शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

अवकाळीच्या भीतीमुळे उडव्यांना प्लास्टिकचे आच्छादन

By निखिल म्हात्रे | Updated: November 29, 2023 16:57 IST

मागील आठवड्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामाच्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

अलिबाग - जिल्ह्यातील काही परिसरात गेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्यात पावसापासून कसेबसे वाचविलेले पीक खळ्यावर आणून उडवी केलेल्या पिकांना वाचविण्याची धडपड बळीराजा करत आहे. त्यामुळे बळीराजाने उडव्यांना प्लास्टिक आच्छादने टाकली असून, पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मागील आठवड्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामाच्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पण पावसाच्या हजेरीने शेतकरी धास्तावले. त्यांनी खळ्यावर रचून ठेवलेले भात, नागली पिकांचे उडवे पावसाने भिजून जाऊ नयेत, म्हणून प्लास्टिकचे आवरण टाकून झाकले आहेत.

अलिबाग तालुक्यात खरीप हंगामातील पिकावर येथील आदिवासींना वर्षभर गुजराण करावी लागते. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर मुसळधार पावसाने भात या मुख्य पिकांचे मोठे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक कसेबसे वाचवले आहे.

धान्य, पेंढा काळा पडण्याची भीती

नैसर्गिक आपत्तीतून वाचवलेले पीक खळ्यावर आणून त्याचे उडवे रचले आहेत. पण, मागील शनिवारी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. काही भागात पावसामुळे धान्य तसेच पेंढा काळा पडून कुजून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी तातडीने खळ्यावर रचून ठेवलेल्या उडव्यांवर प्लास्टिकचे आवरण टाकून झाकून ठेवले आहे.

मागील वर्षी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले होते. यावर्षी आपत्तीतून थोडेफार पीक वाचले आहे. पण, पुन्हा अवकाळी पाऊस बरसण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतावर रचून ठेवलेले उडवे प्लास्टिकने झाकून ठेवले आहेत. - संदिप कदम, शेतकरी.

टॅग्स :alibaugअलिबागFarmerशेतकरी