शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आधी शुल्क भरा, त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा; सीमा शुल्क विभागाची ताठर भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2023 19:56 IST

शुल्क परवडत नसल्याने स्थानिक विभागातील अनेक कार्गो माघारी धाडण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय 

- मधुकर ठाकूर

उरण : आधी शुल्क भरा त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा अशी ताठर भूमिका सीमाशुल्क विभागाने घेतल्याने कांद्याचे सुमारे ६० ते ७० स्थानिक कंटेनर माघारी गेले आहेत .तर आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ४० टक्के शुल्क भरल्यानंतर कांद्याचे ४० कंटेनर कार्गो मंगळवारी (२२) निर्यातीच्या तयारीत असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली.

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात शुल्क थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार आदी सर्वजण हवालदिल झाले आहेत.शनिवारी केंद्र सरकारच्या निर्णयाआधीच जेएनपीए बंदरातच सुमारे कांद्याचे ६०- ७० कंटेनर निर्यातीसाठी तयार होते.तर बंदराबाहेर परिसरातील विविध कंटेनर यार्डमध्ये राज्यातील विविध भागातून निर्यातीसाठी आलेले कांद्याचे सुमारे १२५ -१५० असे एकूण सुमारे २०० कार्गो कंटेनर  शनिवारपासून अडकून पडले आहेत.

कांदा नाशिवंत माल असल्याने मलेशिया, श्रीलंका, दुबई आदी देशात पाठविण्यात येणारा सुमारे चार हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत आहे. यामुळे व्यापारी, शेतकरी,निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींहून अधिक आर्थिक नुकसान होणार आहे. कांदा सडून जाण्याऐवजी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी ४० टक्के शुल्क भरुन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सीमाशुल्क विभागाने होल्ड करून ठेवलेले कांद्याचे २०० पैकी सुमारे ४० कार्गो कंटेनर मंगळवारी (२२) निर्यात होणार असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा शनिवारी (१९)  अचानक निर्णय घेतल्याने जेएनपीए बंदरात आणि बंदरा बाहेरील विविध कंटेनर यार्ड मध्ये सुमारे २०० कंटेनर कस्टम विभागाने होल्ड केले आहेत.कांदा सडून होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी ४० टक्के शुल्क भरुन कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.मात्र सीमा शुल्क विभागाची इंटरनेट सेवाच मंदावल्याने शुल्क भरल्यानंतरही कांदा निर्यात करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर ४० टक्के शुल्क परवडत नसल्याने आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निर्यातीसाठी स्थानिक विभागातुन आलेले कांद्याचे सुमारे ६० ते ७० कंटेनर कार्गो व्यापाऱ्यांनी माघारी धाडले असल्याची माहिती  निर्यातदार आणि बच्चूभाई ॲण्ड कंपनीचे मालक इरफान मेनन यांनी दिली.तर केंद्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात असल्याचे न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :onionकांदा