदाराला काही बोलत नाही, अशी वास्तव परिस्थिती आहे.नेरळ विकास प्राधिकरणाकडून इमारत बांधकामाला परवानगी दिली जाते. दिलेल्या परवानगीनुसार काम होत नसेल तर प्राधिकरण कारवाई करते. मात्र, ममदापूर येथे ज्याप्रमाणे अपघात घडला आहे. त्यानुसार प्राधिकरणाला कारवाईचा काही अधिकार नाही, त्या अपघाताची सर्वस्वी जबाबदारी ही त्या विकासकाची आहे.- प्रवीण आचरेकर, तांत्रिक अधिकारी,नेरळ विकास प्राधिकरणनेरळ येथे घटना घडल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात कळवायला हवे होते; परंतु रुग्णालयात नेण्यासाठी कदाचित धावपळ केली असेल. मात्र, जखमी मृत झाल्यानंतर तेथून पोलिसांना कळवायला हवे होते. घटना घडून २४ तास उलटले तरी कळविण्यात आले नाही. मात्र, पोलीस मृत व्यक्तीची माहिती घेऊन बिल्डरची चौकशी करतील आणि त्यात दोषी असलेल्यांवर कारवाई करतील.- अविनाश पाटील, सहायक पोलीस निरीक्षकइमारतीच्या बांधकामासाठी जे कामगार काम करतात त्यांना हेल्मेट, हातमोजे, गमबूट, अशा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून साहित्य बांधकाम व्यावसायिकाने उपलब्ध करून दिले पाहिजे. त्याचबरोबर कामगारांचा विमा अत्यावश्यक आहे. तो नसल्यास तो काढून घेणे हेहीगरजेचे आहे.- जब्बार सय्यद, अध्यक्ष,नाका कामगार युनियनबांधकाम मजुरांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वगैरे साहित्य पुरविणे गरजेचे आहे. त्यांचे विमे काढले गेले पाहिजेत. मात्र, आपल्या तुंबड्या भरून मजुरांचे जीव कवडीमोल समजून त्यांच्या जीवाशी खेळणाºया मजूर ठेकेदार व बिल्डर लॉबी यांनी यापुढे मजुरांची सुरक्षितता यांना महत्त्व द्यावे. अन्यथा त्यांचे प्रकल्प सुरक्षित राहणार नाहीत याची तजवीज महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल.- अंकुश शेळके, कर्जत तालुकाध्यक्ष. मनसे

टॅग्स :Raigadरायगड