शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नेरळ ग्रामपंचायतीने उभारला पादचाऱ्यांसाठी साकव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:52 IST

ग्रामपंचायतीने मातीचा भराव टाकून रस्ता केला होता. हा टाकलेला मातीचा भराव पावसाळ्यात वाहून जाणार असल्याने याठिकाणी ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात पादचा-यांसाठी लोखंडी साकव उभारला आहे.

- कांता हाबळे नेरळ : नेरळ शहरातील मोहाचीवाडी येथील जीर्ण झालेला साकव तीन महिन्यांपूर्वी कोसळला होता. तेव्हापासून या ठिकाणी नव्याने साकव उभारण्यात आला नव्हता. या ठिकाणी ग्रामपंचायतीने मातीचा भराव टाकून रस्ता केला होता. हा टाकलेला मातीचा भराव पावसाळ्यात वाहून जाणार असल्याने याठिकाणी ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात पादचा-यांसाठी लोखंडी साकव उभारला आहे. त्यामुळे पावसाळ्यात परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. परंतु हा छोटा साकव असल्याने या साकवावरून कोणतेही वाहन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.नेरळ शहरात येण्यासाठी मोहाचीवाडी आणि परिसरातील आदिवासी ग्रामस्थांसाठी काही वर्षांपूर्वी मोहाचीवाडी साकव उभारण्यात आला होता. तो साकव जीर्ण झाला असल्याने तीन महिन्यांपूर्वी खडीने भरलेला ट्रक जात असताना तो कोसळला व त्यात ट्रक अडकला होता. साकव तुटल्यानंतर अनेक नेत्यांनी या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली, तर काही नेत्यांनी या साकवाला निधी मंजूर करून दिला. परंतु दोन महिने उलटूनही याठिकाणी नव्याने साकव उभारण्यात आला नव्हता. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने मातीचा भराव टाकून तात्पुरता ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला होता.या पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने या ठिकाणी नव्याने पूल उभारण्यासाठी काही अडचणी येत असल्याचे समजते. म्हणून नेरळ ग्रामपंचायतीने पावसाळ्यात मोहाचीवाडी व परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी पादचाºयांसाठी अंदाजे २ लाख रुपये खर्च करून छोटा लोखंडी साकव उभारला आहे. या लोखंडी साकवामुळे पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय दूर होणार असली तरी या साकवावरून वाहन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.>तुटलेल्या साकवासाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या कामाच्या वर्कआॅर्डरचे काम बाकी आहे. त्यामुळे हे बांधकाम होण्यास वेळ लागणार असल्याने तात्पुरता पावसाळ्यात ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही म्हणून अंदाजे २ लाख रुपये खर्च करून हा लोखंडी साकव उभारला आहे, परंतु या साकवावरून वाहने नेण्यास बंदी आहे.- मंगेश म्हसकर, सदस्य, नेरळ ग्रामपंचायत