शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

हरित बंदर विकसित करण्याची योजना, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 02:17 IST

विविध योजनांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जेएनपीटीने बंदर क्षेत्रात हरित बंदर विकसित करण्याची योजना आखली आहे.

- मधुकर ठाकूरउरण : देशातील अत्याधुनिक बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन न्यासाने नुकतेच ३१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. विकास आणि प्रगतीच्या जोरावर वर्षाकाठी सुमारे ९५७ कोटी रुपयांचा नफा मिळवून देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणा-या जेएनपीटीने हरित बंदर विकसित करण्यासाठी विविध योजना अमलात आणण्याची तयारी सुरू केली आहे.जेएनपीटी बंदरातील अत्याधुनिक पायाभूत सोयी-सुविधांमुळे कंटेनर हाताळणीच्या आयात-निर्यात क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विकसित कस्टम हाउस, ४० पेक्षा अधिक कंटेनर स्टेशन, देशभरातील सर्वच प्रमुख शहर व बाजारपेठेपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी असलेली रेल्वे सुविधा, रस्ते आणि इतर आवश्यक सुविधांमुळे व्यापारात दिवसागणिक प्रचंड प्रमाणात वाढ होत चालली आहे.देशातील मुख्य बंदरांपैकी ५२ टक्के व्यापार एकट्या जेएनपीटी बंदरातून होत आहे. या प्रगतीच्या जोरावर जेएनपीटी बंदर जागतिक क्रमवारीत २८ व्या स्थानावर पोहोचले आहे. बंदराच्या विकासासाठी विविध योजना अमलात आणल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने समुद्री चॅनेलची रुंदी व खोली वाढविणे, रस्ते रुंदीकरण करणे, कंटेनर टर्मिनलचा विस्तार आदी योजनांचा समावेश आहे. त्याशिवाय २७७ हेक्टर क्षेत्रात आर्थिक विशेष क्षेत्र आणि चौथ्या कंटेनर टर्मिनलचा पहिला टप्पा २०१८ ला पूर्ण झाला असून, दुस-या टप्प्यासाठी सुरुवात होणार आहे. या विविध योजनांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जेएनपीटीने बंदर क्षेत्रात हरित बंदर विकसित करण्याची योजना आखली आहे.जेएनपीटी बंदर सुमारे ३,४०२ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. यापैकी सुमारे १,२०० हेक्टर क्षेत्र कांदळवन व हरित पट्ट्याखाली आहे. १६० हेक्टर क्षेत्र इको पार्कसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. इको पार्कमधील झाडांची लागवड, संवर्धन, निगा करण्याचे काम वनविभागाकडे सोपविण्यात येणार आहे. जेएनपीटीने याआधीच झाडांची लागवड करून बंदर परिसरात हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बंदर स्वच्छ आणि हरित करण्यासाठी शाश्वत पर्यावरण व्यवस्थापनाबाबत जेएनपीटीच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने बंदर आवारात वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक कार्ट खरेदी केली आहे. बंदर आपले कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयास करीत असल्याचे जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.ट्रॅक्टर-ट्रेलरचे आंतर-टर्मिनल हस्तांतर, बंदर इमारतींवर नूतनीकरण, योग्य सौरऊर्जा प्रणाली, छोट्या प्रमाणातील तेलाच्या गळतीचा सामना करण्यासाठी मल्टीपर्पज युटिलिटी लॉन्च, नवीन सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था, ई-आरटीजीसीज, बंदर परिसरात एलईडी दिवे लावणे, ई-कार्ट, आयआयटी मद्रासमार्फत पर्यावरण देखरेख ठेवणे, असे अनेक प्रकल्प हरित बंदर योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आले आहेत, यामुळे देशातील एकमेव हरित बंदर म्हणूनही जेएनपीटी बंदराची गणना होऊ लागली आहे. यासाठी जेएनपीटीला इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.विकासाच्या नावाखाली मुंबई, ठाणे, रायगड आदी जिल्ह्यात कांदळवन, जंगल आणि झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबरच पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे. पशूपक्षी आणि वन्यजीवांना उपयुक्त व उपलब्ध असलेले नैसर्गिक आवासही नष्ट होत चालले आहेत. त्यामुळे दुर्मीळ पशूपक्षीही नजरेस पडेनासे झाले आहेत. याविरोधात सामाजिक, पर्यावरण, निसर्गप्रेमी, प्राणिमित्र संस्था सातत्याने आवाज उठवत आहेत. प्रसंगी न्यायालयातही दाद मागितली जात आहे.हरित बंदरामुळे पक्ष्यांसाठी नैसर्गिक आवासांची संख्या वाढण्यासाठी मदतगार सिद्ध होईल, त्यामुळे या ठिकाणी येणाºया दुर्मीळ स्थलांतरित पक्ष्यांमध्ये वाढ होईल, असा विश्वास निसर्गमित्र,पक्षिप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली जेएनपीटीकडून लागवड केलेली राखीव कांदळवन, जंगल आणि झाडांची कत्तल होणार याची दक्षता घेतल्याची आवश्यकता असल्याची अपेक्षाही निसर्गमित्र, पक्षिप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.पर्यावरणाच्या समतोलासाठी जेएनपीटी कटिबद्ध आहे, देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावत असताना जेएनपीटीला हरित बंदर म्हणून विकसित करण्याची योजना आहे.- संजय सेठी,अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू पत्तन न्यास

टॅग्स :JNPTजेएनपीटीRaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई