शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

अवकाळीच्या भीतीमुळे उडव्यांना प्लास्टिकचे आच्छादन

By निखिल म्हात्रे | Updated: November 29, 2023 16:57 IST

मागील आठवड्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामाच्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

अलिबाग - जिल्ह्यातील काही परिसरात गेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्यात पावसापासून कसेबसे वाचविलेले पीक खळ्यावर आणून उडवी केलेल्या पिकांना वाचविण्याची धडपड बळीराजा करत आहे. त्यामुळे बळीराजाने उडव्यांना प्लास्टिक आच्छादने टाकली असून, पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मागील आठवड्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामाच्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पण पावसाच्या हजेरीने शेतकरी धास्तावले. त्यांनी खळ्यावर रचून ठेवलेले भात, नागली पिकांचे उडवे पावसाने भिजून जाऊ नयेत, म्हणून प्लास्टिकचे आवरण टाकून झाकले आहेत.

अलिबाग तालुक्यात खरीप हंगामातील पिकावर येथील आदिवासींना वर्षभर गुजराण करावी लागते. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर मुसळधार पावसाने भात या मुख्य पिकांचे मोठे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक कसेबसे वाचवले आहे.

धान्य, पेंढा काळा पडण्याची भीती

नैसर्गिक आपत्तीतून वाचवलेले पीक खळ्यावर आणून त्याचे उडवे रचले आहेत. पण, मागील शनिवारी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. काही भागात पावसामुळे धान्य तसेच पेंढा काळा पडून कुजून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी तातडीने खळ्यावर रचून ठेवलेल्या उडव्यांवर प्लास्टिकचे आवरण टाकून झाकून ठेवले आहे.

मागील वर्षी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले होते. यावर्षी आपत्तीतून थोडेफार पीक वाचले आहे. पण, पुन्हा अवकाळी पाऊस बरसण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतावर रचून ठेवलेले उडवे प्लास्टिकने झाकून ठेवले आहेत. - संदिप कदम, शेतकरी.

टॅग्स :alibaugअलिबागFarmerशेतकरी