शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

हरित बंदर विकसित करण्याची योजना, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 02:17 IST

विविध योजनांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जेएनपीटीने बंदर क्षेत्रात हरित बंदर विकसित करण्याची योजना आखली आहे.

- मधुकर ठाकूरउरण : देशातील अत्याधुनिक बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन न्यासाने नुकतेच ३१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. विकास आणि प्रगतीच्या जोरावर वर्षाकाठी सुमारे ९५७ कोटी रुपयांचा नफा मिळवून देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणा-या जेएनपीटीने हरित बंदर विकसित करण्यासाठी विविध योजना अमलात आणण्याची तयारी सुरू केली आहे.जेएनपीटी बंदरातील अत्याधुनिक पायाभूत सोयी-सुविधांमुळे कंटेनर हाताळणीच्या आयात-निर्यात क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विकसित कस्टम हाउस, ४० पेक्षा अधिक कंटेनर स्टेशन, देशभरातील सर्वच प्रमुख शहर व बाजारपेठेपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी असलेली रेल्वे सुविधा, रस्ते आणि इतर आवश्यक सुविधांमुळे व्यापारात दिवसागणिक प्रचंड प्रमाणात वाढ होत चालली आहे.देशातील मुख्य बंदरांपैकी ५२ टक्के व्यापार एकट्या जेएनपीटी बंदरातून होत आहे. या प्रगतीच्या जोरावर जेएनपीटी बंदर जागतिक क्रमवारीत २८ व्या स्थानावर पोहोचले आहे. बंदराच्या विकासासाठी विविध योजना अमलात आणल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने समुद्री चॅनेलची रुंदी व खोली वाढविणे, रस्ते रुंदीकरण करणे, कंटेनर टर्मिनलचा विस्तार आदी योजनांचा समावेश आहे. त्याशिवाय २७७ हेक्टर क्षेत्रात आर्थिक विशेष क्षेत्र आणि चौथ्या कंटेनर टर्मिनलचा पहिला टप्पा २०१८ ला पूर्ण झाला असून, दुस-या टप्प्यासाठी सुरुवात होणार आहे. या विविध योजनांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जेएनपीटीने बंदर क्षेत्रात हरित बंदर विकसित करण्याची योजना आखली आहे.जेएनपीटी बंदर सुमारे ३,४०२ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. यापैकी सुमारे १,२०० हेक्टर क्षेत्र कांदळवन व हरित पट्ट्याखाली आहे. १६० हेक्टर क्षेत्र इको पार्कसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. इको पार्कमधील झाडांची लागवड, संवर्धन, निगा करण्याचे काम वनविभागाकडे सोपविण्यात येणार आहे. जेएनपीटीने याआधीच झाडांची लागवड करून बंदर परिसरात हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बंदर स्वच्छ आणि हरित करण्यासाठी शाश्वत पर्यावरण व्यवस्थापनाबाबत जेएनपीटीच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने बंदर आवारात वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक कार्ट खरेदी केली आहे. बंदर आपले कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयास करीत असल्याचे जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.ट्रॅक्टर-ट्रेलरचे आंतर-टर्मिनल हस्तांतर, बंदर इमारतींवर नूतनीकरण, योग्य सौरऊर्जा प्रणाली, छोट्या प्रमाणातील तेलाच्या गळतीचा सामना करण्यासाठी मल्टीपर्पज युटिलिटी लॉन्च, नवीन सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था, ई-आरटीजीसीज, बंदर परिसरात एलईडी दिवे लावणे, ई-कार्ट, आयआयटी मद्रासमार्फत पर्यावरण देखरेख ठेवणे, असे अनेक प्रकल्प हरित बंदर योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आले आहेत, यामुळे देशातील एकमेव हरित बंदर म्हणूनही जेएनपीटी बंदराची गणना होऊ लागली आहे. यासाठी जेएनपीटीला इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.विकासाच्या नावाखाली मुंबई, ठाणे, रायगड आदी जिल्ह्यात कांदळवन, जंगल आणि झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबरच पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे. पशूपक्षी आणि वन्यजीवांना उपयुक्त व उपलब्ध असलेले नैसर्गिक आवासही नष्ट होत चालले आहेत. त्यामुळे दुर्मीळ पशूपक्षीही नजरेस पडेनासे झाले आहेत. याविरोधात सामाजिक, पर्यावरण, निसर्गप्रेमी, प्राणिमित्र संस्था सातत्याने आवाज उठवत आहेत. प्रसंगी न्यायालयातही दाद मागितली जात आहे.हरित बंदरामुळे पक्ष्यांसाठी नैसर्गिक आवासांची संख्या वाढण्यासाठी मदतगार सिद्ध होईल, त्यामुळे या ठिकाणी येणाºया दुर्मीळ स्थलांतरित पक्ष्यांमध्ये वाढ होईल, असा विश्वास निसर्गमित्र,पक्षिप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली जेएनपीटीकडून लागवड केलेली राखीव कांदळवन, जंगल आणि झाडांची कत्तल होणार याची दक्षता घेतल्याची आवश्यकता असल्याची अपेक्षाही निसर्गमित्र, पक्षिप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.पर्यावरणाच्या समतोलासाठी जेएनपीटी कटिबद्ध आहे, देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावत असताना जेएनपीटीला हरित बंदर म्हणून विकसित करण्याची योजना आहे.- संजय सेठी,अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू पत्तन न्यास

टॅग्स :JNPTजेएनपीटीRaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई