शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अवकाळीच्या भीतीमुळे उडव्यांना प्लास्टिकचे आच्छादन

By निखिल म्हात्रे | Updated: November 29, 2023 16:57 IST

मागील आठवड्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामाच्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

अलिबाग - जिल्ह्यातील काही परिसरात गेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्यात पावसापासून कसेबसे वाचविलेले पीक खळ्यावर आणून उडवी केलेल्या पिकांना वाचविण्याची धडपड बळीराजा करत आहे. त्यामुळे बळीराजाने उडव्यांना प्लास्टिक आच्छादने टाकली असून, पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मागील आठवड्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामाच्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पण पावसाच्या हजेरीने शेतकरी धास्तावले. त्यांनी खळ्यावर रचून ठेवलेले भात, नागली पिकांचे उडवे पावसाने भिजून जाऊ नयेत, म्हणून प्लास्टिकचे आवरण टाकून झाकले आहेत.

अलिबाग तालुक्यात खरीप हंगामातील पिकावर येथील आदिवासींना वर्षभर गुजराण करावी लागते. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर मुसळधार पावसाने भात या मुख्य पिकांचे मोठे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक कसेबसे वाचवले आहे.

धान्य, पेंढा काळा पडण्याची भीती

नैसर्गिक आपत्तीतून वाचवलेले पीक खळ्यावर आणून त्याचे उडवे रचले आहेत. पण, मागील शनिवारी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. काही भागात पावसामुळे धान्य तसेच पेंढा काळा पडून कुजून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी तातडीने खळ्यावर रचून ठेवलेल्या उडव्यांवर प्लास्टिकचे आवरण टाकून झाकून ठेवले आहे.

मागील वर्षी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले होते. यावर्षी आपत्तीतून थोडेफार पीक वाचले आहे. पण, पुन्हा अवकाळी पाऊस बरसण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतावर रचून ठेवलेले उडवे प्लास्टिकने झाकून ठेवले आहेत. - संदिप कदम, शेतकरी.

टॅग्स :alibaugअलिबागFarmerशेतकरी