शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आधी शुल्क भरा, त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा; सीमा शुल्क विभागाची ताठर भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2023 19:56 IST

शुल्क परवडत नसल्याने स्थानिक विभागातील अनेक कार्गो माघारी धाडण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय 

- मधुकर ठाकूर

उरण : आधी शुल्क भरा त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा अशी ताठर भूमिका सीमाशुल्क विभागाने घेतल्याने कांद्याचे सुमारे ६० ते ७० स्थानिक कंटेनर माघारी गेले आहेत .तर आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ४० टक्के शुल्क भरल्यानंतर कांद्याचे ४० कंटेनर कार्गो मंगळवारी (२२) निर्यातीच्या तयारीत असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली.

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात शुल्क थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार आदी सर्वजण हवालदिल झाले आहेत.शनिवारी केंद्र सरकारच्या निर्णयाआधीच जेएनपीए बंदरातच सुमारे कांद्याचे ६०- ७० कंटेनर निर्यातीसाठी तयार होते.तर बंदराबाहेर परिसरातील विविध कंटेनर यार्डमध्ये राज्यातील विविध भागातून निर्यातीसाठी आलेले कांद्याचे सुमारे १२५ -१५० असे एकूण सुमारे २०० कार्गो कंटेनर  शनिवारपासून अडकून पडले आहेत.

कांदा नाशिवंत माल असल्याने मलेशिया, श्रीलंका, दुबई आदी देशात पाठविण्यात येणारा सुमारे चार हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत आहे. यामुळे व्यापारी, शेतकरी,निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींहून अधिक आर्थिक नुकसान होणार आहे. कांदा सडून जाण्याऐवजी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी ४० टक्के शुल्क भरुन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सीमाशुल्क विभागाने होल्ड करून ठेवलेले कांद्याचे २०० पैकी सुमारे ४० कार्गो कंटेनर मंगळवारी (२२) निर्यात होणार असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा शनिवारी (१९)  अचानक निर्णय घेतल्याने जेएनपीए बंदरात आणि बंदरा बाहेरील विविध कंटेनर यार्ड मध्ये सुमारे २०० कंटेनर कस्टम विभागाने होल्ड केले आहेत.कांदा सडून होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी ४० टक्के शुल्क भरुन कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.मात्र सीमा शुल्क विभागाची इंटरनेट सेवाच मंदावल्याने शुल्क भरल्यानंतरही कांदा निर्यात करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर ४० टक्के शुल्क परवडत नसल्याने आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निर्यातीसाठी स्थानिक विभागातुन आलेले कांद्याचे सुमारे ६० ते ७० कंटेनर कार्गो व्यापाऱ्यांनी माघारी धाडले असल्याची माहिती  निर्यातदार आणि बच्चूभाई ॲण्ड कंपनीचे मालक इरफान मेनन यांनी दिली.तर केंद्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात असल्याचे न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :onionकांदा