शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

शेकापचा तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:06 IST

एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंडलिकेच्या तीरावरील २६ गावांसाठी नळपाणी योजना केली आहे; परंतु या योजनेवरून अनेकांनी अनधिकृत नळ

रोहा : एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंडलिकेच्या तीरावरील २६ गावांसाठी नळपाणी योजना केली आहे; परंतु या योजनेवरून अनेकांनी अनधिकृत नळ जोडण्या घेतल्याने भातसई विभागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या विभागातील महिलांनी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आ. पंडित पाटील व आ. धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.कुंडलिकेमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी खोल समुद्रात नेऊन सोडावे अशी आग्रही मागणी आ.पंडित पाटील यांनी केली, तर कंत्राटी कामगार पद्धत ही सामान्य कामगारांची पिळवणूक करणारी असल्याने ती बंद करण्यासाठी कालबद्ध कार्यक्र म आखण्यात यावा. स्थानिक तरुणांना त्यांच्या योग्यतेनुसार कायमस्वरूपी नोकºया देण्यात याव्यात आणि कोलाड विभागातील नादुरुस्त कालव्यांची कामे पूर्ण करून शेतकºयांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. धैर्यशील पाटील यांनी केली. धामणसई विभागात एमआयडीसीमार्फत स्वतंत्र पाणी योजना राबविण्यात यावी, असेदेखील सांगण्यात आले. हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या गेटवर अडविण्यात आला. भविष्यात तहसील कार्यालयाच्या गेटवर मोर्चा अडविण्यात आल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारादेखील आ. धैर्यशील पाटील यांनी दिला आहे.या वेळी मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत २६ गाव नळपाणी योजनेवरील बेकायदा नळजोडण्या १५ दिवसांत तोडण्यात येतील. तसेच औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी खोल समुद्रात नेऊन सोडण्यासाठी मंत्री महोदयांबरोबर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे कंत्राटी कामगारांचा प्रश्न, स्थानिक तरुणांना नोकºया, सीएसआर निधीचे वाटप, मच्छीमारांची नुकसानभरपाई, एमआयडीसीलगत असणाºया गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न याबाबत लवकरच आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन रोहा इंडस्ट्रिज असोसिएशनकडून देण्यात आले आहे. शेतकºयांना भातविक्रीचे पैसे तातडीने मिळावेत, यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार सुरेश काशिद, तसेच सहायक पोलीस निरीक्षक येडे-पाटील यांनी दिले आहेत.या मोर्चात रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, पंचायत समिती सदस्या गुलाब वाघमारे, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, तालुका चिटणीस राजेश सानप, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी, अनंता वाघ, जिल्हा कामगार आघाडी सदस्य सुहास खरीवले, तालुका महिला आघाडी चिटणीस कांचन माळी तसेच तालुक्यातील सर्व विभागीय चिटणीस, शहर चिटणीस, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.मोर्चातील मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात यापेक्षा मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेकापच्या आमदारांनी प्रशासनाला दिला.