शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

शेकापचा तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:06 IST

एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंडलिकेच्या तीरावरील २६ गावांसाठी नळपाणी योजना केली आहे; परंतु या योजनेवरून अनेकांनी अनधिकृत नळ

रोहा : एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंडलिकेच्या तीरावरील २६ गावांसाठी नळपाणी योजना केली आहे; परंतु या योजनेवरून अनेकांनी अनधिकृत नळ जोडण्या घेतल्याने भातसई विभागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या विभागातील महिलांनी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आ. पंडित पाटील व आ. धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.कुंडलिकेमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी खोल समुद्रात नेऊन सोडावे अशी आग्रही मागणी आ.पंडित पाटील यांनी केली, तर कंत्राटी कामगार पद्धत ही सामान्य कामगारांची पिळवणूक करणारी असल्याने ती बंद करण्यासाठी कालबद्ध कार्यक्र म आखण्यात यावा. स्थानिक तरुणांना त्यांच्या योग्यतेनुसार कायमस्वरूपी नोकºया देण्यात याव्यात आणि कोलाड विभागातील नादुरुस्त कालव्यांची कामे पूर्ण करून शेतकºयांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. धैर्यशील पाटील यांनी केली. धामणसई विभागात एमआयडीसीमार्फत स्वतंत्र पाणी योजना राबविण्यात यावी, असेदेखील सांगण्यात आले. हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या गेटवर अडविण्यात आला. भविष्यात तहसील कार्यालयाच्या गेटवर मोर्चा अडविण्यात आल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारादेखील आ. धैर्यशील पाटील यांनी दिला आहे.या वेळी मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत २६ गाव नळपाणी योजनेवरील बेकायदा नळजोडण्या १५ दिवसांत तोडण्यात येतील. तसेच औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी खोल समुद्रात नेऊन सोडण्यासाठी मंत्री महोदयांबरोबर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे कंत्राटी कामगारांचा प्रश्न, स्थानिक तरुणांना नोकºया, सीएसआर निधीचे वाटप, मच्छीमारांची नुकसानभरपाई, एमआयडीसीलगत असणाºया गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न याबाबत लवकरच आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन रोहा इंडस्ट्रिज असोसिएशनकडून देण्यात आले आहे. शेतकºयांना भातविक्रीचे पैसे तातडीने मिळावेत, यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार सुरेश काशिद, तसेच सहायक पोलीस निरीक्षक येडे-पाटील यांनी दिले आहेत.या मोर्चात रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, पंचायत समिती सदस्या गुलाब वाघमारे, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, तालुका चिटणीस राजेश सानप, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी, अनंता वाघ, जिल्हा कामगार आघाडी सदस्य सुहास खरीवले, तालुका महिला आघाडी चिटणीस कांचन माळी तसेच तालुक्यातील सर्व विभागीय चिटणीस, शहर चिटणीस, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.मोर्चातील मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात यापेक्षा मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेकापच्या आमदारांनी प्रशासनाला दिला.