शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पिटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 00:33 IST

पेणमधील अधिकारी, कर्मचारी बळवली ग्रामपंचायत क्षेत्रातील संबंधित मार्गावरची मोजणी करण्यासाठी आले असता शेतकºयांनी पिटाळून लावले आहे.

पेण : तालुक्यातील २० गावांतील शेतकरी बांधवांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर अलिबाग-विरार कॉरिडोरच्या भूसंपादनच्या जागेवर सीमांकन करण्यासाठी गेले तीन दिवस मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालय पेणमधील अधिकारी, कर्मचारी बळवली ग्रामपंचायत क्षेत्रातील संबंधित मार्गावरची मोजणी करण्यासाठी आले असता शेतकºयांनी पिटाळून लावले आहे. शेतकºयांना विश्वासात न घेता सरकारी अधिकाºयांनी केलेल्या या कृतीमुळे शेतकरी संतापले. शेतकºयांच्या रोषाला सामोरे जाऊन अखेर अधिकारी-कर्मचाºयांना सतत तीन दिवस माघारी परतावे लागत आहे.अलिबाग-विरार कॉरिडोरसाठी पेणमधील २० गावातील शेतकºयांच्या जमिनी जाणार आहेत. यामध्ये रावे, कोपर, जिते, चुनाभट्टी, आंबिवली, बळवली, गोर्विले, तरणखोप, चिंचघर, शितोळे, हमरापूर, अंतोरे, पाटणेश्वर, उंबर्डे, मळेघर, कांदळे, वडखळ, कोळवे या पेणमधील गावांचा समावेश आहे. तर अलिबागमधील कंडविरे, चरी, कोपर, सोगाव, कार्ले, खंडाळा, बागमाळा, वाघोली, तळवडे या नऊ गावांतील शेतकºयांचा समावेश या प्रकल्पात येत आहे. या बहु-उद्देशीय प्रकल्पसाठी पेण प्रांत अधिकारी कार्यालयात गेल्या वर्षी जनसुनावणी झाली होती. त्या वेळी बळवली विभागातील शेतकरी बांधवांनी यास आक्षेप घेतला होता. तर काही बाजूला असलेल्या गावातील शेतकरी जमिनीला दर किती देण्यात येईल याबाबत विचारणा करीत होते. यानंतर प्रांत अधिकारी कार्यालयात याबाबत शेतकºयांच्या बैठकादेखील पार पडल्या, त्यानंतर सारे काही ठीक होईल, असे मधाचे बोट शेतकºयांना दाखविण्यात आले होते.एकरी एक कोटी ते दीड कोटीचा जमिनीला भाव मिळणार असे शेतकºयांना वाटत असताना त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. आता थेट जमीन सर्वेक्षणाची व सीमांकनाची प्राथमिक टप्प्यातील प्रकिया एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी सुरू केली आहे. हे सोपस्कार पार पाडताना मात्र प्रकल्पबाधित शेतकºयांना कोणत्याही प्रकारची अधिकृत नोटीस बजावण्यात आलेली नाही. जमिनीचा मोबदला काय देणार, प्रकल्पबाधितांना सरकारी नोकरीत घेतले जाणार काय? याबाबत शेतकºयांना हमी नाही, यांची कोणतीही माहिती प्रकल्प विकासक संस्थेने दिली नाही. या गोष्टीचा संताप अनावर होऊन अखेर एमएमआरडीए आणि भूमी अभिलेखच्या अधिकाºयांना शेतकºयांनी खडे बोल सुनावत आपला संताप व्यक्त केला.शेतकºयांच्या आक्रमक आंदोलनाप्रसंगी राजिप कृषी सभापती प्रमोद पाटील, बळवली ग्रामपंचायत सरपंच संजय डंगर, शिवसेनेचे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य जगदिश ठाकूर, शिवसेना जिते विभागप्रमुख राजू पाटील, विभागातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी गेले तीन दिवस या सीमांकनासाठी आलेल्या अधिकारी-कर्मचाºयांना काम करू दिले नाही. याबाबत शेतकरी बांधवांच्या विभागातील बैठकांना प्रारंभ झाला आहे. मोठे जनआंदोलन उभे राहून निवडणूक धामधुमीत हा मुद्दा गाजणार असे दिसून येत आहे.।लेखी स्वरूपात माहिती देण्याची मागणीबळवली,रावे, कोपर, आंबिवली, जिते, चुनाभट्टी, गोर्विले या विभागातील तब्बल ६०० ते ६५० शेतकºयांनी या सर्वेक्षणाला तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पासाठी होणाºया भूसंपादनाची पूर्ण माहिती द्यावी. प्रकल्पात शेतकºयांना उद्भवणाºया पुढील समस्या, जमिनी, बाधित होणारी घरे त्या कुटुंबातील पुनर्वसनाची माहिती, लेखी स्वरूपात मिळाल्याशिवाय सीमांकन होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका या वेळी शेतकºयांनी घेऊन अधिकारी, कर्मचाºयांना परत पाठविले आहे. याशिवाय रायगड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित शेतकºयांची जनसुनावणी घेऊन प्रकल्पाबाबतचे मत जाणून घ्यावे. लेखी स्वरूपात जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत मोजणी व सीमांकन होऊ देणार नाही, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली.।सरकारची शेतकरी बांधवांना आधार देण्याऐवजी शेतकरी देशोधडीला कसा लागेल अशाप्रकारची ही कृती आहे. पेणचा शेतकरी लढवय्या व न घाबरता लढाई सुरू करतो. एसईझेड प्रकल्पाचे काय झाले हे सरकारी अधिकारी, कर्मचाºयांनी लक्षात घेऊन या प्रकल्पाबाबत काय होणार हे लक्षात ठेवणे सगळ्यांच्याच दृष्टीने हितावह ठरेल.- संजय डंगर,सरपंच, बळवली ग्रामपंचायत