शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

शेकापचा तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:06 IST

एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंडलिकेच्या तीरावरील २६ गावांसाठी नळपाणी योजना केली आहे; परंतु या योजनेवरून अनेकांनी अनधिकृत नळ

रोहा : एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंडलिकेच्या तीरावरील २६ गावांसाठी नळपाणी योजना केली आहे; परंतु या योजनेवरून अनेकांनी अनधिकृत नळ जोडण्या घेतल्याने भातसई विभागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या विभागातील महिलांनी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आ. पंडित पाटील व आ. धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.कुंडलिकेमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी खोल समुद्रात नेऊन सोडावे अशी आग्रही मागणी आ.पंडित पाटील यांनी केली, तर कंत्राटी कामगार पद्धत ही सामान्य कामगारांची पिळवणूक करणारी असल्याने ती बंद करण्यासाठी कालबद्ध कार्यक्र म आखण्यात यावा. स्थानिक तरुणांना त्यांच्या योग्यतेनुसार कायमस्वरूपी नोकºया देण्यात याव्यात आणि कोलाड विभागातील नादुरुस्त कालव्यांची कामे पूर्ण करून शेतकºयांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. धैर्यशील पाटील यांनी केली. धामणसई विभागात एमआयडीसीमार्फत स्वतंत्र पाणी योजना राबविण्यात यावी, असेदेखील सांगण्यात आले. हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या गेटवर अडविण्यात आला. भविष्यात तहसील कार्यालयाच्या गेटवर मोर्चा अडविण्यात आल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारादेखील आ. धैर्यशील पाटील यांनी दिला आहे.या वेळी मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत २६ गाव नळपाणी योजनेवरील बेकायदा नळजोडण्या १५ दिवसांत तोडण्यात येतील. तसेच औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी खोल समुद्रात नेऊन सोडण्यासाठी मंत्री महोदयांबरोबर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे कंत्राटी कामगारांचा प्रश्न, स्थानिक तरुणांना नोकºया, सीएसआर निधीचे वाटप, मच्छीमारांची नुकसानभरपाई, एमआयडीसीलगत असणाºया गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न याबाबत लवकरच आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन रोहा इंडस्ट्रिज असोसिएशनकडून देण्यात आले आहे. शेतकºयांना भातविक्रीचे पैसे तातडीने मिळावेत, यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार सुरेश काशिद, तसेच सहायक पोलीस निरीक्षक येडे-पाटील यांनी दिले आहेत.या मोर्चात रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, पंचायत समिती सदस्या गुलाब वाघमारे, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, तालुका चिटणीस राजेश सानप, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी, अनंता वाघ, जिल्हा कामगार आघाडी सदस्य सुहास खरीवले, तालुका महिला आघाडी चिटणीस कांचन माळी तसेच तालुक्यातील सर्व विभागीय चिटणीस, शहर चिटणीस, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.मोर्चातील मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात यापेक्षा मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेकापच्या आमदारांनी प्रशासनाला दिला.