शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बाहेर कट्ट्यावरच झोपले रुग्ण; सर्वत्र उसळली संतापाची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 23:22 IST

आविष्कार देसाई रायगड : कोरोना संसर्गाचा अहवाल तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठी अलिबाग येथील सरकारी रुग्णालयात कोविड १९ प्रयोगशाळा सुरू ...

आविष्कार देसाईरायगड : कोरोना संसर्गाचा अहवाल तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठी अलिबाग येथील सरकारी रुग्णालयात कोविड १९ प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. कोविड रुग्णालयात स्वॅब टेस्ट करणाऱ्यांसाठी येणाऱ्यांची चांगलीच गैरसोय होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहापूरमधील काही रुग्णांची कोविड टेस्ट करण्यासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून आणले होते. संबंधित कर्मचाºयांनी त्यांना कोविड रुग्णालयाच्या कट्ट्यावरतीच सोडले. त्यानंतर, त्यातील दोन रुग्णांना त्रास होऊ लागल्याने, त्यांनी त्या कट्ट्यावरच अंग टाकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आरोग्य व्यवस्थेच्या अशा भोंगळ कारभारामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. ही घटना सोमवारी घडली आहे. कोरोना संसर्गाचा आकडा सातत्याने वाढत आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तब्बल ३१ हजारांच्या वर झाली आहे. आतापर्यंत ९०३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसाला ५०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

सुरुवातीला कोविड १९ चाचणीसाठी स्वॅब टेस्ट केल्यावर त्याची तपासणी मुंबईमधील प्रयोगशाळेत केली जायची. अहवाल येण्यासाठी चार दिवसांचा कालावधी जात होता. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या त्यांची कोविड तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातच कोविड प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतला. त्यानुसार, आता अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयातील परिसरामध्ये कोविड १९ प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे कोविड १९ चाचणी करण्यासाठी जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये रुग्णांच्या रांगा लागत आहेत. सोमवारी रुग्णांनी कोविड १९ चाचणी करण्यासाठी रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती.

स्वॅब घेण्यासाठी एकच आरोग्य कर्मचारी असल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागत होते. अलिबाग-शहापूर येथील काही रुग्णांना रुग्णवाहिकेतून आणण्यात आले होते. स्वॅबसाठी गर्दी असल्याने त्या रुग्णांना जिल्हा कोविड रुग्णालयाच्या कट्ट्यावर ठेवण्यात आले. त्यानंतर, ते कर्मचारी निघून गेले. संबंधित दोन रुग्णांना त्रास होत असल्याने, त्यांनी त्या कट्ट्यावरच आपले अंग टाकले. ही घटना अतिशय संतापजनक असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताशेरे ओढण्यात येत आहेत. काही रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनी याचा जाब संबंधित आरोग्य कर्मचाºयांना विचारला. मात्र, अपुरा कर्मचारी वर्ग असल्याचे सांगण्यात आले.

रुग्णवाहिकेतील कर्मचारी रुग्णांना वाºयावर कसे सोडून जाऊ शकतात. त्यांच्यामध्ये माणुसकी शिल्लक आहे की नाही? आरोग्य विभागाने याची तातडीने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. रुग्णांच्या आरोग्याची होणारी हेळसांड तातडीने थांबली पाहिजे. जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारली. मात्र, पुरेसा कर्मचारी उपलब्ध नसेल, तर त्याचा उपयोग काय?- संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते

संबंधिताना याबाबत विचारणा करण्यात आली आहे. जिल्हा प्रयोगशाळेतील नोडल अधिकारी आणि तीन लॅब टेक्निशियन्स यांचीही कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अपुºया कर्मचाºयांच्या बळावर काम करावे लागत आहे. लवकरच यात सुधारणा करण्यात येईल.- डॉ.सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :RaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस