शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 03:27 IST

मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण वाहतूकदार व प्रवाशांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे. खड्डे व रुंदीकरणामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे या मार्गावर वारंवार वाहतूककोंडी होत असून अपघातांमध्येही वाढ झाली आहे.

- वैभव गायकरपनवेल : मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण वाहतूकदार व प्रवाशांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे. खड्डे व रुंदीकरणामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे या मार्गावर वारंवार वाहतूककोंडी होत असून अपघातांमध्येही वाढ झाली आहे.संपूर्ण महामार्गाच्या रुंदीकरणासाठी सुमारे ११ हजार कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीला पळस्पे येथून जाताना सर्वप्रथम खड्ड्यांचा सामना करावा लागतो. पळस्पे फाट्यावर सध्याच्या घडीला खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. येथून पुढे जाताना ठिकठिकाणी खड्ड्यातून मार्गक्र मण करावे लागते. पळस्पे गावापुढे तसेच पुढे शिरढोण, कर्नाळा खिंड परिसर तसेच पुढे कल्हे गावाजवळून पुढे पेणच्या दिशेने जाताना ठिकठिकाणी खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली असली तरी याठिकाणी नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणात पसरले आहे. याचा सर्वात जास्त त्रास हा दुचाकी चालकांना होत आहे. खड्डे व रु ंदीकरणाच्या कामामुळे वारंवार वाहतूककोंडी होत असून या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी अत्यावश्यक कामे केली नाही तर गणेशभक्तांना गावी पोहचणे अशक्य होणार आहे.महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या चार राज्यांमधून जाणाºया मुंबई-गोवा महामार्गाच्या रु ंदीकरणाचे काम शासनाने सुरू केले आहे. १२६९ किलोमीटर एवढे अंतर असून महाराष्ट्रात ४८२ किलोमीटरचा समावेश आहे. राज्यातून जाणाºया महामार्गाचे रु ंदीकरण करण्यासाठी तब्बल ११ हजार ७४७ कोटी रु पये खर्च केले जात आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात पनवेल ते इंदापूरपर्यंत ८४ किलोमीटरच्या रोडचे रु ंदीकरण प्रत्यक्ष सुरू झाले आहे. रु ंदीकरणासाठी कर्नाळा अभयारण्यातील जवळपास १.६५ हेक्टर वनजमिनीवरील वृक्षही तोडण्यात आले आहेत. कोकणच्या विकासाचा राजमार्ग म्हणून या रोडचे वर्णन केले जात आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये सद्यस्थितीमध्ये हा रस्ता कोकणवासीयांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. पनवेल ते पेणपर्यंतची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. रुंदीकरणासाठी जागोजागी खोदकाम केले आहे. खड्ड्यांमुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. अपघात होण्याची सूचना देण्यासाठी कंत्राटदार कंपनीने काही ठिकाणी पट्ट्या, बोर्ड लावलेले असले तरी अनेक ठिकाणी हा महामार्ग धोकादायक आहे.सर्व्हिस रोडवर अवजड वाहनांचे पार्किंगमहामार्गाला लागून असलेल्या गावांनाही याचा मोठा फटका बसला आहे. चिंचवण, पळस्पे, कल्हे व इतर अनेक गावांमधील नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. या गावाजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर अवजड वाहनांनी अनधिकृतपणे कब्जा केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीमध्ये सकाळी व सायंकाळी वाहनांची संख्या वाढल्यानंतर वाहतूककोंडी होत आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यापूर्वी खड्डे दुरु स्त केले नाहीत व अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे केली नाही तर गणेशभक्तांना मोठा फटका बसणार आहे.प्रस्तावित सर्व्हिस रोडपळस्पे, चिंचवन, तारा, जिते, पेणमध्ये ३, उचिवडे, वडखळ, गडब, कासू, पंडापूर, पटनी, निगडे, कोलेती, नागोठणे, खांब, कोलाड, तळवलीवाहनांसाठी भुयारी मार्गचिंचवन, खोपोली जंक्शन, पेण, वडखळ बायपास, नागोठणे, कोलाडपादचारी भुयारी मार्गपळस्पे, तारा, जिते, पेण, उचिडे, गडब, कासू, निगाडे, कोलेती, नागोठणे, खांब, तळवली, रातवडमहत्त्वाचे यू टर्नतुरमळे, चिंचवन, कर्नाळा किल्ला, कल्हे, आपटा फाटा, आंबिवली, वीरवाडी, खोपोली, वाशी, वडखळ, इस्पात फॅक्टरी, जुई, अक्कादेवी मंदिर, आमटे, खटाळे, निदी, नागोठणे, पाली, अलिबाग, सुकेली, पुगाव, कोलाड, घोटवले, वावेदीवाडी, गांगेवाडी, नागरोलीमहामार्गाचे स्वरूपमुंबई-गोवा हा देशातील महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. अरबी समुद्राच्या किनारपट्टीला १२६९ किलोमीटर हा महामार्ग असून, मुंबईला केरळमधील कोची शहराशी जोडत आहे. महाराष्ट्रात ४८२, गोवा १३९, कर्नाटक २८०, केरळमध्ये ३६८ किलोमीटर अंतर आहे. पनवेल, चिपळूण, महाड, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी ही या महामार्गावरील कोकणातील महत्त्वाची शहरे आहेत.मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यास आम्ही यापूर्वीच सुरु वात केली आहे. गणेशोत्सवापूर्वी या महामार्गावरील सर्व खड्डे बुजले जातील, तसेच आवश्यक उपाययोजना राबविल्या जातील.- हेमंत फेगडे,अधीक्षक अभियंता,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणपनवेलहून पेणच्या दिशेने जाताना खड्ड्यांमुळे अक्षरश: कंबरडे मोडल्यागत होते. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झाला असून लवकरात लवकर हे खड्डे बुजून रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे.- श्यामसुंदर माने,प्रवासी

टॅग्स :panvelपनवेल