शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आधी शुल्क भरा, त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा; सीमा शुल्क विभागाची ताठर भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2023 19:56 IST

शुल्क परवडत नसल्याने स्थानिक विभागातील अनेक कार्गो माघारी धाडण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय 

- मधुकर ठाकूर

उरण : आधी शुल्क भरा त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा अशी ताठर भूमिका सीमाशुल्क विभागाने घेतल्याने कांद्याचे सुमारे ६० ते ७० स्थानिक कंटेनर माघारी गेले आहेत .तर आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ४० टक्के शुल्क भरल्यानंतर कांद्याचे ४० कंटेनर कार्गो मंगळवारी (२२) निर्यातीच्या तयारीत असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली.

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात शुल्क थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार आदी सर्वजण हवालदिल झाले आहेत.शनिवारी केंद्र सरकारच्या निर्णयाआधीच जेएनपीए बंदरातच सुमारे कांद्याचे ६०- ७० कंटेनर निर्यातीसाठी तयार होते.तर बंदराबाहेर परिसरातील विविध कंटेनर यार्डमध्ये राज्यातील विविध भागातून निर्यातीसाठी आलेले कांद्याचे सुमारे १२५ -१५० असे एकूण सुमारे २०० कार्गो कंटेनर  शनिवारपासून अडकून पडले आहेत.

कांदा नाशिवंत माल असल्याने मलेशिया, श्रीलंका, दुबई आदी देशात पाठविण्यात येणारा सुमारे चार हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत आहे. यामुळे व्यापारी, शेतकरी,निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींहून अधिक आर्थिक नुकसान होणार आहे. कांदा सडून जाण्याऐवजी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी ४० टक्के शुल्क भरुन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सीमाशुल्क विभागाने होल्ड करून ठेवलेले कांद्याचे २०० पैकी सुमारे ४० कार्गो कंटेनर मंगळवारी (२२) निर्यात होणार असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा शनिवारी (१९)  अचानक निर्णय घेतल्याने जेएनपीए बंदरात आणि बंदरा बाहेरील विविध कंटेनर यार्ड मध्ये सुमारे २०० कंटेनर कस्टम विभागाने होल्ड केले आहेत.कांदा सडून होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी ४० टक्के शुल्क भरुन कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.मात्र सीमा शुल्क विभागाची इंटरनेट सेवाच मंदावल्याने शुल्क भरल्यानंतरही कांदा निर्यात करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर ४० टक्के शुल्क परवडत नसल्याने आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निर्यातीसाठी स्थानिक विभागातुन आलेले कांद्याचे सुमारे ६० ते ७० कंटेनर कार्गो व्यापाऱ्यांनी माघारी धाडले असल्याची माहिती  निर्यातदार आणि बच्चूभाई ॲण्ड कंपनीचे मालक इरफान मेनन यांनी दिली.तर केंद्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात असल्याचे न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :onionकांदा